Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by महासंग्राम on Tue, 09/27/2016 - 14:48
लेखनविषय (Tags)
संस्कृती
गझल
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. या मालिकेत मला आवडलेली गझलकार/शायरांचा परिचय देण्याचा प्रयत्न करेन _____________________________________________________________________ माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी ____________________________________________________________________  . तू किसी रेल सी गुजरती है, मै किसी पूल सा थरथराता हूं हे 'मसान' मधलं गाणं ऐकत असता, त्या गाण्याचा इतिहास तपासून पाहिला तेव्हा या वरच्या दोन ओळी दुष्यंतकुमार यांच्या गझलेतून घेतल्याचे कळले. दुष्यंतकुमार हे काय प्रकरण पाहतांना रेख्तावर त्यांच्या काही गझला सापडल्या आणि एक सुंदर खजिना हाती लागला. हिंदी-उर्दू गझलेच्या क्षेत्रात काही थोड्या काळात भरीव कार्य केले आहे त्यांत, 'दुष्यंत कुमार' यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हिंदी गझलेला वैभावाचे दिवस मिळवून देण्याचे कार्य दुष्यंतकुमार यांनी केलं. ०१ सप्टेंबर १९३३ ला उत्तरप्रदेशच्या बिजनौर मधल्या राजपूर नवादा मध्ये जन्मलेल्या दुष्यंतकुमार यांनी . इलाहाबाद विश्वविद्यालय मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आकाशवाणी भोपाळ येथे असिस्टंट प्रोड्युसर ची नोकरी मिळाली. भोपाळ हे शहर अतिशय प्रिय होतं त्या शहराबद्दल तिथल्या तलावांबद्दल त्यांना एक वेगळ्याच प्रकारची आत्मीयता होती. अतिशय साध्या सोप्या शब्दांत कविता/गझल लिहिणारे दुष्यंतकुमार हे क्रांतिकारी शायर/कवी म्हणून जास्त प्रसिद्ध होते. त्यांचा कल डाव्या विचारांकडे झुकणारा होता, जे त्यावेळी अगदी साहजिकच होतं . दुष्यंतकुमार जेव्हा राजकारण्यांवर प्रहार करतात तेव्हा ते म्हणतात. मस्लहम आमेज होते हैं सियासत के कदम तू न समझेगा सियासत, तू अभी इंसान है” त्यांचे माझे आवडते शेर देतो आहे. ‘मुझमें रहते हैं करोड़ों लोग, चुप कैसे रहूँ हर गज़ल अब सल्तनत के नाम इक बयान है” ”गूंगे निकल पड़े हैं जुबां की तलाश में सरकार के खिलाफ ये साजिश तो देखिये” ”कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो” ( हे बोकाभाऊंच कायप्पा स्टेट्स आहे बहुदा ) ये लोग होमो-हवन में यकीन रखते हैं चलो यहां से चलें, हाथ न जल जाएं कहीं” राजकारणी, दांभिकता यांवर प्रहार करणारे दुष्यंतकुमार रोमँटिक शायरी पण तितक्याच ताकदीने लिहितात. एक आदत सी बन गई है तू और आदत कभी नहीं जाती चांदनी छत पे चल रही होगी अब अकेली टहल रही होगी फिर मेरा ज़िक्र आ गया होगा बर्फ़-सी वो पिघल रही होगी हि पूर्ण गझल सुंदर आहे. मैं जिसे ओढ़ता -बिछाता हूँ , वो गज़ल आपको सुनाता हूँ। एक जंगल है तेरी आँखों में मैं जहाँ राह भूल जाता हूँ। तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल -सा थरथराता हूँ। हर तरफ़ एतराज़ होता है, मैं अगर रोशनी में आता हूँ। एक बाजू उखड़ गया जब से, और ज़्यादा वज़न उठाता हूँ। मैं तुझे भूलने की कोशिश में, आज कितने क़रीब पाता हूँ। कौन ये फासला निभाएगा, मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ। उण्यापुऱ्या ४२ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या असामान्य प्रतिभेच्या शायराने सामान्य माणसासोबत केवळ हात नाही मिळवला तर त्याच्या दुखणं बोलतं केलं. सलाम दुष्यंतकुमार
  • Log in or register to post comments
  • 2857 views

प्रतिक्रिया

Submitted by पुजारी on Tue, 09/27/2016 - 15:43

Permalink

वाह !

