श्रीकृष्ण वसुदेव यादव
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो,
मिळपाववर रामायण-महाभारताच्या विविध अंगानी चर्चा होत राहाते. त्यातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या लीलांमुळे सामान्यजनांवर त्याच्या चरित्रातील विविधांगांची मोहिनी पडलेली जाणवते. अनेकांना लीला व अदभूतता सोडून श्रीकृष्णाच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाची माहिती मला नव्याने कळल्याचे जाणवले. ते मला भावले. कदाचित आपणालाही ते वाचायला रंजक वाटेल.
या सादरीकरणात अनेक भौगोलिक उल्लेख सध्या काय म्हणून प्रसिद्ध आहेत याचे विवरण मिळावे तर ज्ञानात भर पडेल.
काळाच्या ओघात सूर्यवंशाची सत्ता गेली व 'यादव,अंधक,भोज,भौज,कुकर, दाशार्ह, आणि वृष्ण' या सात 'चंद्रवंशी' कुलांनी 'मधुपुरी, मधुरा', अशा नावाने प्रसिद्ध 'मथुरेच्या' प्रदेशात वसाहती केल्या.
1. 'उग्रसेन' हा मथुरेचा राजा. त्याची राणी 'पद्मावती'. यांना 'कंस' नामक क्रूर पुत्र. पित्याला कैदेत टाकून त्याने सत्ता बऴकावली.
2. श्रीकृष्णाचा पिता 'वसुदेव' आपला पिता 'शूरसेनाने' आपले राज्य गमावल्याने यमुनेच्या उत्तरेला गोवर्धन परिसरातील एक सामान्य जहागीरदार म्हणून मथुरेत राहात होता. शूरसेनाला ‘पृथा’ (पांडवांची माता कुंती) आणि ‘वसुदेव’ अशी दोन अपत्ये होती.
3. 'भोजपुरचा' राजा ‘कुंतीभोज’ शूरसेनाचा मित्र आणि आत्तेभाऊ निःसंतान होता. म्हणून शूरसेनाने आपली मुलगी ‘पृथा’ त्याला दत्तक दिली.
4. राजा उग्रसेनाचा भाऊ ‘देवक’. त्याची मुलगी ‘देवकी’. तिचा विवाह जहागिरदार वसुदेवाशी झाला. विवाहप्रसंगी चुलत भाऊ कंस रथाचे सारथ्य करत होता. परंतु वरातीत विघ्न घालणाऱ्याला त्याने चाबकाने फटके मारले. त्यावेळी त्याने ‘ज्यांची वरात तू नेत आहेस तिचा आठवा मुलगा तुझा वध करेल’ असा तळतळाट केला. चिडून कंस देवकीला मारायला धावला. वसुदेवाने मधेपडून ‘तू बहीण देवकीला मारून काय मिळणार. नंतर तिला झालेली अपत्ये तुझ्या हवाली करतो’. म्हणून समजूत काढून वेळ मारून नेली.
5. कटकट नको म्हणून कालांतराने कंसाने देवकी व वसुदेवाला नजरबंद कैदखान्यात ठेवले. पहिली सहा-सात मुले कंसाने क्रौर्याने मारली. मुले मारल्याचे भिंतीवरील रक्ताचे डाग तो मुद्दाम ठेवत असे. शांत व विचारी स्वभावाच्या वसुदेवाच्या सहवासाने देवकी शांत राहिली.
6. वसुदेवाची आणखी एक पत्नी ‘रोहिणी’ गोकुळात राहात असे. तिला आधीच सहा मुले होती. (कदाचित वाड्यासमान) कैदेत असताना रोहिणी वसुदेवाला भेटावयास येत असे. तिने तिच्या सातव्या अपत्याला 'बलरामाला' श्रावण वद्य षष्ठीला, दुपारी स्वाती नक्षत्रावर, सोमवारी व मथुरेत देवकीने आठव्या 'श्रीकृष्ण' अपत्याला श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत असताना रात्री 12 वाजता जन्म दिला. बलराम व श्री कृष्ण यांच्या फक्त 2 दिवसांचे अंतर होते.
