✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

व
विवेकपटाईत यांनी
Fri, 03/25/2016 - 11:01  ·  लेख
लेख
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही. मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65) महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला. ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः. ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत. (यजुर्वेद: ३१/११) या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्. विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्. (तैत्तिरीय उपनिषद ३/४) त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात. वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
27205 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

कोण करत आहे विरोध ?

उगा काहितरीच
Sat, 03/26/2016 - 20:09 नवीन
कोण करत आहे विरोध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लाटकर साहेब.

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 20:20 नवीन
लाटकर साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मेरे सवाल का कोई जवाब नही आया

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 19:19 नवीन
मेरे सवाल का कोई जवाब नही आया अबतक...????
  • Log in or register to post comments

पाळेमुळे खणून काढणे म्हणजे

काळा पहाड
Sun, 03/27/2016 - 14:00 नवीन
पाळेमुळे खणून काढणे म्हणजे नक्की काय करणार? लोकांच्या खाजगी जीवनात एका मर्यादेपलिकडे जाता येत नाही. सरकार जे प्रयत्न करतं ते प्रबोधनात्मक असतात. पण जातीचं वलय आणि त्याचे आर्थिक फायदे पहाता लोक असे प्रयत्न फाट्यावरच मारत असणार. शिवाय प्रत्येक जातीला स्वतःची जात सर्वश्रेष्ठ वाटते. जरी ते तथाकथित रित्या निम्न जातीत जन्माला आले असले तरी. त्याचं काय? जात एकाच प्रकारे जावू शकत होती की जातीचे सर्व उल्लेख सार्वजनिक जीवनातून नाहीसे करणे. तसं होतंय का? आरक्षण, निवडणुका, जात पंचायती वगैरे मुळे जात संस्था उलट जास्त उल्लेखनीय, अ-लवचिक आणि प्रखर झाली आहे. तेव्हा मुदलातल्या घोळामुळे व्याजावर परिणाम झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 14:21 नवीन
तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त पद्धतीने जातबदल करणे शक्य आहे का? सगळे जे जातीपातीवरुन ओरडतात त्या सगळ्यांना एकजात ब्राह्मण करुन टाका काही शुद्धीकरण, बदलीकरण विधी असतील तर. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आसेतु हिमाचल सग्ळे हिंदु एकाच जातीचे. सग्ळेच ब्राह्मण. बाबासाहेबांनी धर्मांतर केले. आता जात्यांतर होऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एक आधार कार्ड वाटायचं तर हजार

काळा पहाड
Sun, 03/27/2016 - 16:54 नवीन
एक आधार कार्ड वाटायचं तर हजार भानगडी झाल्या. इथे किती घोळ होतील! तेव्हा हा प्रकार अव्यावहारिक आहे. शिवाय लोकांची मानसिकता एका पिढीत बदलली जाणं शक्य नाही. यासाठी प्रबोधन आणि शिक्षण हेच फक्त उपयुक्त आहे. दुरदैवाने, शिक्षण घेवून सुद्धा मानसिकता बदलेल असं नाही. सुशिक्शित लोक आपल्या मानसिकतेच्या टोळ्या तयार करतात. अनेक बाईक्स वर आणि कार्स वर सध्या ||मराठा|| असे बोर्ड दिसतायत. जणू की ती काही एक शूरवीर असल्याची पावतीच आहे. अजून मी ब्राम्हण, माळी, महार असे बोर्ड बघितले नाहीत पण ते दिवसही फार दूर नसावेत. शिवाय ब्राम्हणांचं तरी सुद्धा ठीक आहे. पण ब्राम्हण झालेले मराठा आणि ब्राम्हण झालेले महार किती एकत्र बसू शकतील याबद्दल मला शंका आहे. प्रत्यक जातीची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत. सगळे लोक एकदम शाकाहारी होतील? नसल्यास तसं करण्याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ते गाड्यांवर नावं लावणे तर

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 17:30 नवीन
ते गाड्यांवर नावं लावणे तर बुद्धीहिन चळवळ आहे नुसती. ;-) प्रत्येक जातीचीच काय प्रत्येक घराण्याची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत तरी ती शंभर, दोनशे, हजार कुटुंबे एकाच जातीचे नाव लावतात. एकाच कुटुंबाच्या वेगवेगळ्या शाखांमधेही हे वैविध्य दिसून येतं तरी आम्ही शाहण्णव कुळी, तमके मराठा, अमके ब्राह्मण असे बिरुदं लोक चिकटवतांना दिसतात. तरी ही लोक एकत्र बसू शकतात. अर्थात तुम्ही म्हणताय तीच रीअ‍ॅलिटी आहे. पण मुक्तकल्पनारंजनातुन काही हाती लागेल काय हाही विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

जगाच्या अंतापर्यंत जातीचे व

हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 20:05 नवीन
जगाच्या अंतापर्यंत जातीचे व धर्माचे अस्तित्व राहणार!
  • Log in or register to post comments

सध्या देशाच्या कुठल्या भागात

हकु
Sun, 03/27/2016 - 10:24 नवीन
सध्या देशाच्या कुठल्या भागात मनुस्मृती प्रमाण मानून कायदा चालवला जातो?
  • Log in or register to post comments

सध्या न्हवे तर कधीकाळी ते होतं म्हणे

भाऊंचे भाऊ
Sun, 03/27/2016 - 10:31 नवीन
जसे कधीकाळी इंग्रज राज्य करीत होते तसं.... फक्त एकच प्रॉब्लम आहे इंग्रजांचे कायदे कानून मानवनिर्मित तर मनुस्मृती 100% तशी म्हणता येत नाही अन प्रश्न हां येतो की त्याचे प्रेरक निर्माते आजही अस्तित्वात आहेत की कधीच न्हवते यावर तुम्ही काय विश्वास ठेवता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

बरं. मग त्याचे प्रेरक

हकु
Sun, 03/27/2016 - 10:36 नवीन
बरं. मग त्याचे प्रेरक निर्माते आज अस्तित्वात आहेत असं वाटतंय का? जर हो, तर ते कोण ? ते अजूनही मनुस्मृती नुसार वागण्यासाठी सांगत आहेत का? मग जाळपोळ करून विरोध नक्की कोणाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

हिटलरशाही संपली केंव्हाच

भाऊंचे भाऊ
Sun, 03/27/2016 - 10:42 नवीन
पण आजही कोणी नाझिवाद प्रमाण मानत असेल जोपासत असेल तर केला जाणारा विरोध मेलेल्या हिटलरला नक्कीच नसावा नाहिका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा.

अनुप ढेरे
Sun, 03/27/2016 - 10:36 नवीन
वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा. पूर्ण कायदा नाही पण वारस कायदे बनवताना मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

"१. मनुस्मृती, मिताक्षरा, इ.

हकु
Sun, 03/27/2016 - 13:57 नवीन
"१. मनुस्मृती, मिताक्षरा, इ. हिंदू धर्मशास्त्रावरच्या ग्रंथांमधील काही भाग आज भारताच्या सिव्हिल लॉ चा भाग आहे."
बॅटमॅन यांचा हा मुद्दा जर इथे लक्षात घेतला तर मग मला सांगा की हा हिंदू धर्माशास्त्रावरील काही भाग ग्राह्य धरण्यास संमती कोणी दिली ? घटनाकारांनी का? जर तसे असेल तर मग मनुस्मृतीस विरोध हा घटनाकारांना केलेला विरोध म्हणायला हवा ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

Indian law म्हणजे British law

हेमंत लाटकर
Sun, 03/27/2016 - 16:14 नवीन
Indian law म्हणजे British law चे झेराॅक्स आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा