जंगल पूर्वीचे
आज महानगर झाले
पहिल्या पेक्षा जास्त
खतरनाक झाले.
भरल्या पोटी वाघ
करत नव्हता शिकार.
बेधुंध कार आज
कधीही घेते प्राण.
तेंव्हा दरवळत होता
सुगंध मलयज गिरीचा.
पेट्रोलच्या वासाने आज
कासावीस होतो प्राण.
कांव कांव कावळ्यांचे
घरटे उंच मीनारांवर
अंगणातली चिवताई
कुठे हरवली आज.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
841
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया