कसं सांगू मी तुला,
माझ्या प्रितीच्या फुला,
तुझ्या वाचुनी मला,
आता करमत नाही......
मी झालो वेडा-पिसा,
हा रोग असा कसा,
चारचौघांमधे मी,
आता मिरवत नाही......
एकांतात बसुनी,
तुझे चिंतन मनी,
आठवण दुसरी,
आता करवत नाही......
स्वप्नी छळते फार,
खरं कधी येणार,
मिठीत येना धीर,
आता धरवत नाही.....
मिठीत येना धीर आता धरवत नाही.....
ही आमची उचापत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1480
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता आहे. दोन वळींमदली
हे छान..
झकास्स्स...