दोघे जुळे भाऊ
आटपाट नगर होतं. तिथं दोघे जुळे भाऊ, आपआपल्या बायकापोरांसोबत नांदत होते. म्हाताऱ्या बापाच्या निधनानंतर, वडिलोपार्जित संपत्तीचे समसमान वाटप होईल, असे ठरलं होतं.
म्हाताऱ्याची एक दुध देणारी गाय, एवढीच काय ती तुटपुंजी संपत्ती होती.
एक गाय दोघांत कशी वाटावी ? गहन प्रश्न.
पहिला भाऊ हुशार, तो दुसऱ्याला म्हणाला...
गाईच्या नाकापासून ते मध्यापर्यंतचा भाग तुझा...
आणि मध्यापासून शेपटापर्यंत अर्धा भाग माझा.
पहिल्या भागात तोंड येतं, त्यामुळे गाईला चारा पाणी औषधोपचार तुझा जिम्मा...
माझ्या अर्ध्या भागात गाईची कासोळी, त्यामुळे दुधाचा वाटा माझा..
एवढंच काय या पवित्र गोमातेचे, पूजेसाठी गोमूत्र , घर सारवायला शेण, माझ्याच वाट्याचे...
दुसरा भाऊ दुखावला, परंतु प्रतीलॉजि व ते पटवून देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू शकला नाही, मुकाट्याने पाहिल्याची मनमानी सहन केली. दर
५ वर्षांनी भरणाऱ्या महाजत्रेत एका साधूची, गाठभेट होता, त्याने आपली व्यथा व्यक्त केली.
साधूने एक कानमंत्र त्याला दिला.
दुसऱ्या दिवशी, दूधवाला भाऊ दूध काढायला बसला तोच, या भावाने गायीच्या तोंडावर जोरात पाण्याचा हबका मारला, गाय लाथा मारू लागली, एक दोन तर दूध काढणाऱ्या भावाच्या कमरेखाली लागल्या, कपाळात गेल्या...
अरे काय हा पोरकटपणा लावलाय, विव्हळून त्याने विचारले...
तू तुझ्या अर्ध्या भागात मनसोक्त भोगवटा घेतोयस , तसेच मी माझ्या...
अरे असं काय, भाऊ ना आपण, वाटल्यास गोमूत्र शेणाचे भोगवटा पत्र तुझ्या वाटे करतो...पण पोरकटपणा सोड, मला समजून घे....
क्रमशः
प्रतिक्रिया
इथं पर्यंत तर लहानपणीच ऐकली होती
९ नोवेम्बेर ला सरकार स्थापन
मला वाटतं असं असावं..
क्रमशः पुढे,