एकच ओळ आठवते आहे , "भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ "
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Tue, 09/27/2016 - 15:58

In reply to वाह ! by पुजारी

Permalink

पूर्ण गझल

भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ । मौत ने तो धर दबोचा एक चीते कि तरह ज़िंदगी ने जब छुआ तो फ़ासला रखकर छुआ । गिड़गिड़ाने का यहां कोई असर होता नही पेट भरकर गालियां दो, आह भरकर बददुआ । क्या वज़ह है प्यास ज्यादा तेज़ लगती है यहाँ लोग कहते हैं कि पहले इस जगह पर था कुँआ । आप दस्ताने पहनकर छू रहे हैं आग को आप के भी ख़ून का रंग हो गया है साँवला । इस अंगीठी तक गली से कुछ हवा आने तो दो जब तलक खिलते नहीं ये कोयले देंगे धुँआ । दोस्त, अपने मुल्क कि किस्मत पे रंजीदा न हो उनके हाथों में है पिंजरा, उनके पिंजरे में सुआ । इस शहर मे वो कोई बारात हो या वारदात अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियाँ ।
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 09/27/2016 - 15:51

Permalink

सुरेख!

सुरेख! एक आदत सी बन गई है तू और आदत कभी नहीं जाती फिर मेरा ज़िक्र आ गया होगा बर्फ़-सी वो पिघल रही होगी क्या बात है!!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/27/2016 - 16:04

Permalink

या धाग्यावरुन अश्फाक यांचे

या धाग्यावरुन अश्फाक यांचे धागे आठवले ! आदाब अर्ज है ! आदाब अर्ज है ! आदाब अर्ज है ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Tue, 09/27/2016 - 16:10

In reply to या धाग्यावरुन अश्फाक यांचे by मदनबाण

Permalink

नै हो ते मोक्लाया दाही दिशा

नै हो ते मोक्लाया दाही दिशा टैप वाटते
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/27/2016 - 16:22

In reply to नै हो ते मोक्लाया दाही दिशा by महासंग्राम

Permalink

मना पासुन लिखाण करणार्‍याची

मना पासुन लिखाण करणार्‍याची आणि माहिती देण्यार्‍याची आम्ही टर खेचत नाही ! त्यांनी दिलेली शायरी सुंदर आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/27/2016 - 17:58

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 09/27/2016 - 18:09

Permalink

क्या बात!

क्या बात!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 09/27/2016 - 21:31

Permalink

कौन ये फासला निभाएगा,

कौन ये फासला निभाएगा, मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ।
!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुंड्या on Tue, 09/27/2016 - 23:54

Permalink

वाह मंदार भाऊ

मुकर्रर
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Wed, 09/28/2016 - 08:34

Permalink

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

मलाही आवडणारा शायर, ' आपके घर के कालिन देखंगे किसी और दिन , इस समय तो पाँव किचड में फॅंसे है ' ' ये सारा जिस्म बोझसे झुका हुआ होगा, मैं सजदे में नही था यारो, आपको धोखा हुआ होगा ' ' यहाँतक आते आते सुख जाती है कई नदियाँ , मुझे मालूम है, पानी कहाँ, ठहरा हुआ होगा ' ' कौन कहता है कि आकाश में सुराख नही हो सकता, एक पत्थर, जरा तबियतसे मारो यारो ' असे काही शेर, जसे आठवले तसे लिहिले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 10:00

Permalink

दुष्यंतकुमार म्हटलं की माझ्यासाठी हे

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए। हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में, हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। खास करून ultimate आणि penultimate शेर तर नित्य प्रेरणादायी
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Wed, 09/28/2016 - 14:37

Permalink

मंदारजी

छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही सुंदर कंटीन्यु ठेवा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com