कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना जिवंतपणीच परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान जाहीर झालेला आहे. आपल्या पथकातील कोणी असा मागे कसा पडू शकतो हेच त्यांना मान्य नाही. प्रत्येकाने हे प्रशिक्षण पूर्ण केलेच पाहिजे, त्यासाठी कोणतीही सबब चालणार नाही, दुबळेपणा दाखविलेला मान्य नाही अशी त्यांची अत्यंत कडक शिस्त आहे. पथकात एखादा कमी पडायला लागला किंवा एखाद्याने अगदी किरकोळ शिस्तभंग केला तरी 'कोड मंत्र' या नावाने ओळ्खली जाणारी परंतु अनधिकृत असलेली अत्यंत कठोर शिक्षा ते त्या सैनिकांना भोगायला लावतात. ज्याला कोड मंत्राची शिक्षा होते त्याला अनेक दिवस अन्नपाण्याविना उपाशी ठेवणे, कठोर मारहाण करणे, बंदुकीच्या दस्त्याने फटके मारणे अशा स्वरूपाची कठोर व वेदनादायी शिक्षा देऊन त्याला पथकातील इतरांच्या बरोबरीने आणले जाते. 'कोड मंत्र' या शिक्षेला लष्कराची अधिकृत मान्यता नाही. त्यामुळे अशी शिक्षा देऊ नये यासाठी त्यांना पूर्वीच वॉर्निंग देण्यात आली आहे. परंतु अत्यंत कर्तव्यकठोर असलेल्या कर्नल प्रतापराव निंबाळकरांना आपल्या पथकातील कोणत्याही सैनिकात काहीतरी कमतरता असू शकते हे मान्यच नाही. त्यामुळे वरीष्ठांची आज्ञा धुडकावून ते ही शिक्षा देतच राहतात.
______________________________________________________________________________________________________
(नाटकातील एका प्रसंगात वकील अहल्या (मुक्ता बर्वे) आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर (अजय पूरकर))
______________________________________________________________________________________________________
रवी शेलारला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाही. आपण आजारी असल्याने आपली बदली करावी किंवा सेवामुक्त करावे अशी विनंती त्याने पूर्वी अनेकदा केली आहे. परंतु प्रशिक्षण झेपत नाही म्हणजे काय या मानसिकतेतून कर्नल प्रतापराव निंबाळकर त्याची विनंती धुडकावून त्याला जबरदस्तीने प्रशिक्षण देतच राहतात. त्यांच्याच पथकातील विक्रम नावाचा एक सैनिक सीमेवर हालचाल दिसल्याने गोळीबार करून सीमेपलिकडील दोघा जणांना मारतो. त्याच्या म्हणण्यानुसार ते नागरी वेषात असलेले अतिरेकी होते. परंतु त्याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने या प्रकरणात मानवी हक्क उल्लघनाची भानगड होऊ शकेल हे ओळखून हे प्रकरण बाहेर येऊन दिले जात नाही. हे प्रकरण समजल्यावर रवी शेलार लष्कराच्या वरीष्ठ अधिकार्यांना गुपचुप पत्र लिहून आपली बदली करावी अशी मागणी करतो. तसेच नुकत्याच झालेल्या सीमेवरील गोळीबाराबाबत आपल्याकडे गुप्त माहिती आहे असेही तो लिहितो.
दुर्दैवाने हे पत्र कर्नल प्रतापराव निंबाळकरांच्या हातात पडते. ते संतापून आपले कनिष्ठ जाधव यांना त्याला 'कोड मंत्र' शिक्षा देण्यास फर्मावतात. जाधव विक्रमला सांगून त्याच्याकरवी ही शिक्षा अंमलात आणतात. शिक्षेची अंमलबजावणी होत असताना त्यात रवीचा मृत्यु होतो आणि आता हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार याची जाणीव झाल्यावर प्रतापराव व जाधव आवई उठवून देतात की विक्रमचेच रवीशी भांडण झाले व त्या भांडणात विक्रमच्या हातून रवीचा खून झाला.
