Skip to main content

मध्यस्थ

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 03/03/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
भेट आपुली पहिली वहिली अशी ठरवली नव्हती नकोच होते मला कुणी गं आपल्या अवती भवती चार फुटांचे अंतर होते दोघांमध्ये तेव्हा सवाल माझ्या हृदयीचा तुज कैसा ऐकू यावा मनात राहून गेले सारे शब्द मनातील माझे माझ्यासम बोलणे राहिले तसेच अधुरे तुझे पुन्हा भेटशील एकांती तू वाट पाहू मी किती नको आणू पण कुणी बरोबर मध्यस्थ सोबती
लेखनविषय:

वाचने 692
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया