गाभा:
http://epaper.agrowon.com/Agrowon/30Nov2016/Enlarge/Pune/page15.htm
दंवडी नावाचे सदर अॅग्रोवन दैनिकात येत होते. कदाचित कोणी वाचलेही असेल.
सदराचे लेखक इरगोंडा पाटील नावाचे गृहस्थ होते ते काही महिन्यापूर्वी वारले.
आज या सदराची सांगता आहे आणि याचे मला वाईट वाट्ते.
या सदरामध्ये शेतकरी आणि ग्रामिण समाजाचे बर्यापैकी प्रबोधन होत असे. स्त्रींच्या बद्दल उदार दृष्टीकोन, शिक्षणाचे महत्व, शेतीच्या समस्या अशा वेगवेगळ्या विषयावर लिखाण होत असे.
पाटलांनी एक वेगळाच फॉरम्ट यशस्वी पणे वापरला होता.
त्यांचे या निमित्त्याने स्मरण.
प्रतिक्रिया
30 Nov 2016 - 11:30 am | पुंबा
उत्तम सदर. पाटील ग्रामीण भागाची, शेतकऱ्यांची, मजुरांची, स्त्रियांच्या समस्यांची अचूक जाण असणारे लेखक होते. ते आणि आसाराम लोमटे हे दोघे 100% अस्सल स्तंभलेखक ग्रामीण विषयांवर लिहिणारे.
30 Nov 2016 - 11:42 am | एस
इरगोंडा पाटील यांना श्रद्धांजली!