मोदी मंत्रीमंडळ २.०
विरोधी पक्ष सत्तेत आलाय आणि टिकेची पहिली संधी म्हनून नवीन मंत्रीमंडळात मानव संसाधन मंत्रालय मिळाले की केवळ मोदी विरोधासाठी स्मृती इराणींचे शिक्षण काढा असाही माझा स्वभाव नाही.
मंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच ? , आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता,प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा - गल्लत नेमकी कुठे होते आहे ? अशा लेखातून मी मंत्रिमंडळांच्या स्वरुपावर यापुर्वी टिका केली आहे. (या किंवा त्या पक्ष किंवा व्यक्तींना अपवाद करणे माझा स्वभाव नाही हे. वे. सा. न. ल.)
उपरोक्त टिका लेख मी पुरेसे उशिराने लिहिले आहेत. मोदी सरकारच्या दुसर्यांदा निवडून येण्याबद्दल लेखन मी मुद्दामच अंमळ उशिराने करायचे ठरवले. त्यामुळे तुर्तास ह्या धाग्याचा तो चर्चा विषय नाही. मोदींच्या मंत्रिमडळ क्रमांक २ चा शपथविधी काल जल्लोशात पार पडला. माझ्या पुरते नवीन मंत्रीमंडळ फेरबदला बद्दल काही मर्यादीतच निरिक्षणे तुर्तास नोंदवावीत असा मनोदय आहे.
केवळ घराणेशाहीशी प्रतिस्पर्धा असल्यामुळे राजकीय वर्णी लागणार्या मनेका गांधी मंत्रिपदावर
सध्यातरी दिसणार नाही, स्मृती इराणींनी घराण्यातील व्यक्तीला हरवून दाखवल्याने प्रतिस्पर्धी प्रदर्शनाची गरज मोदींना कमी जाणवली असेल तर एकुणच राजकारणातून (सार्याच) घराण्यांना दूर करण्याचे फायदे सर्वसामान्य माणसांना लक्षात यावेत. सर्वच घराणेशाहीला मतपेटीतून मतदार राजा अद्याप संपवत नाही लोकशाहीचा घोर अपमान सहन करत रहातो किंबहूना त्यात सहभागी होत रहातो हि अद्यापही चिंतेची बाब आहे. बाकी राजकीय प्रभावाच्या दृष्टीने मनेकांना दुसरे काही महत्व नव्हतेही
राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती सुषमा स्वराज यावेळी मंत्रीमंडळात दिसणार नाहीत. माझ्या मागच्या लेखांमधूनही त्या परराष्ट्र्खात्यापेक्षा मानव संसाधन खात्यात अधिक योग्य होत्या. वकीली भाषेत तरबेज असूनही आंतरराष्ट्रीय राजकारणातील डिप्लोमॅटीक लँग्वेज मध्ये कच्च्या होत्या असे माझे मत होते. नवाज शरीफ काळात स्वतः नवाज शरीफांपेक्षा त्यांचे परराष्ट्रमंत्री वाचाळ वीरता दाखवत आता स्वतः इम्रानखानच वाचाळ वीरता दाखवतो. त्याला भारताच्या परराष्ट्रमंत्रीपदावरून सडेतोड पण डिप्लोमॅटीक भाषेत उत्तरे जावयास हवी होती. काही टिका सरकार मध्ये राहून करता येत नाही ती मंत्रिमंडळाबाहेरच्या भाजपा नेत्यांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पुढे न्यावयास हवी होती पण त्यासाठी लागणार्या इच्छाशक्ती कौशल्य दोन्हीची कुठे कुठे कमतरता असावी. विरोधीपक्षाकडे थरूर सारख्या व्यक्तीकडून इम्रान खानवर सडेतोड टिका व्हावयास हवी होती त्या एवजी सिद्धूची वाचाळ्वीरता चालू होती. भाजपा विरुद्ध बोलण्यासाठी थरूरांकडून पढवून घेणारे राहूल गांधींनी थरूरची मदत घेऊन आधीच इम्रानखानी धोरणावर कडकडून टिका केली असती तर एका दगडात दोन कामे झाली असती इम्रानखानला उत्तरे मिळाली असती आणि राष्ट्रवादावर मोदींना जो एक्रेरी क्लेम मिळाला तो मिळाला नसता. पण यासाठीची राजकीय परिपक्वता थरूर आणि जयशंकरात नसते ती राजकारण्यात असावी लागते आणि तिथे राहुल पेक्षा मोदींचे वेगळेपण का जाणवतय हे सांगता आले नाही तरी जाणवत असते.