7. श्रीकृष्णाचे आजोबा, वसुदेवाचे वडील ‘शूरसेन’, मथुरेतील ‘वृष्णी’वंशातील राजा ‘मीढदेव’ याला त्यातील क्षेत्रिय? कुळातील (नाव?) एका पत्निचे अपत्य होते. दुसरी पत्नी वैश्य कुलोत्पन्न होती. तिला पर्जन्यजी नामक मुलगा होता. त्याने यमुनेच्या उत्तरतीरावर वास्तव्यकरून गायीपालन करायचा व्यवसाय सुरू केला. त्याला पाच अपत्ये झाली. पैकी ‘नंद’ बुद्धिमान असल्याने गोकुळपरिसरातील गोपालनाचे प्रमुखपद त्याला देण्यात आले. नात्याने ‘नंद’ व ‘वसुदेव’ बंधू होते. म्हणून आपली पत्नी रोहिणीला त्याने नंदाकडे ठेवले होते.
8. व्रजमंडळातील एका कुटुंबात ‘सुमुख’ आणि ‘पाटला’ यांच्या पोटी ‘यशोदा’ नामक कन्या जन्मली. नंद आणि यशोदाचा विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्न झाले. वसुदेवाला देवकीपासून झालेले आठवे अपत्य त्याने गुपचुप रातोरात नंदाच्या हवाली केले आणि नंदाची कन्या (म्हणून कदाचित एका नवजात मुलीला) परत मथुरेत नेले. यमुनेला पुरग्रस्त परिस्थितीमुळे, मथुरेत आणिबाणीची परिस्थिती असल्याने, जो तो आपला जीव वाचवण्याच्या नादात पहारे देणे वगैरे याकडे दुर्लक्ष झाल्याचे वसुदेवाच्या पथ्यावर पडले असावे.
9. देवकीला आठवे अपत्य मुलगी झाल्याचे कंसाला कळले तरीही दक्षता म्हणून त्याने त्या मुलीला मारायचा प्रयत्न केला पण ती हातातून सटकली. पुराची परिस्थिती, रात्रीची वेळ, त्यात पहाऱ्यातील ढिलाई, अशा अनेक कारणांनी देवकीला मुलाच्या ऐवजी मुलगी झाल्याचे कंसाला खरे न वाटून गोकुळातील वसुदेवाच्या नातलगांचा संशय येत असावा.
10. बाराव्या दिवशी नामकरण विधीला ‘राधा’ नामक एक 23 वर्षाची विवाहिता हजर होती. गोपालक ‘अनय’ आणि त्याची पत्नी ‘राधा’ जवळच्या ‘बरसाना’ गावचे होते. त्या गोंडस श्रीकृष्ण बालकाला पाहून तिला त्याच्या बाललीलांचे मोहक रूप आवडून ती वेळी-अवेळी त्याला आपल्याकडेवरून नेत असावी. अन्य गोपमातांनाही त्या बालकाशी जवळीक साधताना आवडत असावे. कदाचित गवगवा होऊन साधारण त्याच दिवसात जन्मलेल्या अपत्यांचा शोध घेण्यासाठी विविधमार्गांनी नंदावर, वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणी वगैरेंवर लक्ष ठेऊन अशा नवजात बालकांना मारायला काही ना काही सोंगे घेऊन अनेकांना पाठवण्यात आले. त्यात एक पूतना नामक बाई होती. परंतु त्यांना काही छडा न लावताच परतावे किंवा मृत्यूला सामोरे जावे लागले.
11. हळूहळू श्रीकृष्ण मोठा झाल्यावर गाईचारावयास अन्य गोपांच्या समावेत वृंदावन नामक चराऊ कुरणांकडे जात असे. त्याला बालपणापासून बांसरी वाजवायचा नाद असल्याने फावल्यावेळात त्यातून सुरेल स्वरांनी तो मनोरंजन करे. दुग्धजन्य पदार्थ बनवून मथुरेला बाजारात विकायच्या प्रयत्नात घरातील लोकांपासून त्या पदार्थांना दूर ठेवायच्या चालीमुळे खाण्यापिण्यात लहान बाळांची, वृद्धांची अबाळ होताना पाहून ‘श्रीकृष्णाने प्रथम घरचांची भूक भागवा व उरलेले विका’ असे कधी गोड बोलून तर कधी मित्रांच्या मदतीने न ऐकणाऱ्या गोप कुटुंबांवर मस्करीतून धडा घालून पटवून दिले.
