Skip to main content

सुख

मंगळवार, 09/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यभर सुखाकरिता धडपडणे किंवा त्याचा शोध घेणे हा माणसाचा आवडता छंद असतो. त्याचे अवघे आयुष्य या धडपडीत निघून जाते. पण नेमके सुख कशात असते हे त्याला समजत नसते. नेमके काय केल्याने सुख मिळेल हे त्याला समजत नसते. बालपण खेळण्या बागडण्यात, तारुण्य विषयोपभोगात तर वृद्धत्व माणसाला रोग व चिंता यांनी ग्रस्त अवस्थेत नेउन सोडते. त्यामुळे मिळालेले सुखाचे क्षण उपभोगणे हेच योग्य. कारण मनुष्य स्वभाव असा आहे कि सुखाचा सहवास घडला तर त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याऐवजी ते ओसरून तर जाणार नाहीना या काळजीने मन काळवंडून जाते म्हणून सुखात डुंबता आला पाहिजे. शेवटी सुख हे मानण्यावरच असते नाही का? तरीही क्षणिक सुखापेक्षा शाश्वत सुखाचा मार्ग प्रत्येकाने शोधून स्वीकारणे गरजेचे आहे. असे मला वाटते
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2141
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अर्रेर... ओ किंसन देव तुम्हाला हि नाहि माहित का ?

खरंय! मोजक्या शब्दात सत्य मांडलंय आपटे काकांनी.

शांताबाई शेळक्यांनी लिहिले आहे, दिसले सुख तो, लपले फिरुनी उरले नशिबी, झुरणे,जगणे | झुरत रहाण्यापेक्षा, लपलेल्या सुखाला शोधणे,हे महत्वाचे आहे, सापडेल की नाही ते सांगणे अवघड आहे. पण निदान, मनाला दु:ख करायला वेळ तरी मिळणार नाही.