सोनेरी पानं
लेखनविषय:
सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ?
हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी
अखेर गळतात.. एक दिवस ते ही
स्वागत पडुन नव्याचे करतात
तरुणाई चे जल्लोषात आगमन मग
करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले
वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस
अटळ सत्यच ते सांगुन जातात
सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना
अवमानात नाही कुठलीच प्रेरणा
उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक
न बोलता बरेच काही सांगुन जातात
ती सोनेरी पानं.
वाचने
1106
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
झकास
छान आहे कविता.
छान आहे कविता.