12. तिकडे मथुरेत कंसाच्या मनात संशयाची सुई सारखी श्रीकृष्ण-बलरामाकडे जात असल्याने एका उत्सवात मल्लयुद्धाचे कारण दाखवून त्या दोघांना बोलावून मारायचा बेत रचून मथुरेत आणवले गेले. या 8-9 वर्षांच्या मुलांना मुद्दाम बोलावून वयाने व शक्तीने बलवान मल्लांसमोर नेण्यातील कुटिल डाव ‘अक्रूर’ नामक सारथ्याला कळून आला असावा. श्रीकृष्ण व बलरामांचे मल्लयुद्ध चातुर्य व संत्रस्त जनसमुदायाचा उठाव असे कारण होऊन कंस व त्याचे साथीदार मारले गेले. नंतर बंदिवान उग्रसेनाला पुन्हा राज्यावर बसवून, माता देवकी व वसुदेव यांची सुटका केली. त्यानंतर ‘उजैनी’जवळील ‘सांदीपनींच्या’ आश्रमात बलराम व श्रीकृष्ण विद्याग्रहणाला गेले.
वरील लिखाण 'आपली संस्कृती' नावाच्या (जिव्हाळा परिवारतर्फे दामोदर रामदासी, 87/5 ब आझादनगर कोथरूड पुणे 29. मो 9422535997) विविध विषयावर माउली सुत ‘प्रकाश’ यांनी संकलित केलेल्या ज्ञानग्रंथातून घेतलेले आहे. अदभूतता, वगळून मूळलेखनातील तपशील ठेवून, माझ्याकडून थोडी भर घालून हे लिखाण केले आहे. पुढील कथाभाग मिळणाऱ्या प्रतिसादावर ठरेल.
श्रीकृष्ण वसुदेव यादव
काळाच्या ओघात सूर्यवंशाची सत्ता गेली व 'यादव,अंधक,भोज,भौज,कुकर, दाशार्ह, आणि वृष्ण' या सात 'चंद्रवंशी' कुलांनी 'मधुपुरी, मधुरा', अशा नावाने प्रसिद्ध 'मथुरेच्या' प्रदेशात वसाहती केल्या.
1. 'उग्रसेन' हा मथुरेचा राजा. त्याची राणी 'पद्मावती'. यांना 'कंस' नामक क्रूर पुत्र. पित्याला कैदेत टाकून त्याने सत्ता बऴकावली.
2. श्रीकृष्णाचा पिता 'वसुदेव' आपला पिता 'शूरसेनाने' आपले राज्य गमावल्याने यमुनेच्या उत्तरेला गोवर्धन परिसरातील एक सामान्य जहागीरदार म्हणून मथुरेत राहात होता. शूरसेनाला ‘पृथा’ (पांडवांची माता कुंती) आणि ‘वसुदेव’ अशी दोन अपत्ये होती.
3. 'भोजपुरचा' राजा ‘कुंतीभोज’ शूरसेनाचा मित्र आणि आत्तेभाऊ निःसंतान होता. म्हणून शूरसेनाने आपली मुलगी ‘पृथा’ त्याला दत्तक दिली.
4. राजा उग्रसेनाचा भाऊ ‘देवक’. त्याची मुलगी ‘देवकी’. तिचा विवाह जहागिरदार वसुदेवाशी झाला. विवाहप्रसंगी चुलत भाऊ कंस रथाचे सारथ्य करत होता. परंतु वरातीत विघ्न घालणाऱ्याला त्याने चाबकाने फटके मारले. त्यावेळी त्याने ‘ज्यांची वरात तू नेत आहेस तिचा आठवा मुलगा तुझा वध करेल’ असा तळतळाट केला. चिडून कंस देवकीला मारायला धावला. वसुदेवाने मधेपडून ‘तू बहीण देवकीला मारून काय मिळणार. नंतर तिला झालेली अपत्ये तुझ्या हवाली करतो’. म्हणून समजूत काढून वेळ मारून नेली.
