हवामान खात्याचा अंदाज ?
राम राम मंडळी. मंडळी, जगभरातल्या हवामान खात्याच्या तज्ञांनी या वर्षी भारतात भरपूर पाऊस पडेल असं म्हटलं होतं. आणि त्यांचा संदर्भ घेऊन आणि थोडाफार अभ्यास करुन आमच्या भारतीय तज्ञांनीही विविध तक्ते आणि अनुषांगिक अभ्यासाच्या संदर्भ देत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं म्हटलं होतं. सात जून पर्यंत मान्सुन महाराष्ट्रात प्रवेश करेल असे अनुमान संबंधितांनी काढले होते. केरळात मान्सुन बरसला की तो पुढे महाराष्ट्रात चारपाच दिवसांनी पोहचतो असा अभ्यास जवळ जवळ सर्व महाराष्ट्रीयन माणसांचा वेधशाळेच्या माहितीकडे दुर्लक्ष करुन झाला आहे. कालांतराने दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल असं म्हटल्या गेलं. पुढे बातम्या आल्या की मान्सुनचे आगमन लांबले आहे. आपल्या अभ्यास आणि संशोधनाच्याद्वारे भारतीय वेधशाळांनी या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे अंदाज वर्तवले होते. विविध आलेख आणि तक्त्यांच्या आधारे पाऊस किती असेल त्याची मांडणी केलेली होती. जून महिन्यात अमुक अमुक, जुलै महिन्यात धमुक धमुक पाऊस पडेल, अगदी ऑक्टोंबर, नोहेंबर पर्यंत धो धो पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. पुढील महिन्यात किती पाऊस पडेल ते माहिती नाही, पण आज जून मध्य ओलांडून पुढे जात आहे तरी पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी पडला आहे, पण सर्वत्र पाऊस नाही असे दिसत आहे. लहानपणापासून रेडीयो केंद्रावर विविध कार्यक्रमाच्या ब्रेकमधे मी ऐकायचे की आज दिवसभर हवामान ढगाळ राहील, आकाश निरभ्र राहील, वारे वाहतील, पण या विभागाचा पावसाचा अंदाज हमखास चुकतो असे वाटले आहे. हवामान खात्याच्या विभागावर नेहमीच मी व्यंगचित्र पाहिली आहेत. मला हे हवामान खात्याचे तज्ञ आणि ज्योतिषी सारखेच वाटतात, लागला अंदाजे टोला तर लागला नाय तर कोणते तरी ग्रह आडवे आले होते म्हणून हे पळ काढतात. आमचा एक मित्र म्हणत होता की मटका खेळणार्यांना तरी हा विभाग चालवायला द्यावा. दहा आकड्यापैकी एखादा तरी आकडा बरोबर लागेल. मंडळी, तसा हा विभाग खूपच विनोदी झाला आहे. माझ्या काथ्याकुटातील विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला खरच काही प्रश्नांची माहिती हवी आहे.
१) भारतात हवामान अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतील अशा वेधशाळा नाहीत का ?
२) हवामान खात्याचे अंदाज का चुकतात ?
३) भारतात वेधशाळा किती आणि त्यातील तज्ञ व्यक्ती कोणत्या ?
४) भारतात वेधशाळेतील अभ्यासकांची संख्या किती ?
५) भारतात सरासरी दर महिन्याला या तज्ञांवर किती खर्च होतो ?
६) वेधशाळांचा जर काही फायदाच होत नसेल तर या वेधशाळा बंद का केल्या जात नाहीत ?
७) इतकी मोठमोठी उपग्रह आपण आकाशात सोडतो त्यातील एकाही ग्रहाला पावसाचा पत्ता लागत नाही का ?
विनंती : हवामान खात्याच्या अंदाजाविषयी हा धागा आहे, उगं त्याला सरकारी विभाग, त्यांचे कार्य आणि तत्सम विषयांकडे वेधशाळेला घेऊन जाऊ नये, ही नम्र विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
हवामान खात्याच्या अंदाज महत्वाचा नाहि.
+१००
एक फॉरवर्ड बातमी.
हाच तो लेख *मारुती चितमपल्ली*
हवामान खाते.
विंडी.कॉम
परस्पर विरोधी मत
सचित्र हवामान