आता खुनाबद्दल विक्रमचे कोर्टमार्शल होणार असते. लष्कर आपल्या बाजूने एका नामवंत वकीलाला उभे करतात. दुसरीकडे रवीच्या आईच्या दु:खाला पारावर रहात नाही कारण तिचा मुलगा रवी मृत्युमुखी पडलेला असतो व या घटनेतील नाट्य म्हणजे वरीष्ठांच्या सांगण्यावरून रवीला कोड मंत्र ची शिक्षा द्यायला गेलेला विक्रम हा रवीचाच मोठा भाऊ असतो. एक मुलगा गेलेला व दुसरा खुनाच्या आरोपात अडकलेला, यामुळे रवीची दु:खी आई अहल्या या नामवंत महिला वकीलाला विक्रमच्या बाजूने खटला लढण्याची विनंती करते. या केसमध्ये काहीही दम नसून विक्रमनेच रवीचा खून केला आहे व त्यासाठी मोटीव्ह आहे याची अहल्येला खात्री असते. त्यामुळे ती सुरवातीला ही केस घेण्यास नकार देते. परंतु सर्व घटनांमध्ये काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात यायला लागते. तसेच लष्कराच्या बाजूने केस लढणारा वकील तिचा प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे अधिक चौकशी करून मी ही केस घ्यायची का नाही याचा निर्णय घेईन असे ती रवीच्या आईला सांगते.
प्रत्यक्ष लष्करी तळावर जाऊन चौकशीला प्रारंभ केल्यावर अनेक लपविलेल्या गोष्टी तिच्या लक्षात यायला लागतात. जाधव व प्रतापराव बर्याच गोष्टी आपल्यापासून लपवित आहेत असे तिला वाटायला लागते. खुनाचा आरोप असलेला विक्रम घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही बोलायला तयार नसतो. त्याला बोलते करण्यास तिला खूप प्रयत्न करावे लागतात. प्रतापरावांचाच एक सहकारी महेश थत्ते याला कोड मंत्र ही शिक्षेची पद्धत मान्य नसते. रवी खूप आजारी आहे व त्याला हे प्रशिक्षण झेपत नसल्याने त्याला मुक्त करावे अशी विनंती तो वारंवार प्रतापरावांना करत असतो. परंतु आपल्या अहंकारामुळे प्रतापराव त्यांची विनंती देखील ते धुडकावून लावतात. शेवटी रवीच्या मृत्युनंतर महेश थत्ते निनावी फोन करून अहल्येला बरीच माहिती देतात. परंतु आपल्याला न्यायालयात साक्ष देण्यासाठी जबरदस्तीने बोलाविले जाईल व तिथे आपल्याला आपल्या वरीष्ठांच्या विरूद्ध असत्य सांगणे जमणार नाही हे लक्षात येतात ते गोळी झाडून आत्महत्या करतात.
शेवटी कोर्टमार्शल सुरू होते. त्यात अनेकांच्या साक्षीतून हळूहळू घटनेचे धागेदोरे उलगडायला लागतात. शेवटी अनेकांच्या विरोधाला झुगारून अहल्या प्रत्यक्ष कर्नल प्रतापराव निंबाळकरांना साक्षीसाठी पिंजर्यात उभी करते.
प्रतापराव साक्षीत काय सांगतात, रवीच्या मृत्युचे खरे कारण शोधण्यात अहल्येला यश होते का, अहल्या केस हरते का जिंकते, विक्रमवर खुनाचा आरोप शाबीत होतो का, प्रतापराव व अहल्येचा न्यायालयात सामना कसा होतो हे प्रत्यक्ष नाटकातच पाहण्यात मजा आहे. या नाटकात सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत नात्यांची गुंतागुंत दाखविली आहे. ती काहीशी अनावश्यक वाटते.
या नाटकात जवळपास ४० कलाकार काम करतात. नाटकातील लष्करी तळाचे नेपथ्य, सैनिकांची परेड, युद्धप्रसंगातील सायरन व गोळीबाराचे आवाज इ. अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. रंगमंचाच्या ५० फूट मर्यादेत इतक्या सर्व गोष्टी दाखविणे हे एक मोठे आव्हान होते व ते यशस्वीपणे पेलले गेले आहे. आजवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर लष्कराशी संबंधित विषय केन्द्रस्थानी असलेले नाटक सहसा आलेले नाही. मिलिटरी कोर्टमार्शलवर आधारीत हे नाटक असून, लष्करी जवानांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायचे की लष्करी शिस्तीच्या कर्तव्यकठोर भूमिकेतून, हा विवाद्य विषय या नाटकात प्रभावीरीत्या हाताळण्यात आलेला आहे. विषय, आशय, मांडणी, सादरीकरण, अभिनय, तांत्रिक बाजू अशा सर्वच पातळ्यांवर हे नाटक नित्याच्या पठडीबाज नाटकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे असे आहे. जवळजवळ चाळीसेक कलाकारांच्या संचातील हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सहजगत्या आणि यशस्वीरीत्या पेलले आहे.
