क्रमांक १ : सीमा विवाद सोडवला तर भारताची सीमा बदलणे स्वाभाविक आहे. भारत सरकार ने असे जर काही झाले असेल तर बदललेल्या सीमेसकट भारताचा नवा नकाशा प्रकाशित केला का? केला नाही ही माझी माहिती आहे. केलाच असेल तर कोणीही तो द्यावा.
क्रमांक २ : सीमा बदलल्यामुळे भारताच्या भौगोलिक सीमेतील बदल युनायटेड नेशन्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कळवला का? हेही आपण केलेले नाहिये.
क्रमांक ३ : सीमेतील बदलाला बांगला देश आणि भारत दोघांची सहमती आहे असे दोघांचे संयुक्त पत्रक निघायला हवे होते. तेही कधी दिसले नाही.
मुळात बांगला देश चे भूभाग किंवा जमीन बेटे (enclave) पूर्ण भारतीय हद्दीत होते जे भारताने वेढलेले होते, आणि भारतीय भूभाग हे बांगला देश च्या हद्दीत होते जे बांगला देश पूर्ण वेढलेले होते, त्याचं फक्त हस्तांतरण झालाय म्हणजे भारताने वेधलेल बांगला देश चे भूभाग भारताचे होणार आणि vice versa. कोणताही सीमा बदल झालेला नाही (थोडा फार झाला असेल). ह अतिशय उत्तम निर्णय आहे, कॉंग्रेस सरकार ने सुरवात केली मोदी नि शेवट केला. दोन्ही देशायचा संसेदेने याला मंजुरी दिली आहे. (भारतात घटना दुरुस्ती, बांगला देश मध्ये कायदा कि घटना बदल माहित नाही). खाली माहिती आणि नकाशा दोन्ही पहा.
वेकिपेडिया
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण लेखकानं असं कुठे म्हटलंय की सीमा बदललीय?
बाकी काँग्रेसने सुरुवात कधी केली हे बघीतले तर दिसतं की १०० अमेंडमेंट्स करण्यासाठी ४० वर्षे लागलीत... बाब्बो!!
पण नोटबंदीची गरज काय होती हे सांगा ना ? वर प्रतिसादात गॅरी म्हणत आहे ना की मोदींचा तो मास्टर स्ट्रोक होता ? आपलं काय मत आहे नोटबंदीबद्दल.
-दिलीप बिरुटे
असे ऐतिहासिक निर्णय ढोल वाजवून करण्याची गरज अर्थातच नाही. पण तयारी व पूर्वनियोजन साफ फसले (किंबहुना विचारच केला गेला नव्हता)
उदाहरणार्थः
१. नव्या नोटा एटीएम मध्ये लगेच भरुन काढता येतील हे गृहीत धरणे (प्रत्येक नोट कॅलिबर करावी लागते. तिचा आकार सेट करावा लागतो हे काय आरबीआय ने नव्या नोटा एटीएममधुन निघतीलच हे गृहीत धरण्याची अपेक्षा नाही.
२. लोकांना नोटांसाठी कोणत्या प्रकारची गैरसोय होऊ शकते याचा कोणताही अभ्यास वा तयारी नव्हती. (गुप्ततेच्या नावाखाली या गोष्टीला अपवाद देखील करण्याची गरज नाही) थेट प्रोडक्शन टेस्टींग झाले बाहुबली-२ मध्ये पाहिले तसे. राजकुमारी - मणीबंधम बहिर्मुखम् ... चित्रपट आणि खरे आयुष्य यात फरक असतो आणि तेच या सरकारने केले नव्हते.
प्रतिक्रिया
क्रमांक १ : सीमा विवाद सोडवला
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
ओह्ह.. सॉरी. हा प्रतिसाद
येऊ का बोलायला प्रत्येक मुद्यावर
पियूष गोयल यांचा एक
...
पण गरज होतीच का ?
...
तुम्हाला अर्थमंत्री घोषित
...
अर्थातच नाही