एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति
श्री. माहितगार यानी त्यांच्या "कुराण आणि हदिथ ..." या धाग्यात
* एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners. असा एक सुविचार दिला आहे. wise people explain the same truth in different manners. याला सुविचार म्हणावयास काहीच हरकत नाही. परंतु या वाक्याचा ऋग्वेदाशी काही संबंध नाही असे मी प्रतिसादात लिहले. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न विचारला की ' सत' ला आपण ऋग्वेदातील वर्णित देवतां अग्नी, सोम, वरुण.. पर्यंत आपण मर्यदीत करू इच्छित आहात का ? आता याचे उत्तर दिले पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडणे शक्य आहे की एका धाग्यातील एक वाक्य घेऊन त्यावर दुसरा धागा काढावा कां ? माझे म्हणणे असे की जर आपण वर्तमानत्रातील वा दूरदर्शनवरील एकाद्या बातमी वरून नवा धागा काढतो तर मग अशा एखाद्या विषयावर जर तो नवीन असेल तर धागा काढावयास हरकत नसावी. बरेच दिवस माझ्या मनात ऋग्वेदातील पुढील दोन ऋचांवर लिहावे असे घोळत होते. (1) द्वा सुपर्णा.. व (2) एकं सद्विप्रा. आज एकावर लिहावयाची संधी घेत आहे. उपनिषदांतील चार महावाक्यांप्रमाणे ह्या दोन ऋचांमधील संकल्पना वैदिक वाङ्मयात नवीन विचाराला वाव देतात. जरी श्री. माहितगार यांच्या लेखावरून ह्या धाग्याला सुरवात केली असली तरी हा धागा सर्वस्वी नवीन विषय आहे..
प्रथम संपूर्ण ऋचा बघा.
इन्द्रं मित्रं वरुणंअग्निमाहुरयो दिव्य: सुपर्णो गरुत्वान् !
एकं सद्विप्रा बहुदा वदन्ति अग्नि यमं मातरिश्वानमाहु: !! ऋग्वेद् 1.164.46
वेदकाली भारतात अनेक देवता होत्या. इन्द्र, वरुण, अग्नि, यम इत्यादि. त्याच वेळी या सर्व देवतांच्या पलिकडील महान तत्व "ब्रह्म" ही संकल्पनाही मान्य करण्यात आली होती. केनोपदिषदात आपण पाहिले आहेच की या ब्रह्माने समोर टाकलेली एक काढी या देवता हलवू शकल्या नाहीत की जाळू शकल्या नाहीत. तर हे ब्रह्म व देवता यांचे संबंध काय याचाही विचार व्हावयास पाहिजे तो या ऋचेत मांडिला आहे.
सत्, चित्, आनंद ही ब्रह्माची लक्षणे समजली गेली आहेत. सत् म्हणजे सत्ता, चित् म्हणजे जाणिव, आनंद म्हणजे अक्षर समाधान, शांती. ही लक्षणे म्हणजेच ब्रह्म. उपनिषदात सुरवातीला सत्, होते व त्या पासून हे विश्व निर्माण झाले असे म्हटले आहे.
एकाच "सत्",रूप परमेश्वराचे विद्वान (त्याच्या विविध गुणांच्या/स्वरूपांच्या आधारावर) विविध प्रकारांनी वर्णन करतात. त्याच परमेश्वराला (ऐश्वर्ययुक्त आहे म्हणून ) इन्द्र, (हितकारक आहे म्हणून ) मित्र्र, (श्रेष्ठ आहे म्हणून ) वरुण, (सगळ्यांना प्रकाशित करतो म्हणून ) अग्नि म्हटले जाते. तो परमात्माच सर्व जगाचे पालन करतो म्हणून त्याला सुपर्ण (गरुड) म्हणतात.
इस्लाम, ख्रिस्चन धर्म एकेश्वरी आहेत व हिव्दु धर्म अनेकेश्वरी आहे असे समजले जाते. लौकिक पातळीवर ते खरेही आहे. शैव शिवाला मानतात तर वैष्णव विष्णूला. पण वैचारिक, आध्यात्मिक दृष्टीने सर्व देव-देवता एकच आहेत ही संकल्पना येथे स्पष्ट शब्दात मांडली आहे. आता तुम्हाला शैव शंकाराचार्य देवीची मनोवेधक स्तोत्रे का लिहतात ते लक्षात येईल. वारकरी विष्णू-शंकर एकरूप कसे समजवून घेतात तेही कळेल.
पण हे एवढ्यातच आटोपले नाही. आम्ही सर्वधर्मसमभाव स्विकारला. कबीर-महात्मा गांधी सोडा, ते विचारवंत होते पण खेडेगावात आम्ही पीराला भजू लागलो व माहीमचा कोळी मेरीमातेची पूजा करू लागला. बुद्ध हा विष्णूचा अवतार मानण्यात आला. एखादी महान संकल्पना तुमच्या विचारांना/भावनांना कळत-नकळत,( नकळतच जास्त,) कशी प्रभावित करते ते लक्षात येण्यास हरकत नाही.
येथे ऋग्वेदातील ऋचेचे निरुपण संपले. पण आमचे मित्र श्री. माहितगार लेखात यावयास पाहिजेतच. तेव्हा आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो." सत् "ला मर्यादित करावयाला मी कोण लागून गेलो आहे ? मी फक्त ऋचेतील संस्कृतचा मला लागलेला मराठी अर्थ सांगितला.
अहो, (ग्रेसच्या कवितेचा अर्थ लावण्यास असमर्थ ठरलेला मी;) श्रीमत् शंकराचार्य, गौडपादाचार्य, मध्वाचार्य आदि महान आचार्यांनी जेथे हात टेकले तेथे पाउल टाकण्यास मी यडा आहे की कांय ? असो ,
शरद
प्रतिक्रिया
आवडले. अजून लिहाल का?
+१
राजहंसाचे चालणे। भूतळी जाहाले
ह्या आणि अशाच विषयांवर अजूनही
शब्दच्छलाचे नेमके साध्य / प्रयोजन काय ?
काही खुलासे
आपल्या मनमोकळ्या
वरील प्रमाणे शोध दिल्यास त
सत्