मुक्ता बर्वेने वकील अहल्येची भूमिका अत्यंत समर्थपणे पेलली आहे. कोर्टमार्शलमध्ये एखाद्या कसलेल्या वकीलाप्रमाणे ती साक्षीदारांना बोलते करून त्यांच्याकडून सत्य वदवून घेते. तिच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका अजय पूरकरने केली आहे. अत्यंत कडक शिस्तीच्या, कठोर कर्नल प्रतापराव निंबाळकरांची भूमिका त्याने व्यवस्थित पेललेली आहे. त्याचा अहंकार, जबरदस्त आत्मविश्वास, सहकार्यांवरील हुकमत, आवाजातील जरब इ. सर्व गोष्टींचे त्याने प्रभावी सादरीकरण केले आहे.
अमेरिकी लष्करातील एका घटनेवर आधारीत ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक अॅरॉन सॉर्किन या अमेरिकी लेखकानं १९८९ साली लिहिले आणि पुढे ते ब्रॉडवेवर सादर झाले. त्यावर नंतर याच नावाचा सिनेमाही निघाला. 'अ फ्यू गुड मेन' हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात लष्करी अधिकार्याची जबरदस्तभूमिका प्रख्यात अभिनेता जॅक निकोल्सनने केली होती. मुख्य वकीलाच्या भूमिकेत चॉकलेटबॉय टॉम क्रूझ व त्याची सहाय्यक म्हणून 'घोस्ट' फेम डेमी मूर होती. तो चित्रपटसुद्धा अत्यंत प्रभावी कोर्टसीन्समुळे गाजला होता. ‘कोड मंत्र’ हे नाटक ‘अ फ्यू गुड मेन’वर आधारीत असले तरी ते मराठीत आणताना त्याला भारतीय लष्कराची पाश्र्वभूमी दिली गेली आहे. हे मूळ नाटक प्रथम गुजराती रंगभूमीवर आले. नाटककार विजय निकम यांनी ‘कोड मंत्र’चे मराठी रूपांतर केले आहे. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लष्करी पेशातील बारीकसारीक तपशील, अस्सल वातावरणनिर्मिती, कर्तव्यपूर्तीच्या ध्यासात कधी कधी लष्कराकडून घडणारे अमानुष वर्तनव्यवहार, त्याची होणारी भयावह परिणती, तसेच गोपनीयता आणि कडक शिस्तीच्या नावाखाली त्यावर घातले जाणारे पांघरुण, त्यातून दडपली जाणारी मानवी मूल्ये असा सारा पट अत्यंत रेखीवपणे नाटकात साकारला आहे. यथार्थ पात्ररेखाटन हे या नाटकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेत्री मुक्ता बर्वे यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांना अजय पूरकर, मिलिंद अधिकारी, अतुल महाजन, उमेश जगताप आदी कलाकारांनी तोलामोलाची साथ दिली आहे. रसाद वालावलकर यांनी उभारलेला सरहद्दीवरील लष्करी तळाचे वास्तवदर्शी नेपथ्य हे या नाटकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय़. सचिन जिगर यांचे संगीत, भौतेष व्यास यांची प्रकाशयोजना आणि अजय खत्री यांच्या वेशभूषेने ‘कोड-मंत्र’च्या निर्मितीमूल्यांमध्ये मोलाची भर घातली आहे.
