परतून सांग तुजला बोलावणार कैसा?
नाहीस तू मनाला समजावणार कैसा?
पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी
कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा?
जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे
संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा?
चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली
भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा?
कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला
आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा?
मी हात लावल्याने कोमेजली बिचारी
निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा?
ना सांगता कधीही येतेस तू समोरी
माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा?
- स्वानंद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1209
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे गझल, पण अटून गेले, ही
+ १
In reply to छान आहे गझल, पण अटून गेले, ही by यशोधरा
सुंदर....!
आवडली .. लिहित रहा .. वाचत