सुदाम्याचे पोहे
पुन्हा पुन्हा लिहितात,
अन पुन्हा पुन्हा खोडतात,
दिवसभर मोबाईलशी,
हात, खेळत बसतात.
मनातले शब्द शेवटी
मनातंच रहातात..
माणसं दूर जातात..
पण आठवणी जवळ राहतात
टाईमलाईनवर जाऊन,
डोळे नुसतेच रेंगाळतात.
सुदाम्याचे पोहे कधीकधी
कनवटीलाच रहातात..
पुलेशु.
:) मतितार्थ कळला.
आहा...मस्तच!
सुंदर!!
पद्मावति ( आता पद्मावत
:)
आवडली कविता