सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा
राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता
स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला
जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा
माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा
विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा
न उगवताच कशी मावळते चांदणी
किनार्यास न भेटताच परततात लाटा
सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही
फुलाच्या ताटव्यात त्या होतो मी एक काटा
प्रतिक्रिया
1 Jan 2016 - 12:59 pm | राघव
कल्पना ठीक. रचना अजून गेय असली तर आणिक छान होईल.
राघव
1 Jan 2016 - 1:27 pm | मयुरMK
धन्यवाद राघव
प्रयतन करेन .
1 Jan 2016 - 11:36 pm | शार्दुल_हातोळकर
कवितेचा आशय छान आहे!!
2 Jan 2016 - 9:57 am | मयुरMK
धन्यवाद शार्दुल ..भाऊ