बेधुंद मनीचे बोल...
लेखनविषय:
बेधुंद मनीचे बोल
निसटून चालले होते
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते
ते बोल खुळेसे काही
अविचल त्या अस्फुट तारा
वळणाशी भिरभिरणारा
तो सोसाट्याचा वारा
बांधून कधीचे ज्यांना
मी उरात जपले होते
मी बोल बोलता सारे
अस्तित्वच बहिरे झाले
अविभाव आर्त स्वत्वाचे
ते अजून गहिरे झाले
जिद्दीच्या तेज कणांनी
आयुष्य रापले होते
त्या उधाणलेल्या लहरी
संकोच गोठवुन गेल्या,
विझलेल्या सामर्थ्याला
अवचीत पेटवुन गेल्या...!
मी ध्येय गाठले तेव्हा
हे भान हरपले होते...
© अदिती शरद जोशी
वाचने
1445
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
अता हे गीत गुणगुणत मी
अता हे गीत गुणगुणत मी
सुंदर लिहिलंय
अप्रतिम रचना
कवितेला लय असली तरी अर्थ