5. कटकट नको म्हणून कालांतराने कंसाने देवकी व वसुदेवाला नजरबंद कैदखान्यात ठेवले. पहिली सहा-सात मुले कंसाने क्रौर्याने मारली. मुले मारल्याचे भिंतीवरील रक्ताचे डाग तो मुद्दाम ठेवत असे. शांत व विचारी स्वभावाच्या वसुदेवाच्या सहवासाने देवकी शांत राहिली.
6. वसुदेवाची आणखी एक पत्नी ‘रोहिणी’ गोकुळात राहात असे. तिला आधीच सहा मुले होती. (कदाचित वाड्यासमान) कैदेत असताना रोहिणी वसुदेवाला भेटावयास येत असे. तिने तिच्या सातव्या अपत्याला 'बलरामाला' श्रावण वद्य षष्ठीला, दुपारी स्वाती नक्षत्रावर, सोमवारी व मथुरेत देवकीने आठव्या 'श्रीकृष्ण' अपत्याला श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत असताना रात्री 12 वाजता जन्म दिला. बलराम व श्री कृष्ण यांच्या फक्त 2 दिवसांचे अंतर होते.
7. श्रीकृष्णाचे आजोबा, वसुदेवाचे वडील ‘शूरसेन’, मथुरेतील ‘वृष्णी’वंशातील राजा ‘मीढदेव’ याला त्यातील क्षेत्रिय? कुळातील (नाव?) एका पत्निचे अपत्य होते. दुसरी पत्नी वैश्य कुलोत्पन्न होती. तिला पर्जन्यजी नामक मुलगा होता. त्याने यमुनेच्या उत्तरतीरावर वास्तव्यकरून गायीपालन करायचा व्यवसाय सुरू केला. त्याला पाच अपत्ये झाली. पैकी ‘नंद’ बुद्धिमान असल्याने गोकुळपरिसरातील गोपालनाचे प्रमुखपद त्याला देण्यात आले. नात्याने ‘नंद’ व ‘वसुदेव’ बंधू होते. म्हणून आपली पत्नी रोहिणीला त्याने नंदाकडे ठेवले होते.
8. व्रजमंडळातील एका कुटुंबात ‘सुमुख’ आणि ‘पाटला’ यांच्या पोटी ‘यशोदा’ नामक कन्या जन्मली. नंद आणि यशोदाचा विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्न झाले. वसुदेवाला देवकीपासून झालेले आठवे अपत्य त्याने गुपचुप रातोरात नंदाच्या हवाली केले आणि नंदाची कन्या (म्हणून कदाचित एका नवजात मुलीला) परत मथुरेत नेले. यमुनेला पुरग्रस्त परिस्थितीमुळे, मथुरेत आणिबाणीची परिस्थिती असल्याने, जो तो आपला जीव वाचवण्याच्या नादात पहारे देणे वगैरे याकडे दुर्लक्ष झाल्याचे वसुदेवाच्या पथ्यावर पडले असावे.
9. देवकीला आठवे अपत्य मुलगी झाल्याचे कंसाला कळले तरीही दक्षता म्हणून त्याने त्या मुलीला मारायचा प्रयत्न केला पण ती हातातून सटकली. पुराची परिस्थिती, रात्रीची वेळ, त्यात पहाऱ्यातील ढिलाई, अशा अनेक कारणांनी देवकीला मुलाच्या ऐवजी मुलगी झाल्याचे कंसाला खरे न वाटून गोकुळातील वसुदेवाच्या नातलगांचा संशय येत असावा.
10. बाराव्या दिवशी नामकरण विधीला ‘राधा’ नामक एक 23 वर्षाची विवाहिता हजर होती. गोपालक ‘अनय’ आणि त्याची पत्नी ‘राधा’ जवळच्या ‘बरसाना’ गावचे होते. त्या गोंडस श्रीकृष्ण बालकाला पाहून तिला त्याच्या बाललीलांचे मोहक रूप आवडून ती वेळी-अवेळी त्याला आपल्याकडेवरून नेत असावी. अन्य गोपमातांनाही त्या बालकाशी जवळीक साधताना आवडत असावे. कदाचित गवगवा होऊन साधारण त्याच दिवसात जन्मलेल्या अपत्यांचा शोध घेण्यासाठी विविधमार्गांनी नंदावर, वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणी वगैरेंवर लक्ष ठेऊन अशा नवजात बालकांना मारायला काही ना काही सोंगे घेऊन अनेकांना पाठवण्यात आले. त्यात एक पूतना नामक बाई होती. परंतु त्यांना काही छडा न लावताच परतावे किंवा मृत्यूला सामोरे जावे लागले.
