मिपा वर सध्या अनुभवांचे पेव फुटले आहे. तेव्हा माझाही एक अनुभव .. मिपा वर माझे हे पहीलेच लेखन आहे तेव्हा चु.भु.दे. घे. :-)
मिपा वर फिरता फिरता असाच एक कौल दिसला. "मिपा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल". कुणाचीही प्रतीक्रिया नसनारा अन एकुन ५ मते मिळालेला तो कौल साधारण कुनी मनावर घेतल्याचे दिसले नाही. भ्रष्टाचार हा सर्वांचाच एकंदर जिव्हाळ्याचा विषय आणी रोजच्या जिवनाचा अविभाज्य घटक. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहे या वाक्याला आमच्या घरातले उंदिर सुध्धा घाबरत नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी तसा जहाल मतवादी. या विषयावर मिपा सारख्या ठीकानी होणारे दुर्ल़क्ष थोडे खटकले.
हा किस्सा साधारण ९ वर्षापुर्वीचा... खरगपुरला शिकत असताना दसर्याच्या सुटीत सर्व मित्र मंडळी घरी परत येत होतो. काही कारनामुळे मला हावडा मेल चे नाशिक पर्यत चे तिकीट मिळाले नाही म्हनून भुसावळ पर्यंत चे तिकिट काढले. गाडीतच टी. सी. कडुन तिकिट वाढवुन घेवु हा विचार करुन मित्रांबरोबर गाडीत बसलो. मित्रांबरोबर गप्पा करत करत दिवस संपला आनि रात्री १२ च्या सुमारास गाडी भुसावळ च्या जवळ आली. टी. सी. नं तिकीट वाढवण्याची तयारी दाखवली पन ५० रुपये लाच म्हनून मागीतले. ५० रुपयाच्या तिकिटासाठी ५० रुपयांची लाच मागताना शरमेचा लवलेशही त्याच्या चेहेर्यावर दिसत नव्हता. उलट "मै हुं इसिलिये दे रहा हूं, वरना हम ऐसा नही करते" वगेरे उपकाराची दोन वाक्ये त्याने ऐकवली. नड्लेल्या नाडनं हा त्याचा धर्म, त्या धर्मालाच तो जागत होता. भुसावळ हुन पुढची गाडी २ तासांनी होती. २ तास तरी स्टेशन वर कुड्कुड्त थांबावं लागनार होतं आणी म्हनुनच तो लाच मागत होता. शब्दानं शब्द वाढला आनी "भाईसाब टिकट चाहीये तो बोलीये नही तो उतर जाईये. मेरा टाइम बरबाद मत किजीये. जैसा रुल है वैसा मैने मांगा" वगेरे बोलायला लागला. माझे मित्र ही "जाउ दे कशाला उगाच त्रास" म्हनुन मला समजवु लागले. संतापात मी लाच देउन तिकीट न काढण्याचा निर्णय घेतला. मित्र दचकुन "काय वेड लागलय का?" म्हणत माझ्याकडे बघू लागले आनी टी. सी. "जैसी आपकि मर्जी" म्हनत माझ्याकडे तुछतेने पहात निघुन गेला. पळत जाउन तिकीट काढुन परत गाडीत बसनं अशक्य होतं म्हनुन मी भुसावळ ला उतरलो अन पुढचे तीन तास थंडीत कुडकुडत त्या कुबट वातावरणात घालवले. ३ तासांनी कुठ्लीशी गाडी आली आनी मी जनरल बोगीत बसुन नाशिकला पोहोचलो.
हा सगळा किस्सा माझ्या मित्रमंडळीत बरेच दिवस चेष्टेचा विषय होता. "साधा विचार करायचास वेड्या, ३ तास थंडीत बसलास अन जनरल बोगीतुन आलास. वेळ गेला , त्रास झाला तो वेगळा. दिले असते ५० रुपये तर आरामात आला असता" वगेरे व्यवहार ज्ञानचे बोल मला बरेच दिवस ऐकावे लागले. नंतर विचार केला, आजकाल प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार गुन्हा आहे, लाच देनारा आनी घेनारा दोन्ही गुन्हेगार असतात हे सर्वांना माहीत असतानाही केवळ आपल्या सोयीसाठी हा गुन्हा का करतो? स्वत: च्या फायद्यासाठी भ्रष्टाचाराचे समर्थन आपन का करतो? सरकार कहीच करत नाही असे म्हनत सरकारच्या नावाने गळे काढताना आपनच भ्रष्टाचाराला खतपानी घालतो याचा आपल्याला विसर का पडावा?
तेव्हापासुन मी ठरवले "लाच म्हनुन देनार नाही". कुनी काही कामासाठी पैसे मागीतले की मी सरळ नाही म्हनुन सांगतो. लोक चमत्कारीक नजरेने माझ्याकडे पाहतात. हसतात. पन मी समाधानी आहे. भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला थोडा का होइना अटकाव केल्याचे समधान आहे. तुम्हाला काय वाटते?
सुक्या (बोंबील)
वाचने
3651
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पळत जाउन
व्वा ..माणुस याला म्हणावं
धन्यवाद
In reply to व्वा ..माणुस याला म्हणावं by mina
प्रसुतीच्या वेदना
धन्यवाद ..
In reply to प्रसुतीच्या वेदना by भास्कर केन्डे
?
नारायणीताई,
In reply to ? by नारायणी
कशाचा आळा?
In reply to नारायणीताई, by चतुरंग
आपण भारतीय माणसं
In reply to कशाचा आळा? by भास्कर केन्डे
हो तर!
In reply to आपण भारतीय माणसं by चतुरंग
तो
In reply to कशाचा आळा? by भास्कर केन्डे