Skip to main content

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

लेखक आनन्दा
Published on सोमवार, 29/09/2014
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

याद्या 8582
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

अहो ह्यातल्या एका तरी पर्यायाच्या समोर, किंवा ह्यातली एक गोष्ट तरी करु शकेल असा एक तरी उमेदवार किंवा पक्ष असायला हवा ना.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

आमी नाय सांगणार ज्जा !

यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

शहरी भागात तरी आप ने चांगला चान्स घालवला निवडणुकीत भाग घेउन असे वाटतय. १० तरी आमदार निवडुन आले असते.

In reply to by प्रसाद१९७१

आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास
हो ना.. फुकट खाणार्‍यांचे वांधेच झाले होते तेव्हा.. खरंय.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

हे 'गुप्त' मतदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?