गाभा:
हल्ली तो me too चा फार्स थंडावला काय? ऐकू येत नाही फारसा.
आमच्या नानाने महिला आयोगाकडे ४ पानी उत्तर पाठवलं. त्यावर महिला आयोगाने साध्वी तनुश्री दत्ताला पुन्हा तिचं म्हणणं मांडायला ३ वेळा बोलावलं पण ती आली नाही.
आता नाना तिच्यावर ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. बरं होईल, उत्तम होईल!
बाकी काही लोक me too ला pension scheme for retired actresses असंही म्हणतात ते मात्र गंमतीशीर वाटतं.
तो आपला आलोकनाथही बिचारा फसला या me too च्या फार्सात. भला माणूस!
हो, फार्सच तो. कुठलाही पोलीस किंवा न्यायालयीन पाठपुरावा करायचा नाही. केवळ माध्यमांवर येऊन बोंबाबोंब करायची, media trial घडवून आणायची आणि एखाद्याला विनापुरावा, विना legal prosecution केवळ बदनाम करायचं!
आपल्याला काय वाटतं?
प्रतिक्रिया
2 Jan 2019 - 1:50 pm | बदामची राणी
तुम्ही नाव सार्थ करताय अस वाटतंय.
2 Jan 2019 - 3:47 pm | विशुमित
आपल्याला काय वाटतं??
==यू टू!!
यात फक्त रिटायर्ड ऐक्ट्रेसच नव्हत्या.
Metoo करुन पेन्शन कशी मिळनार हे काय समजले नाही.
...
2 Jan 2019 - 7:30 pm | गामा पैलवान
वेडसर,
भारतीय कम्युनिस्टांबद्दल एक म्हंटलं जायचं की, मॉस्कोत पाऊस पडला तर ते कलकत्त्यात छत्री उघडून फिरतात. त्याच धर्तीवर म्हणावंसं वाटतं की, हॉलीवुडात पाऊस पडला की मीसुद्धावाले बॉलीवुडात छत्री उघडून फिरणारे आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टी अगोदरंच बदनाम आहे. इथे स्त्रियांचं शोषण हे उघड गुपित आहे. अशा बनावट आरोळयांमुळे खऱ्या शोषितांकडे साशंक नजरेने पाहिलं जातं.
आ.न.,
-गा.पै.
2 Jan 2019 - 8:17 pm | Rajesh188
मी टू ही चळवळ पाश्चिमात्य देशात सुरू झाली आणि तो ऐक हेतळणी च विषय तिकडे पण झाला .
कारण हयात बरीच कमतरता आहे .
20 वर्षा पूर्वी घडलेले गुन्हे आता कसे सिद्ध करणार हा ऐक प्रश्न आहेच .
Aikdya व्यक्तिपासून आर्थिक फायदे होईपर्यंत संबंध ठेवायचे आणि नंतर मी two म्हणून मीडिया समोर यायचं हेच लोकांना पटत नाही .
आता 21 वे शतक आहे खऱ्या अर्थाने स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार दिले पाहिजेत.
सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबर तर आहेतच उलट जास्त varchad पण आहेत त्यात गुन्हेगारी हे सुधा क्षेत्र आले .
अगदी लैंगिक गुन्ह्यात सुधा स्त्रियां चा पण सहभाग असतो .
पण आपण अजून सुधा स्त्री ही पीडित आणि पुरुष हा गुन्हेगार आसाचं समजून aiktarfi कायदे बनवतो .त्यामुळे कडाक कायदे पण गुन्हेगारी रोखू शकत नाही .त्यात पहिली समानता आणली पाहिजे .
पुरुष आणि स्त्री दोघांना गुन्हे दाखल करायचे आणि मीडिया मध्ये मी टू म्हणायचे पूर्ण अधिकार हवेत आणि कारवाई मध्ये सुध्दा कोणताच फरक नको सर्वांना ऐकच नियम .त्या नंतर मी टू ला सर्व समाजातून पाठिंबा मिळेल नाहीतर तो ऐक चेष्टेचा विषय होईल
2 Jan 2019 - 8:47 pm | बाप्पू
मी too हा एक फार्स होता कारण अश्या गोष्टी मीडिया समोर मांडून फक्त प्रसिद्धी झाली. जर खरेच काही तथ्य असतें तर यातील बऱ्याच लोकांना कायदेशीर रित्या कम्प्लेंट केली असती. परंतु जोंपर्यंत आर्थिक किंवा इतर लाभ चालू आहे तोपर्यंत हे सहन करायचे किंवा संमतीने सर्व चालू ठेवायचे आणि 10-12 वर्ष्यानंतर अचानक एक एक गोष्टी मीठ मासाला लावून बाहेर काढायच्या हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणता येईल.
या कॅम्पेन मुळे काही चांगले बदल घडले. लोकांना बर्याचश्या नवीन गोष्टीं बद्दल माहिती मिळाली. स्त्री किंवा पुरुष यांचे कोणत्या प्रकारे शोषण किंवा इतर प्रकारे त्यांच्यावर अन्याय होतात हे चव्हाट्यावर आले. पुढच्यास ठेचं मागचा शहाणा.
या कम्पेन मुळे जितका फायदा झाला तितके नुकसान देखील झाले. कारण याचा अतिरेक झाल्यामुळे आता हा चेष्टेचा विषय झाला असून त्यामुळे बऱ्याच जेनुइन घटना देखील गांभीर्याने घेतल्या जाणार नाहीत.
2 Jan 2019 - 9:10 pm | Rajesh188
दारू पिऊन पोलिस स्टेशन मध्ये दंगा करणे,लिफ्ट मध्ये पोलिस समोर नागडे होणे समाजस्वास्थ्य खराब होईल आशि किती तरी कृत्य स्त्रिया करतात हे आपण टीव्ही वर बघतो .
पण रात्री गुन्हेगार स्त्री ला अटक करायची नाही हा फालतू कायदा आपल्याच देशात आसेल
17 Jan 2019 - 3:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बॉलिवूडमध्ये स्त्रियांचे/नवतारकांचे शोषण केले जाते हे सर्वश्रुत आहे/होते."शोषण होते हे जर माहित आहे तर जाताच कशाला?" असे आगाउ सल्लेही मिळायचे.बॉलिवूडचे एक शोमॅन शोषण करण्याबद्दल (कु)प्रसिद्ध होते. "अशा लोकानी शोषण करायचे नाहीतर कुणी करायचे?" असेही विचारले जायचे. मी-टूने आळा बसणे थांबणार नाही पण निदान बॉलिवूडचे 'संस्कारी बाबूजी/ पुरूष' दहावेळा विचार करतील.
17 Jan 2019 - 11:16 pm | गामा पैलवान
कसला विचार करतील, माईसाहेब?
आ.न.,
-गा.पै.
23 Jan 2019 - 11:41 am | Rajesh188
Mee too मध्ये नाना सारख्या चरित्र वान नेत्याच नाव आले म्हणून सामान्य जनता आणि मीडिया त्यात उतरली नाही तर me two cha fuga fugnya अगोदरच फुटला आसता .
आणि दुसरं कोण आसात तर जनतेला त्या प्रश्ना शी काही देणंघेणं नव्हतं