महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.
लेखनविषय (Tags)
नमस्कार मंडळी,
मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते.
यामध्ये आम्हाला (प्रत्येक सहभागी राज्याला) ऐतेहासिक गोष्टींवर आधारित दोन नाटिका सादर कराव्या लागतात. ज्यातून राजयाबद्दल काही तरी माहिती मिळेल किंवा येथील महत्त्वाच्या लोकांच्या जीवनात घडलेले आणि ऐतेहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे प्रसंग लोकांना दिसतील. आतापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांच्या वरील काही प्रसंग (उदा. अफझलखान वध, राज्याभिषेक) दाखवले आहेत. नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन तसेच टिळकांच्या जीवनातील “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” हे प्रसंग देखील झाले आहेत.
यावर्षी आम्ही ईतर काही प्रसंग (किंवा घटना ) यांचा विचार करायचा असे ठरवले आहे. मिपावर असे अनेक जाणकार आहेत की ज्यांचा ईतिहासाचा अभ्यास आहे. (किंवा ज्यांना असे काही प्रसंग माहीत आहेत.) त्यामुळे मी हा धागा ईथे उघडीत आहे. जर तुम्हाला असे काही प्रसंग माहीत असतील तर कृपया ईथे प्रतिक्रिया द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे.
प्रतिक्रिया
थोडीशी अधिक माहिती
चाफेकर बंधुंवर करा नाटिका,"
हो, चापेकर आहेत, सावरकर आहेत.
या व्यतिरिक्त,
पुणे भारतीय इतिहासाचे एके
सर्वांचे आभार पण ....