कामापुरता नर
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय?
कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा. तिने हल्लाबोल केल्यावर तो प्रतिकार करूच शकत नाही. जिच्याशी समागम झाला तीच त्याची वैरीण होते, भक्षक होते. त्या अल्प बळाच्या कोळ्याला काही सेकंदात गट्टम करून टाकते. खरे तर त्या नराचा जन्मच फक्त फलन कार्यासाठी झालेला असतो. त्याचे आयुष्य एखादी मादी भेटली की काही क्षणांचेच उरते. ते माहीत असूनही तो नर निसर्ग नियमानुसार तिच्याशी रत होऊन केवळ वंश वृद्धीसाठीसाठी बलिदान देतो.
वाघ, चित्ता, बिबट्या यांच्या माद्या पंधरा ते वीस वर्षे जगतात, नर मात्र फार फार तर पाच ते दहा वर्षेच तगू शकतात. एकदा का पिल्ले झाली की माद्यांच्या दृष्टीने नर अडगळ बनून राहतात. मग त्या आपल्या बछड्यांना, छाव्यांना वाढवण्यातच मश्गुल होतात. पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते. ते भटकत राहतात. नरांचे ‘उमेदीचे’ वय गेले की त्यांना कोणतीच मादी पुसत नाही. मग मात्र त्यांची उपासमार होऊन ते मृत्युपंथाला लागतात.
वरील उदाहरणे काय दर्शवितात? माद्यांचा आपमतलबीपणा, स्वतःचा स्वार्थ, मी अन् माझी पिलावळ, आत्मोन्नती, अहंभाव किंवा नराला दुय्यम ठरवण्याची आंतरिक प्रेरणा. आपण भले, आपले पोटाचे गोळे भले अन् आपली जिंदगी भली. हीच ती आत्मसंतुष्टता. नराचे तिकडे काहीही वाईट झाले तरी आपण कशाचेच देणे घेणे लागत नाहीत अशी माद्यांची एकंदर पद्धत दिसून येते.
मनुष्य प्राण्याच्या बाबतीत असे घडते का? नर केवळ ‘कामा’पुरताच वापरला जातो का?
उत्तर नक्कीच होय येऊ शकते. परंतु त्या ‘कामा’चा इथे अर्थार्थी फारसा संबंध आढळत नाही. इथे मुले बाळे झाल्यावर चित्तरकथा घडतांना दिसते. इथे वेगळ्याच कामासाठी नराचा उपयोग करून घेतला जातो. एकदा का मुले झाली की नराच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागतेच, लावले जाते, काही नर आपोआप ते जोखड अंगावर वागविण्याचे स्वीकारतात.
पुढील काही प्रश्न उपस्थित केल्यास भयंकर उत्तर मिळू शकते...
‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का?
‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का? किंवा मग अमूक तमूक मिळेपर्यंत ‘जवळ’ यायचे नाही असे प्रेमळपणे(?) धमकावून त्याची संयम परीक्षा घेतली जाते?
‘मुलं झाली की दोघांत अंतर पडतं, ती तिच्या मूल संवर्धनाच्या कार्यात व्यग्र होते तर तो त्याच्या बिझनेसमध्ये अधिक लक्ष घालू लागतो.’ ही वाक्ये दोहरून नक्की काय साध्य करायचे असते? स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय समजायचं? स्त्रियांची मनमानी की पुरुषांविरुध्द रचलेले षडयंत्र? स्त्री-मुक्ती चळवळीची उद्दिष्ट्ये कुणाच्या फायद्याची ठरतात?
मान्य आहे अबलेला आजवर फार सोसावं लागलंय. पुरुषी वर्चस्वाचं जोखड तिनं आजवर पेललं आहे. आज ती जाचक बंधन ती झुगारु पाहतेय ही स्तुत्य गोष्ट जरूर आहेच. तिलाही तिचं विश्व मनासारखं जगू द्यायलाच पाहिजे. परंतु हा सूड ठरता काम नये. स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषाला तुरुंगवास नसावा. तिलाही मन आहे, भावना आहेत. म्हणजे तिनं वाट्टेल तसे वागावे का? तिनं तिचं अवकाश प्राप्त करणं म्हणजे नरावर मादीचा वरचढपणा ठरतो काय?
किंवा उपरोक्त काही सत्य घटनांचा बारीक निरीक्षणांती योग्य अन्वयार्थ लावून आद्य मानवाने निसर्गातील नराची कामापुरती गोष्ट ध्यानात घेतली असेल का? आपल्याला तसे काही भोगावे लागू नये यासाठीच त्याने पुरुष प्रधानता जाणून बुजून प्रसृत केली असावी का? असे असेल तर स्त्रीच्या नैसर्गिक स्वभावातील ज्वालामुखी आत्ता या घडीला धुमसून उफाळला असेल का? पूर्वी पतीला परमेश्वर मानणाऱ्या स्त्रिया आता पुरुषाला नोकरासारखे वागवून घेतांना का आढळतात? यामागे तिने दमन केलेली उपरोक्त माद्यांचीच नैसर्गिक प्रेरणा असू शकते का?
काही कळायला मार्ग नाही...
("भिन्नावतरण" मधून..)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्हणजे बायकांनी घरातली कामं
एकांगी प्रतिसाद
पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा
पाशवी
एखादं महाभारतातलं नाव घेऊन तर
अनेक हापिसात बायकाच गवार,
अजाणुकर्ण आणि रेवती शी सहमत.
तसे करतातच
उशीरा थांबले तर ते फुकटात
होय
स्त्री कर्मचार्यांना
आमच्या ओळखीची आहे अशी एक बाई
(विषय दिलेला नाही)
+१
पण ती शक्ती गेली, तर काय
शेवट
नराधम (नर + अधम) हा समास
फारच चर्चा झाली या