अर्थात मी ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणात लागणारे सडेतोडपणा पण डिप्लोमॅटीक लँग्वेज न सोडता (जे कौशल्य इम्रान खान दाखवतो) त्याचा भाजपाई राजकारण्यांमध्ये सुद्धा अभाव जाणवतो . काँग्रेस असो की भाजपाइ नेते सर्वसाधारण वाचाळ वीरता दिसते पण त्यातील डिप्लोमसी कौशल्याच्या आंतरराष्ट्रीय नॅरेटीव्हवर प्रभावी वापर करता येत नाही.. त्यामुळे परदेशातून होणार्या भारत विरोधी पाकीस्तान आणि चीन पुरस्कृत गाजावाजास चपखल आणि चोख उत्तरे देण्यास भारतीय कमी पडतात. भारतीयांना परकीयानी केलेल्या वरवरच्या दिखाऊ कोडकौतुकाची लगेच भुरळ पडते स्वतःची पाठ थोपाटून घेतात प्रत्यक्षात परकीय देशांचे बरेचसे निर्णय भारतीय हितांना अनुकूल नसतात. याचे विश्लेषण भारतीय माध्यमातून अभावानेच पहाण्यास मिळते.
नव्या मोदी मंत्रिमंडळाच्या बाबतीत दोन आनंदाच्या बाबी परराष्ट्र वाटाघाटीत वाकबगार व्यक्ती जयशंकर आणि निर्मला सितारामन अनुक्रमे परराष्ट्र आणि अर्थमंत्रालय सांभाळात असतील.
ट्रंपानॉमीक्स चे अमेरीकन आर्थीक हितरक्षणास्त्र बद्दल मी मागेच लेखन केले आहे. सर्वसाधारणपणे बरेच मोदीभक्त ट्रम्पभक्त सुद्धा असतात हे मी मिपावर अनुभवले आहे. पण ट्रंपनितीमुळे भारताचे इराण रशिया सोबतचे बाधीत होणारे संबंध तसेच पडद्या आडून भारतावर असलेले अमेरीकेचे सातत्याचे ट्रेड विषयक दबाव या काळजी करण्याजोग्या गोष्टी आहेत . जयशंकर आणि सितारामन असल्याने आमेरीकेसोबतचे व्यापार विवाद चुटकी सरशी सुटतील असे नाही. पण त्यांचा अभ्यास आणि काही कौशल्य आहे ते ऊपयूक्त ठरू शकावे असे वा वाटते.
*लेखन चालु - अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी धागालेखक आणि आणि मिपाकरांवर व्यक्तिगत टिका तसेच शुद्धलेखनाचे अगाध ज्ञान न देण्यासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
माहितगारमोदी बरेचसे काम
https://timesofindia
https://timesofindia
१२९ आय ए एस अधिकाऱ्यांना घरी
चिदंबरम गृहमंत्री असतांना
गेल्या लोकसभेत मंत्री असलेले
हे कसं पॉलीटीकली राईट विधान
राज्यवर्धन
राज्यवर्धन राठोड
बाकी महत्वाच्या पदांसोबत युवा
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या
पवार साहेब भारतीय राजकारणातील
चुकीचे माहिती
ट्विटर ने आपण साहेबांशी संपर्क साधू शकतो...
घागाचर्चेच्या परिघा बाहेरील विषयांतर टाळावे
Pagination