मी .हरवते ........त्याची कथा
मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती भाशा मला येत नव्हती.मनातून खूप भिती वाट्त होती.माझ्याकडे पासपोर्त,फोन,तिथले चलनही नव्हते.पत्त्ता माहीत नाही.सर्व धीर एकवटून मी तिथेच उभी राहून पोलीसाचा शोध घेउ लागले.तो लांबवर उतेभाहोता.आता तोच आपला तारणहार अथवा मारणहार.पण त्याच्यापर्यन्त जाणॅही अवघड होतें.कारण खूपच गर्दी होतीं.तेवध्यात मुलाचा निळा शर्ट दिसला्.हाक मारली.तो धावत आला.ती भेट अविस्मरणीय होती.परदेशवारीचा हा पहिलाच फटका.वयस्कर माणसानी आपल्याबरोबर परदेशात फिरताना कमीत कमी फोन बाळ्गावा ही विनंती.
वाचने
2854
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
अशा वेळी...
नक्की कोण हरवलं होत?
आमचाही अनुभव
आपल्याकडे आलेल्या वयस्क लोकांसाठी