>>टारझनचं ठीक आहे - तो 'बघायला' न जाताही गुलाबजाम खाऊन आला -
मस्तच रे टार्या
पोरी फिदा आहेत म्हण्जे या खविसटल्यावर
टार्या आज तुझा अनुभव वाचुन मी हसुन हसुन मेले रे
जियो दोस्ता!
तात्या,
अफलातुन अनुभव आहे हो तुमच्या पाठीशी. :)
बिलवलकर काकु तर अगदी मजेशीर वाटल्या.
पण पोटभर खाऊन आलात हे बरे केलेत :)
टार्या,
मस्त अनुभव बॉ तु़झा,
गुलाबजाम कसे खाल्ले असशील हे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. :)
तात्या,
लै भारी अनुभवकथन !!!
टारझनचा अनुभव पण आवडला...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
तात्या एक नंबर झाला आहे लेख.. मी पहील्यांदा नजरचुकीने पाहण्याचा ऐवजी पोहण्याचा असे वाचले होते त्यामुळे वाटले की मस्त मुटके, सूर वगैरे मारल्याचे किस्से असतील. पण पहीला परिच्छेद वाचल्यावर कळले ते पोहणे नसून पाहणे आहे. :)
पुण्याचे पेशवे
दचकु नका ? विवाह आणि ज्योतिष या विषयावरील या माझ्या पुस्तकाचे हे नांव आहे. तसे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ..... यात हा विषय आनुषंगिक म्हणुन घेतला आहेच. लोकांना ज्योतिष विषय हा प्रसंगवशात चघळायला आवडतो. लग्नाच्या मार्केट मधे हा विषय चांगला चघळला जातो.
मग आम्ही या विषयावर २००४ मध्ये परिसंवाद घडवुन आणला आणि त्यानिमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन केले. परिसंवादात पालकांच्या वतीने अनुरुप वधुवर सुचक मंडळाचे महेंद्र कानिटकर , साथ साथ च्या विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी, ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांना बोलते केले होते. अनिल अवचटांच्या हस्ते कार्यक्रम घडवुन आणला होता.
(स्वतः पत्रिका न पाहता रजिस्टर्ड लग्न केलेला)
प्रकाश घाटपांडे
तात्या !!
मस्तच लिहीलये !!
अगदी असे अनुभव शेयर करण्याच डेरींग आवडल आपल्याला ..
टारोबा !!
तु गुलाब जामुन वर भागवलस ,हे बर केल !!
बाकी आज मना पासुन हसलो !!
हापीसातील चीने माझ्या थोबाडा कडे बघतायेत ( आता तर चांगल होत !! ह्या अर्थानी )बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
बघायला दोन आत्या आणि दोन बहिणी असं पॅनल आलं होतं.
नंतर मुलीसोबत आणखी एक पॅनल आलं.
नंतर पावसामुळे मुंबईत अडकलो, तेव्हा आणखी एक पॅनल येउन गेलं.
मुलगा दोन दिवस घरी आला नाही म्हणून पॅनल धास्तावलं.
पोहे मीच केले होते.
माझा एक :
इच्छा नसताना नाईलाजाने मुलगी पाहायला जायचा हा प्रसंग.
मी एमबीबीएस उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप करत होतो. मनात अर्थातच लग्नाचे बिलकुल विचार नव्हते. अशात आमच्या मूळ गावाकडचे एक पाहुणे घरी आले. तिकडे गावाकडे त्यांच्या नात्यात एक मुलगी लग्नाची होती. तिच्यासाठी डॉक्टर गटवायचा याच उद्देशाने ते आमच्याकडे आले होते. त्यांनी तो विषय काढतात मी त्यांना अक्षरशः ‘हड’ केले. स्वतःच्या पायावर उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याने मी लग्नाचा विचार करणे शक्यच नव्हते.
पण हे महाशय पडले गळेपडू. दोन दिवस आमच्याकडे राहिले आणि सारखे तेच पालुपद लावत होते. त्यांनी मला मधाचे बोट लावण्याचा एक प्रयत्न केला. म्हणाले, अरे तुझा पुढचं शिक्षण काय ते होत राहील. त्या मुलीचे वडील धनाढ्य आहेत. ते सुद्धा तुला मदत करतील. हे ऐकल्यावर तर मी उखडलोच. त्यांना म्हणालो, “असले प्रस्ताव घेऊन दुसरीकडे जा, मी त्यातला अजिबात नाही.”
शेवटी त्यांनी एक युक्ती केली. मला म्हटले, “अरे तू पूर्ण शहरातच वाढलास. आपल्या गावी सुद्धा कधी आलेला नाहीस. तर माझी इच्छा म्हणून गाव बघायला म्हणून तरी चल आणि सहज त्या मुलीवर एक नजर टाक ! तू नको 'पाहू' तिला पण तिच्या घरचे लोक तुला पाहतील”.
शेवटी नाईलाज म्हणून त्यांच्या बरोबर गावी गेलो. पुढे त्यांनी जेवणाचा कार्यक्रम त्या मुलीसह ठेवला होता. त्या मुलीला पाहताक्षणीच माझ्या लक्षात आले की ती आणि मी कुठल्याच बाबतीत अनुरूप नाही आहोत. काहीसा धक्काच बसला. मला आमच्या मध्यस्थांच्या थोडा रागही आला. परंतु ते काही चेहऱ्यावर न दाखवता मी त्या लोकांशी निव्वळ उपचार म्हणून हवापाण्याच्या गप्पा मारल्या. संध्याकाळी आमच्या पाहुण्यांना म्हणालो, झाले ते बस झाले. आता मी तातडीने निघतो. तुम्ही ज्या साठी मला इथे आणले तो तुमचा हेतू फसलेला आहे असे समजा. पुन्हा असला विषय माझ्याकडे काढत जाऊ नका. आणि मी तिथून निघालो.
तर असा हा माझ्या आयुष्यातला माझी इच्छा नसताना घडलेला पहिलावहिला ‘पाहण्याचा’ कार्यक्रम !
प्रतिक्रिया
वा वा वा
टार्या
मस्त..
तात्या, लै
मजेशीर
किस्से
एक नंबर लेखन ..
मस्त लेख
यंदा कर्तव्य आहे!
तात्या
चागले लिहले आहे
मला
पुढे काय?
बोहल्यावरून पलायन?
अफलातुन
आवर्जून
मस्त
छान किस्से