11. हळूहळू श्रीकृष्ण मोठा झाल्यावर गाईचारावयास अन्य गोपांच्या समावेत वृंदावन नामक चराऊ कुरणांकडे जात असे. त्याला बालपणापासून बांसरी वाजवायचा नाद असल्याने फावल्यावेळात त्यातून सुरेल स्वरांनी तो मनोरंजन करे. दुग्धजन्य पदार्थ बनवून मथुरेला बाजारात विकायच्या प्रयत्नात घरातील लोकांपासून त्या पदार्थांना दूर ठेवायच्या चालीमुळे खाण्यापिण्यात लहान बाळांची, वृद्धांची अबाळ होताना पाहून ‘श्रीकृष्णाने प्रथम घरचांची भूक भागवा व उरलेले विका’ असे कधी गोड बोलून तर कधी मित्रांच्या मदतीने न ऐकणाऱ्या गोप कुटुंबांवर मस्करीतून धडा घालून पटवून दिले.
12. तिकडे मथुरेत कंसाच्या मनात संशयाची सुई सारखी श्रीकृष्ण-बलरामाकडे जात असल्याने एका उत्सवात मल्लयुद्धाचे कारण दाखवून त्या दोघांना बोलावून मारायचा बेत रचून मथुरेत आणवले गेले. या 8-9 वर्षांच्या मुलांना मुद्दाम बोलावून वयाने व शक्तीने बलवान मल्लांसमोर नेण्यातील कुटिल डाव ‘अक्रूर’ नामक सारथ्याला कळून आला असावा. श्रीकृष्ण व बलरामांचे मल्लयुद्ध चातुर्य व संत्रस्त जनसमुदायाचा उठाव असे कारण होऊन कंस व त्याचे साथीदार मारले गेले. नंतर बंदिवान उग्रसेनाला पुन्हा राज्यावर बसवून, माता देवकी व वसुदेव यांची सुटका केली. त्यानंतर ‘उजैनी’जवळील ‘सांदीपनींच्या’ आश्रमात बलराम व श्रीकृष्ण विद्याग्रहणाला गेले.
वरील लिखाण 'आपली संस्कृती' नावाच्या (जिव्हाळा परिवारतर्फे दामोदर रामदासी, 87/5 ब आझादनगर कोथरूड पुणे 29. मो 9422535997) विविध विषयावर माउली सुत ‘प्रकाश’ यांनी संकलित केलेल्या ज्ञानग्रंथातून घेतलेले आहे. अदभूतता, वगळून मूळलेखनातील तपशील ठेवून, माझ्याकडून थोडी भर घालून हे लिखाण केले आहे. पुढील कथाभाग मिळणाऱ्या प्रतिसादावर ठरेल.
प्रतिक्रिया
ज्ञानकोशातही हेच वर्णन आहे.
ज्ञानकोश
संग्रहणिय धागा
बऱ्याच व्यक्तींचा महाभारतात
बरोबर
वसुदेवाची आणखी एक पत्नी
जन्म दिवसांची माहिती खालील प्रकाशनातून घेतलेली आहे.
हो मलाही कळत नाहीय
रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेतकसा काय. वृषभेत म्हणायचंय का तुम्हालारोहिणी नक्षत्रावर चंद्र
महाभारतात राशी व वार नव्हते
तेच तर म्हणायचंय मला
या लेखाचा पुढला भाग
खरे आहे
काही प्रश्न.
काही उत्तरं
काही तर्क
पहिल्यात विसंगती कशी?
....पुराणकथातील ..... वरदान
कोणतेतरी सत्य झाकणे आणि बाळबोधीकरण
मला भागवत आणि महाभारतातील
'नन्द' या शब्दाचे संस्कृत