समाजरचना घडताना

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
31 Jul 2018 - 1:43 pm

काल पर्यंत
हेच समजत
होतो की अमुक समाजाने
तमुकांना वाळीत टकले.
इथे एकदा समता आली
की पुढे आदर्श समाज रचना असेल

पण आज बघीतले पुन्हा कुणाला तरी
संशयावरुन वाळीत टाकले जाताना
नव्या अस्पृश्यतेची समाजरचना घडताना

रतीबाच्या कवितामुक्तक

प्रतिक्रिया

खिलजि's picture

31 Jul 2018 - 4:14 pm | खिलजि

येडे मन ,
जेव्हा जेव्हा सैरभैर होते
जवळच्याशीही वैर घेते
तो इथेच असतो आसपास ( समाजातच )
शोधत असतो, ढुंढाळत त्याला बाहेर
तो आत खोल हृदयात दडून बसतो , बनतो एकदम खास

समाज घडीचा महाकाय पर्वत
घडीवर घडी बसून , वीण घट्ट झालेली
अमानवीय वादळात ती थोडी सैल होते
अन माणुसकी बाहेर डोकावते
कालांतराने वीण पुन्हा घट्ट होते

माहितगार's picture

31 Jul 2018 - 4:22 pm | माहितगार

अमानवीय वादळात ती थोडी सैल होते
अन माणुसकी बाहेर डोकावते
कालांतराने वीण पुन्हा घट्ट होते

खरंय. मनमोकळ्या काव्यमय प्रतिसादासाठी अनेक आभार

मागाकाका , सर्व मिपाकर एकच आहेत आणि एकोप्याने राहावे असे मला वाटते . ते आत हृदयात खास घर करून असतात , जेव्हा कठीण प्रसंग गुदरतो तेव्हा त्यांना इतरांबद्दल वाटणारी हळहळ मी स्वतः अनुभवली आहे .

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2018 - 4:49 pm | पिलीयन रायडर

नका इतक्या पटकन शोकसभा बोलावु. मला वाटतंय की काही तरी वेगळं कारण असेल. लेखात आणि धागालेखक ह्यांनी प्रतिसादात काही आक्शेपार्ह लिहील्याचे दिसले तर नाही. स्वतःच स्वतःचे लेखन अप्रकाशित करुन घेण्याची पण पद्धत आहे. तसले काही असु शकेल. काही तरी चूक "मिपावर" केल्याशिवाय उगीच सदस्य उडणार नाही. बाकी कुणावर नसला तरी नीलकांत आणि प्रशांत ह्यांच्या सद्सद्विवेक्बुद्धीवर अजुन तरी मला विश्वास आहे. उगाच दबावाखाली येणारे ते नाहीत हे नक्की. (अनुभवातून बोलतेय.) तेव्हा कारण माहिती असल्याशिवाय निष्कर्ष नको.

माहितगार's picture

31 Jul 2018 - 5:15 pm | माहितगार

प्रसंग हे लेखन प्रेरणेचे निमीत्त मात्र असतात, कवि लेखकाचे लेखन सहसा अधिक व्यापक पटल, गतानुगतिक अनुभव लक्षात घेऊन होत असते, किमान या वेळी तसे असावे.

( बाकी मिपा मालकांवर आमचाही विश्वास आहेच, आणि मिपा आजिबातच आवडले नसते तर खर्डेघाशीही केली नसती. हेवेसानल.)

प्रतिसादासाठी आपण आनि खिलजींना अनेक आभार

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2018 - 7:14 pm | पिलीयन रायडर

अधिक व्यापक प्रश्न असेल तर ओके.

पण आज घडलेल्या घटनेशी संबंध असेल तर चक्क मी तूमच्याशी सहमत आहे. फक्त सध्या प्रशासनाला बेनेफिट ऑफ डाऊट देतेय. कारण असं मिपावर निव्वळ संशयावरून कुणी उडेल ह्यावर विश्वास बसत नाहीये.

माहितगार's picture

31 Jul 2018 - 10:00 pm | माहितगार

माझे उत्तर दीर्घ असेल ते काळाच्या ओघात देतो, नेमके बारकावे लक्षात घेणर्‍या फाईन लाईन्स नेमक्या कुठे आणि कशा ओढायच्या हे सर्वसामान्य(पणे) जनतेस सहज उमगत नाही हे मला समजते. मी निर्णय घेणार्‍यांमुळे तेवढा व्यथित नाही जेवढा समाजाच्या शंकेखोरपणातून कुणलातरी वेगळे पाडण्याच्या परिणामामुळे - आता इथे या आधीचे वाक्य पुन्हा वाचावे. हि घटना घडली नसती तरी माझ्या मनातील इतर अनेक विश्लेषणातून केव्हातरी कोणत्यातरी रुपात व्यक्त झालीच असती कारण माझ्या मनातील संबंधीत विश्लेषण इथून सुरु होत नाही, ते आधीच केव्हा तरी झालेले असते. असो सविस्तर सवडीने लिहिन. मनमोकळ्या संवादाबद्दल अनेक आभार.

प्रचेतस's picture

31 Jul 2018 - 6:39 pm | प्रचेतस

कवीच्या भावनांशी सहमत आहे.