मी तर या प्रतिसादाच्या शिर्षकाचा आधी भलताच अर्थ घेतल्याने जागा पकडून बसणार होतो ;) पण नंतर कळले की हे दोन आयडीज ना उद्देशून संबोधन आहे, एकाच आयडीला नाही. :-) आणि काहीच थ्रील वाटेनासे झाले. :(
विकासदादा,आलाच आहात तर बसा थोडावेळ, हे बिपिनदादा महाराजांनी आणलेले पॉपकॉर्न खाऊन जा. पॉपकॉर्नची इच्छा केली की पॉपकॉर्न हजर! समस्त बापू लोकांला हे कांपिटीशन व्हनार हाय!
अवांतरः बिपिनदादा थँक्यू :)
सुरवातीला लोकांचे प्रॉब्लेम सोडवा. ते सुटले की बायप्रॉडक्ट = ऑपॉप भक्त!
असहमत!! ;)
आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये एका गुजराथी बाईच्या नवरात्रीच्या दिवसांत अंगात येत असे. एकदा तिने सांगितले की इथे कोणाची तरी आंगठी हरवली आहे आणि ती समोरच्या खांबाच्या उजवीकडे पडली आहे.
अहो! काय आश्चर्य? आंगठी लगेच मिळाली. लोकांनी बाईंच्या पायावर लोळण घेतली.
दुसर्या दिवशी बाईंचे शेजारी सांगतात की ती आंगठी बाईंचीच होती. गेली कित्येक वर्षे त्यांच्या बोटात पाहिली होती.
यावरून, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवले तरी भक्त मिळतात असे वाटते. ;)
तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा ठेवणारे आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत?
(तिकडे साउथ मध्ये आंबाबाई (की भगवान) अन तो कल्की नाही का "नवरा-बायको" अवतार? दोघांना फुल्ल मार्केट आहेच. तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या, एक बॉम्बे स्टाक एक्स्चेंज दुसरा एन. वाय! ;-) )
>आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत? ...तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या
इथे मी बाबा / बापू/ बुवा / गुरु इ. कसलाही दावा न करता, नाईल स्व:ताच अनुयायी व्हायला उतावीळ दिसतोय. यावरुन पहीला अनुयायी कसा 'मिळतो' याचे प्रात्याक्षीक मिळाले की.
कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच अद्भुताचे अलौकिकाचे वेड असते. मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो. त्याच्या आयुष्यातील काही घटना त्याच्या परमेश्वरावरची श्रद्धा एकतर अजुन प्रगाढ करतात किंवा त्याला नास्तिक बनवतात.
परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो.
कुठल्याही बुवा बाबावरची श्रद्धा ही त्या परमेश्वरावरच्या श्रद्धेचे एक्स्टेंशन असते. बुवा किंवा बाबांवरचे श्रद्धा ही एखाद्या माणसाची मानसिक गरजही असु शकते. कधीकधी ही मानसिक गरजच अध्यात्माचे स्वरुप धारण करते. एखाद्याला नैराश्येच्या गर्तेतुन जो बाहेर काढतो तोच माणुस त्याच्यासाठी मग परमेश्वराचा अवतार बनतो. मानसिक आजार हा जागातला सर्वात मोठा आजार आहे. प्रत्येक माणुस कधी ना कधीतरी डिप्रेशन मधुन जात असतो. त्यावेळेस जर त्याला अश्या मानसिक आधारतुन काही फायदा होत असेल तर वाईट काहीच नाही.
राहता राहिल प्रश्न पहिला अनुयायी मिळायचा. तर या प्रश्नाचे उत्तर बापुच जाणोत.
साफ असहमत. घरून बंबार्डींग झाल्यामुळेच माणूस, खरंतर मुलं, देवावर विश्वास ठेवायला शिकतात.
एखाद्या घटनेमुळे निरीश्वरवादी होणारा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही; (माझ्यासकट) माझे अनेक मित्र निरीश्वरवादी आहेत, ते सगळे व्यवस्थित विचार करून या विचारापर्यंत आले आहेत. हा दुसर्या चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो. पण तरीही मूळ गृहितकाला साफ विरोध!!
निरीश्वरवादी नसतो हे मान्य (कारण ईश्वर म्हणजे काय हे कुठे माहिती असते?)