नाटकप्रेमींनी एकदम वेगळ्या विषयावरील हे नाटक एकदातरी पहावेच. सध्या मराठी रंगभूमीवर खूप चांगली नाटके आली आहेत. 'साखर खाल्लेला माणूस', 'एक शून्य ती', 'तीन पायांची शर्यत', 'अमर फोटो स्टुडिओ इ. नाटके गाजत आहेत. एक महिन्यापूर्वी 'अमर फोटो स्टुडिओ' पहायला गेलो होतो. नाटक पहायला खूप मजा येत होती. दुर्दैवाने मध्यंतरानंतर काही वेळाने घरी काही इमर्जन्सी आल्याचा फोन आल्याने रंगलेले नाटक अर्धवट सोडून जावे लागले. आता वेळ मिळाला की हे नाटक पुन्हा बघणार आहे.
(नाटकातील एका प्रसंगात वकील अहल्या (मुक्ता बर्वे) आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर (अजय पूरकर))
______________________________________________________________________________________________________
रवी शेलारला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाही. आपण आजारी असल्याने आपली बदली करावी किंवा सेवामुक्त करावे अशी विनंती त्याने पूर्वी अनेकदा केली आहे. परंतु प्रशिक्षण झेपत नाही म्हणजे काय या मानसिकतेतून कर्नल प्रतापराव निंबाळकर त्याची विनंती धुडकावून त्याला जबरदस्तीने प्रशिक्षण देतच राहतात. त्यांच्याच पथकातील विक्रम नावाचा एक सैनिक सीमेवर हालचाल दिसल्याने गोळीबार करून सीमेपलिकडील दोघा जणांना मारतो. त्याच्या म्हणण्यानुसार ते नागरी वेषात असलेले अतिरेकी होते. परंतु त्याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने या प्रकरणात मानवी हक्क उल्लघनाची भानगड होऊ शकेल हे ओळखून हे प्रकरण बाहेर येऊन दिले जात नाही. हे प्रकरण समजल्यावर रवी शेलार लष्कराच्या वरीष्ठ अधिकार्यांना गुपचुप पत्र लिहून आपली बदली करावी अशी मागणी करतो. तसेच नुकत्याच झालेल्या सीमेवरील गोळीबाराबाबत आपल्याकडे गुप्त माहिती आहे असेही तो लिहितो.
दुर्दैवाने हे पत्र कर्नल प्रतापराव निंबाळकरांच्या हातात पडते. ते संतापून आपले कनिष्ठ जाधव यांना त्याला 'कोड मंत्र' शिक्षा देण्यास फर्मावतात. जाधव विक्रमला सांगून त्याच्याकरवी ही शिक्षा अंमलात आणतात. शिक्षेची अंमलबजावणी होत असताना त्यात रवीचा मृत्यु होतो आणि आता हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार याची जाणीव झाल्यावर प्रतापराव व जाधव आवई उठवून देतात की विक्रमचेच रवीशी भांडण झाले व त्या भांडणात विक्रमच्या हातून रवीचा खून झाला.
आता खुनाबद्दल विक्रमचे कोर्टमार्शल होणार असते. लष्कर आपल्या बाजूने एका नामवंत वकीलाला उभे करतात. दुसरीकडे रवीच्या आईच्या दु:खाला पारावर रहात नाही कारण तिचा मुलगा रवी मृत्युमुखी पडलेला असतो व या घटनेतील नाट्य म्हणजे वरीष्ठांच्या सांगण्यावरून रवीला कोड मंत्र ची शिक्षा द्यायला गेलेला विक्रम हा रवीचाच मोठा भाऊ असतो. एक मुलगा गेलेला व दुसरा खुनाच्या आरोपात अडकलेला, यामुळे रवीची दु:खी आई अहल्या या नामवंत महिला वकीलाला विक्रमच्या बाजूने खटला लढण्याची विनंती करते. या केसमध्ये काहीही दम नसून विक्रमनेच रवीचा खून केला आहे व त्यासाठी मोटीव्ह आहे याची अहल्येला खात्री असते. त्यामुळे ती सुरवातीला ही केस घेण्यास नकार देते. परंतु सर्व घटनांमध्ये काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात यायला लागते. तसेच लष्कराच्या बाजूने केस लढणारा वकील तिचा प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे अधिक चौकशी करून मी ही केस घ्यायची का नाही याचा निर्णय घेईन असे ती रवीच्या आईला सांगते.
