प्रतिभा सान्त की अनंत?
नमस्कार मंडळी!
नेहमीच्या पेक्षा थोडा वेगळा विषय.
म्हणजे पटतंय का बघा. मला जे वाटतंय ते लिहीतोय.
अनेक क्षेत्रातील कला- अभिनय, दिग्दर्शन, गीतकार,
साहित्य- ह्यात कथा, कादंबर्या, कविता, सगळे प्रकार,
संगीत, क्रिडा नि अनेक अशाच क्षेत्रांतील बर्याच प्रतिभावंत लोकांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे लोक ज्या दर्जाच्या क्रिएशन्स (निर्मिती?) करतात तशा, त्याच दर्जाच्या क्रिएशन्स नंतर करु शकत नाहीत का?
उदाहरणादाखलः
ए आर रेहमान ह्या अत्यंत प्रतिभावान संगीतकाराची कुठली गाणी आपल्याला पटकन आठवतात?
मला रोजा, बॉम्बे अशा हातावर मोजण्या इतक्या चित्रपटांची नावं आठवतात.
दिल तो पागल है चे उत्तम सिंग एका चित्रपटानंतर गायब च झाले जणू.
मिलिंद इंगळे नि सौमित्रचा गारवा ऐकल्यानंतरची कुठली गाणी आठवतात?
अनेक कलाकार पहिल्या दोन चार चित्रपटांच्या कमाईच्या जोरावर पुढचे अनंत दिवस घालवतात.
सानिया मिर्झाचं टेनिस, अनेक लेखकांच्या पहिल्यावहिल्या कथा कादंबर्या कवितांना मिळणारं यश हेच शेवटचं यश असतं.
काय होतं नेमकं? प्रतिभा कमी पडते की प्रतिभेसाठी लागणारी साधना / कष्ट कमी पडतात...?
एकदा प्रसिद्ध झाल्यावर लोकानुवर्ती जीवनशैली, सातत्यानं समाजामध्ये राहणं किंवा साधनेला वेळ कमी मिळणं अशांमध्ये कालापव्यय होतो का? ह्याचबरोबर उलट उदाहरणं देखील आहेत मात्र ती अपवादानं नियम सिद्ध होतो अशा प्रकारची आहेत. हे लोक 'लिजंड्स' म्हणून ओळखले जातात.
प्रतिभेचं उगमस्थान नेमकं काय असतं? कुठून येतं हे सगळं?
अशा पार्श्वभूमीवर सांगायचं ते सांगून झालं म्हणून लेखणी न उचलणारे विंदा करंदीकर नि त्यांच्याच बरोबरीनं विस्मृतीत जाणार्या सिझनल कविता करणारे अनेक कवीवर्य ह्यात डावं उजवं करावं का???
सर्व क्षेत्रातील निरीक्षणं ह्यात यावीत असं वाटतं. निव्वळ हीच कारणं असतात की अपेक्षा, वयोमर्यादा, शारीरिक, मानसिक साथ, कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक जाण इ.इ.इ. सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
आपल्याला काय वाटतं?
प्रतिक्रिया
कलेच्या अभिव्यक्तींची सुरुवात...
प्यारें, आपने सही नस पकडी है,
रोचक विषय. उत्तम मांडणी आणि
Pagination