पण मूल अश्रद्ध मात्र असते. म्हणजे आपली आई आपल्याला दूध देणार आहे अशी श्रद्धा नसते त्यामुळे ते दूध मिळेपर्यंत रडत असते. किंवा आपले खेळणे घरी आलेले पाहुणे बाळ घेऊन जाणार नाही अशी श्रद्धा त्याला ठेवता येत नाही. पहिले काही दिवस आई शाळेत सोडते तेव्हा ती थोड्यावेळाने आपल्याला घेऊन जाणार आहे ही श्रद्धा नसते. :)
ही श्रद्धा अनुभवांती निर्माण होत जाते.
उदाहरण चुकीचे आहे असे वाटते. असे बघा. या बाबतीत लहान मुलांचेच कशाला मोठ्या माणसांचे पण उदाहरण घ्या ना. मोठेपणी तुम्ही म्हणता तशी श्रद्धा निर्माण झालेली असते तरी माणुस दु:खीकष्टी होतो , टेन्शन घेतो. आणि हे सगळे तो देवावार किंवा बाबावर श्रद्धा असुन करतो. लहान मुलांचे तसेच आहे. श्रद्धा किंवा विश्वास म्हणा हवा तर, त्यांनाही असतो. पण रडणे ही स्वाभाविक क्रिया असते. मोठा माणुस प्रार्थना करतो, लहान मुले वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात एवढेच.
परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो.
आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो.
आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला.
अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला?
*(हा प्रसंग म्हणजे अतीप्रसंग नाही बरंका रे चावट परा)
आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे नाही का?
त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो.
इतरांनी काय सांगितले त्याच्यावरुन माझ्या मतावर भाष्य करु नये हे उत्तम. देवावर विश्वास चांगल्या गोष्टींमुळे सुद्धा बसतो. आणि कधी कधी कुठलीही चांगली वाईट घटना न घडता सुद्धा बसतो. मी या प्रकारातला श्रद्धाळु आहे.
आणि जर तुमचा देव नावाच्या संकल्पनेवर विश्वास नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीराम लागूंचा देखील नाही आहे. लाखातल्या ५-७ लोकांचा नसल्यामुळे देव नावाची संस्था नष्ट होत नाही.
बाकी हा फुटकळ शब्द काही रुचला नाही. असो. तुमची मर्जी. देव करो आणि तुमचा स्वत:च्या संकल्पनेवरचा विश्वास अढळ राहो.
आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला.
उदा?
अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला?
उदा?
बाकी देव कुबडी म्हणुन वापरत असाल तर तुम्ही दुबळे नक्कीच. पण माणुस दुबळा आहे म्हणुन देव अस्तित्वात नाही असा अर्थ तर होत नाही ना?
बाकी तुम्ही खंप्लिट रांग म्हणा आम्ही खंप्लिट करेक्ट म्हणतो. फरक कोणाला पडतो इथे?
एखाद्या आपली श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे हे माहित नसेल तर तो तिला श्रद्धाच म्हणतो. नागाची पुजा, वडाच्या झाडाची पुजा वगैरे लोक श्रद्धेनेच करतात. पुर्वी आकाशात स्वर्ग आहे आणि जमिनीखाली नरक आहे अशीही लोकांची श्रद्धा होती, अजुनही असेल काहींची.
देव नावाची संस्था नष्ट होत नाही.
देव नावाची संस्था कशी आहे काय आहे वगैरे सांगितलेत तर बरे होईल. अश्या कुठल्याही संस्थेबद्दल ऐकुन नाही.
बाकी काहीही म्हणा, एवढं लोळून लोळूनच जायचं तर तेवढी विल-power हवीच...आणि लोळणे, घास खाणे आणि एका पायावर ६ महिने उभे राहणे यापलीकडे या बाबाने काही केलं दिसत नाही..
तेवढं करायलाही मानसिक ताकद हवीच म्हणा..
असो..तुमचं चालु द्या.
परिस्थितीने गांजलेले लोक पाहून त्यांना जपजाप्य किंवा तत्सम प्रकार करायला सांगायचे. बर्याच लोकांना असं सांगितलं की योगायोगाने एखाद्याची परिस्थिती आपोआप सुधारते. त्याला वाटतं बाबाची कृपा! झालं मिळाला अनुयायी आणि प्रचारक.