प्रत्यक्ष लष्करी तळावर जाऊन चौकशीला प्रारंभ केल्यावर अनेक लपविलेल्या गोष्टी तिच्या लक्षात यायला लागतात. जाधव व प्रतापराव बर्याच गोष्टी आपल्यापासून लपवित आहेत असे तिला वाटायला लागते. खुनाचा आरोप असलेला विक्रम घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही बोलायला तयार नसतो. त्याला बोलते करण्यास तिला खूप प्रयत्न करावे लागतात. प्रतापरावांचाच एक सहकारी महेश थत्ते याला कोड मंत्र ही शिक्षेची पद्धत मान्य नसते. रवी खूप आजारी आहे व त्याला हे प्रशिक्षण झेपत नसल्याने त्याला मुक्त करावे अशी विनंती तो वारंवार प्रतापरावांना करत असतो. परंतु आपल्या अहंकारामुळे प्रतापराव त्यांची विनंती देखील ते धुडकावून लावतात. शेवटी रवीच्या मृत्युनंतर महेश थत्ते निनावी फोन करून अहल्येला बरीच माहिती देतात. परंतु आपल्याला न्यायालयात साक्ष देण्यासाठी जबरदस्तीने बोलाविले जाईल व तिथे आपल्याला आपल्या वरीष्ठांच्या विरूद्ध असत्य सांगणे जमणार नाही हे लक्षात येतात ते गोळी झाडून आत्महत्या करतात.
शेवटी कोर्टमार्शल सुरू होते. त्यात अनेकांच्या साक्षीतून हळूहळू घटनेचे धागेदोरे उलगडायला लागतात. शेवटी अनेकांच्या विरोधाला झुगारून अहल्या प्रत्यक्ष कर्नल प्रतापराव निंबाळकरांना साक्षीसाठी पिंजर्यात उभी करते.
प्रतापराव साक्षीत काय सांगतात, रवीच्या मृत्युचे खरे कारण शोधण्यात अहल्येला यश होते का, अहल्या केस हरते का जिंकते, विक्रमवर खुनाचा आरोप शाबीत होतो का, प्रतापराव व अहल्येचा न्यायालयात सामना कसा होतो हे प्रत्यक्ष नाटकातच पाहण्यात मजा आहे. या नाटकात सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत नात्यांची गुंतागुंत दाखविली आहे. ती काहीशी अनावश्यक वाटते.
या नाटकात जवळपास ४० कलाकार काम करतात. नाटकातील लष्करी तळाचे नेपथ्य, सैनिकांची परेड, युद्धप्रसंगातील सायरन व गोळीबाराचे आवाज इ. अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. रंगमंचाच्या ५० फूट मर्यादेत इतक्या सर्व गोष्टी दाखविणे हे एक मोठे आव्हान होते व ते यशस्वीपणे पेलले गेले आहे. आजवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर लष्कराशी संबंधित विषय केन्द्रस्थानी असलेले नाटक सहसा आलेले नाही. मिलिटरी कोर्टमार्शलवर आधारीत हे नाटक असून, लष्करी जवानांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायचे की लष्करी शिस्तीच्या कर्तव्यकठोर भूमिकेतून, हा विवाद्य विषय या नाटकात प्रभावीरीत्या हाताळण्यात आलेला आहे. विषय, आशय, मांडणी, सादरीकरण, अभिनय, तांत्रिक बाजू अशा सर्वच पातळ्यांवर हे नाटक नित्याच्या पठडीबाज नाटकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे असे आहे. जवळजवळ चाळीसेक कलाकारांच्या संचातील हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सहजगत्या आणि यशस्वीरीत्या पेलले आहे.
मुक्ता बर्वेने वकील अहल्येची भूमिका अत्यंत समर्थपणे पेलली आहे. कोर्टमार्शलमध्ये एखाद्या कसलेल्या वकीलाप्रमाणे ती साक्षीदारांना बोलते करून त्यांच्याकडून सत्य वदवून घेते. तिच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका अजय पूरकरने केली आहे. अत्यंत कडक शिस्तीच्या, कठोर कर्नल प्रतापराव निंबाळकरांची भूमिका त्याने व्यवस्थित पेललेली आहे. त्याचा अहंकार, जबरदस्त आत्मविश्वास, सहकार्यांवरील हुकमत, आवाजातील जरब इ. सर्व गोष्टींचे त्याने प्रभावी सादरीकरण केले आहे.
