कधी कधी आयुष्य,
साचून राहिल्यासरखं वाटतं!
सगळे मु़ख्य प्रश्न
एकाच पदावर जाऊन बसलेले,
अनुत्तराच्या!
वेळेने तरी किती कळ सोसावी?
शेवटी,
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!!
मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमसाठी!
आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ,
सुगंधी.... वेडावणारा!
-वेणू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
759
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...! रचना वास्तवस्पर्शी