पळत जाउन तिकीट काढुन परत गाडीत बसनं अशक्य होतं म्हनुन मी भुसावळ ला उतरलो अन पुढचे तीन तास थंडीत कुडकुडत त्या कुबट वातावरणात घालवले
अत्यंत कौतुकास्पद आणि धडसि निर्णय. त्या बद्दल तुमचे अभिनंदन
हा सगळा किस्सा माझ्या मित्रमंडळीत बरेच दिवस चेष्टेचा विषय होता.
दर्शनी जरि त्यांनी चेष्टा केली असलि तरि मनात तुमच्या बद्दल आदर निर्माण झाला असेल.
सुक्या (बोंबील) आपल्याला यकदम पटलं राव तुमचं तत्त्व ! व्वा ..माणुस याला म्हणावं.आपल्या भारताला लागलेली भ्रष्टाचार ही किड आहे. वाळवी सारखं भारताला पोखरुन टाकणारा हा भ्रष्टाचाराचा किडा पायाखाली तुडवुन काढला पाहीजे.या भ्रष्टाचारामुळेच आज हजारों तरुण बेरोजगाराचे चटके खात आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपल्या भारताला लागलेली भ्रष्टाचार ही किड आहे या तुमच्या मताशी मी सहमत आहे. भ्रष्टाचारामुळे जेव्हा गरजु / गरीब लोकांना डावलुन इतरांना काही गोष्टींचा लाभ दिला जातो हे पाहीले की या भस्मासुराच्या तिव्रतेची जानीव होते.
अगदी मॄत्युचा दाखला घेताना सुद्दा लाच मागितली जाते. मरणा नन्तर ही याचा पिछा सुटत नाही हेच खरे.
सुक्या (बोंबील)
असे म्हणतात की सर्वात भयानक वेदना असतात त्या प्रसुतीच्या. जर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त समाज पाहिजे असेल तर या अशा प्रसुती वेदनेतून प्रत्येकाला जावेच लागेल. तरच हा भयंकर प्रकार थांबेल.
आपल्या भावना पोचल्या.
माझा अनुभवः
वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी मी कुठल्याही दलालाला नेमले नाही. अर्ज घेतला व खिडकी समोर रांगेत थांबलो. दोन आडीच तासांनी माझा नंबर लागला. माझा अर्ज दलालांनी भरलेला नसल्याने आरटीओ कार्याकयातल्या भडव्यांना त्यांचा वाटा मिळणारा नव्हता. त्यांच्या पै़कीच हा खिडकीत बसलेला कारकून. त्याने माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. प्रयत्न करूनही अर्जात काही सापडले नाही तेव्हा अर्ज स्वतःपाशी ठेऊन म्हणाला उद्या ये. पण मलाच एकट्याला का? असो.
तो उद्या ननव्या चकरेला उजाडला. त्यानंतर तशा तीन आणखी खिडक्या व त्या नंतर वाहन चालवण्याची परिक्षा. माझी एकट्याचीच परिक्षा झाली. बाकी सर्वांना केवळ "गाडी चालवता येते ना" असे जुजबी विचारले जात होते.
त्यानंतर पुन्हा चार चकरा मारल्यावर मला माझा परवाना मिळाला... दोन पानांचा... अगदी रजिस्टर मध्ये ठेवण्याजोगा आकार... फुल पेज साईझ... बाकी सर्वांना मात्र खिशात बसणारी पुस्तिका मिळाली. मित्र वर्गात खूप हशा झाला.
तो परवाना इतके वर्षे झाले तरी मी जतन करुन ठेवला आहे... माझ्या संकल्पांचा विजय म्हणून! त्याकडे पाहून लाच न देण्या-घेण्याच्या माझ्या संकल्पाला आणखीच बळ येते.
अर्थात तो परवाना अमेरिकेतल्या पोलिसाने पाहिल्यावर भारत हा थर्ड-वर्ल्ड देश आहे हे त्याचे मत पक्के न झाले तर नवलच!
आपला,
(भ्रष्टाचार विरोधि) भास्कर
आम्ही येथे वसतो.
तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. तुमच्यासारखी ध्येयवेडी माणसे भेटली की माझ्याही निर्धार अजुन पक्का होतो. तुमच्याही संकल्पांचा असाच विजय होत राहो ही विजयादशमीच्या निमित्ताने शुभेच्छा!
सुक्या (बोंबील)
माझी एकट्याचीच परिक्षा झाली. बाकी सर्वांना केवळ "गाडी चालवता येते ना" असे जुजबी विचारले जात होते>>> भारतात असंही होतं? मी तर कार चालवुन दाखवली होती. त्यानंतरचं परवाना मिळाला होत. आश्चर्य आहे.
एवढंच काय, तुमची आर्.टी.ओ. मधे वरती ओळख असेल तर टेस्ट वगैरे राहूदे इन्स्पेक्टरचं तोंडही न बघता घरपोच परवाना मिळतो हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे! आता संगणकीकरणामुळे बराच आळा बसलाय असे समजते.
चतुरंग
येथे अमेरिकेत बसून भारतातला वाहन परवाना मिळवला एका पठ्ठ्याने. येथे परिक्षा पास होत नव्हता. गाडी घेतल्याविना भागवता येत नव्हते... तेव्हा केले हे दिव्य.
मी म्हटले की अरे बाबा त्यावर असलेल्या तारिखेला तर तू येथे होतास हे एखाद्या पोलिसाच्या लक्षात आले तर? तो म्हणतो कसा,"आपल्याला काय येडा समजला का काय? भारतात सुट्टीला गेलो होतो त्या बॅक डेटवर मॅनेज केलय. आहेस कुठं?"
काय बोलणार... कप्पाळ!
आपला,
(अचंबित) भास्कर
आम्ही येथे वसतो.
तो अमेरिकेत परीक्षा पास होत नव्हता आणि त्याने तीथे बसुन भारताचा परवाना मिळवला आणि गाडी वापरणे चालु केले असेल तर अमेरीकेतील व्यवस्था वेगळ्या तर्हेने मॅनेज करण्या सारखेच आहे.
प्रतिक्रिया
पळत जाउन
व्वा ..माणुस याला म्हणावं
धन्यवाद
प्रसुतीच्या वेदना
धन्यवाद ..
?
नारायणीताई,
कशाचा आळा?
आपण भारतीय माणसं
हो तर!
तो