त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला.
उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.)
पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@ सतिश गावडे : मला हार्ड डिस्क कशी चालते
हा तुमचा तर्क झाला
सगा सर तराजूच्या कोणत्याही
@ सतिश गावडे : तुमचे म्हणणे देखील तर्कावर आधारीत मत आहे ?
आता तुमच्या कर्मविपाक
@ सतिश गावडे :संगणकाशी तुम्ही दाखवू पाहत असलेले
थांबतो आता...
@ सतिश गावडे : तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही ?
तुम्हाला समजणार्या फॉर्मॅटमध्ये मांडतो.
@ सतिश गावडे : तो कॉम्प्युटर सध्या बाजूला ठेवा ?
मी कुठेही आणि कसलीही जंप
@ सतिश गावडे : तुम्ही दिलेली लिंक...
यात तुमच्या "स्मृती
@ सतिश गावडे : यात तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात
आपण लिहिलेल्या त्रासदायक
छान लेख आणि जाणकारांचे सल्ले सुद्धा उपयोगी
मैत्रीही तुटली.
@ राजेंद्र मेहेंदळे : ग्राहकमंच वगैरे साठी वेळही नसल्याने
संक्षी त्याबद्दल लिहा. इतरांना प्रेरणा मिळेल.
@ चामुंडराय : संक्षी त्याबद्दल लिहा. इतरांना प्रेरणा मिळेल.
घराची मालकणी शगुफ्ता नामक एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kumएकदम बरोबर वाटतंय.
केव्हांपासून वाट पाहात होतो.
आता मी मोठ्या सुट्टीवर जायला
आदरणीय संक्षी सरांचे सर्व प्रतिसाद वाचले
@ विटेकर : लोकांनी कर्म-विपाक सिद्धान्त स्वीकारला नाही
दमलो वाचुन :-)
@ नावातकायआहे : महत्त्वाच्या निर्णयामागची मानसिक प्रक्रिया