अमेरिकी लष्करातील एका घटनेवर आधारीत ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक अॅरॉन सॉर्किन या अमेरिकी लेखकानं १९८९ साली लिहिले आणि पुढे ते ब्रॉडवेवर सादर झाले. त्यावर नंतर याच नावाचा सिनेमाही निघाला. 'अ फ्यू गुड मेन' हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात लष्करी अधिकार्याची जबरदस्तभूमिका प्रख्यात अभिनेता जॅक निकोल्सनने केली होती. मुख्य वकीलाच्या भूमिकेत चॉकलेटबॉय टॉम क्रूझ व त्याची सहाय्यक म्हणून 'घोस्ट' फेम डेमी मूर होती. तो चित्रपटसुद्धा अत्यंत प्रभावी कोर्टसीन्समुळे गाजला होता. ‘कोड मंत्र’ हे नाटक ‘अ फ्यू गुड मेन’वर आधारीत असले तरी ते मराठीत आणताना त्याला भारतीय लष्कराची पाश्र्वभूमी दिली गेली आहे. हे मूळ नाटक प्रथम गुजराती रंगभूमीवर आले. नाटककार विजय निकम यांनी ‘कोड मंत्र’चे मराठी रूपांतर केले आहे. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लष्करी पेशातील बारीकसारीक तपशील, अस्सल वातावरणनिर्मिती, कर्तव्यपूर्तीच्या ध्यासात कधी कधी लष्कराकडून घडणारे अमानुष वर्तनव्यवहार, त्याची होणारी भयावह परिणती, तसेच गोपनीयता आणि कडक शिस्तीच्या नावाखाली त्यावर घातले जाणारे पांघरुण, त्यातून दडपली जाणारी मानवी मूल्ये असा सारा पट अत्यंत रेखीवपणे नाटकात साकारला आहे. यथार्थ पात्ररेखाटन हे या नाटकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेत्री मुक्ता बर्वे यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांना अजय पूरकर, मिलिंद अधिकारी, अतुल महाजन, उमेश जगताप आदी कलाकारांनी तोलामोलाची साथ दिली आहे. रसाद वालावलकर यांनी उभारलेला सरहद्दीवरील लष्करी तळाचे वास्तवदर्शी नेपथ्य हे या नाटकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय़. सचिन जिगर यांचे संगीत, भौतेष व्यास यांची प्रकाशयोजना आणि अजय खत्री यांच्या वेशभूषेने ‘कोड-मंत्र’च्या निर्मितीमूल्यांमध्ये मोलाची भर घातली आहे.
नाटकप्रेमींनी एकदम वेगळ्या विषयावरील हे नाटक एकदातरी पहावेच. सध्या मराठी रंगभूमीवर खूप चांगली नाटके आली आहेत. 'साखर खाल्लेला माणूस', 'एक शून्य ती', 'तीन पायांची शर्यत', 'अमर फोटो स्टुडिओ इ. नाटके गाजत आहेत. एक महिन्यापूर्वी 'अमर फोटो स्टुडिओ' पहायला गेलो होतो. नाटक पहायला खूप मजा येत होती. दुर्दैवाने मध्यंतरानंतर काही वेळाने घरी काही इमर्जन्सी आल्याचा फोन आल्याने रंगलेले नाटक अर्धवट सोडून जावे लागले. आता वेळ मिळाला की हे नाटक पुन्हा बघणार आहे.
प्रतिक्रिया
या वेगळ्या अन चांगल्या
छान लिहीलंय परिक्षण
धन्यवाद! निखळ मनोरंजन हवे
धन्यवाद !
किंचीत छिद्रन्वेषीपणा..
नाटकातच आसामच्या जंगलातील
फ्यु गुड मेन
नाटक ठीक आहे पण नक्कल नीट
नाटकातील भावनिक गुंतागुंत तशी
नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय
नक्षलवाद्यांविरूद्ध सैन्याचा
तेच. केंद्रीय राखीव पोलीस बल
+१
नक्की पहाणार. धन्यवाद
ए साला, इंडियन फिल्म
ए साला फेदरवेट, तू साला
नाय आपुन ओव्हरऑल इंचार्ज होता
भाऊसाहेब, नाय वळखत आपन. आपलं
आय लाईक यु सन! आय लाईक युवर