अनामिक देवा, माझा अभ्यास नको तिथे चांगला आहेच. ;-)
असो. पहिला अनुयायी कसा मिळवला याच्या गोष्टी कोणीही देत नाहीये. अजून काही महिन्यांनी ही नोकरी संपली की काय करावं हा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. मायबाप मदत करा हो!
धाग्यात दिलेली तीन लक्षणेच पुरेशी आहेत पहिला भक्त मिळवायला.
तरीही बरेच दिवस वाट पहावी लागेल असे दिसताच सर्वसाधारणपणे लोक करू धजावणार नाहीत असे धाडसी विधान करावे. त्याप्रमाणे वागावेच लागते असे नाही, पण नुसते म्हणत रहावे. आश्चर्यचकित झालेल्यांपैकी एकतरी मासा गळाला लागतो असा स्वानुभव आहे. ;)
चार शिकलेले मित्र एका ठिकाणी रात्री दारु पित बसले होते. त्याच्या व्यवसायाबद्दल गप्पा चालु होत्या. विषयाविषयातुन एकाने त्याना एका नावाजलेल्या संताबद्दल व त्याच्या वस्तुबद्दल माहिती दिली. अमुक ह्या संताने त्याच्या वस्तु अमुक ठिकाणी एका व्यक्तीजवळ ठेवल्या आहेत. व सदर वस्तु परत नेण्याकरिता पुढच्या जन्मी परत येईन असे सांगितल्याचे कथन केले. त्यातल्या एका मित्राची ट्युब पेटली. त्याने काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या घरी जावुन मी संत असुन मागच्या जन्मीच्या ह्या ह्या वस्तु मला परत करा म्हणुन सांगितले. काही वेळा नंतर त्या कुंटुबाची खात्री पटली कि तो संत परत जन्म घेवुन वस्तु परत मागायला आला आहे. मग काय वस्तु मागणारा फुल्ल टाईम बाबा बनला.
असे काय घडले तर तुम्ही पण बाबा किंवा अम्मा बनु शकता.
कोणाही भोवती किमान पाच दहा विश्वासू लोकांची गर्दी असतेच... मग त्या पाच दहा जणांना तुम्ही तुम्हाला झालेला साक्षातकार सांगीतला तर २-४ जणांचा तरी विश्वास बसेलंच, झाले अनुयायी तय्यार! आणि मग ही चेन अॅमवे सारखी वाढतच जाणार, नाही का?
धागालेखिकेचा उद्देश श्रद्धावंतांची टवाळी करण्याचा नसावा असं वाटतंय, म्हणून हा प्रतिसाद लिहिण्यासाठी वेळ घालवायला हरकत नाही.
लेखात असा प्रश्न उपस्थित केलेला आहे, की “या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे?” मला वाटतं असाच प्रश्न श्रद्धावंतांनापण पडू शकतो, की या अश्रद्धांना कसं काय वाटत नाही, आपण गुरूला शरण जावं, जगण्याचा अर्थ समजून घ्यावा. हे स्वत:ला इतकं शहाणं समजतात, तरी इतके अज्ञानी असतात, स्वत:च्या शिरावर जगण्याचा भार घेऊन दु:खी आयुष्य जगत राहतात.
अश्रद्ध म्हणतो, you show me first, then I believe. सश्रद्ध म्हणतो, you believe, and you shall see. हा तिढा केंव्हाच सुटणे शक्य नाही. आयुष्याकडे बघण्याचे दोन अतिशय भिन्न असे हे कोन आहेत. या दोन्ही भूमीकांमध्ये कुठलीच भूमीका त्याज्य असण्याचं काहीच कारण नाही. रामकृष्ण परमहंस आणि ईश्वरचंद्र विद्यासागर ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. पहिले टोकाचे सश्रद्ध; इतके की ज्या कालीला बघायची आस होती ती दिसत नाही तर आपली मुंडी कापून घ्यायला तयार झाले. दुसरे म्हणायचे काय करू मी त्या कालीला बघून? ती आहे की नाही हेपण नक्की माहीत नाही. समजा असली, तरी ती दिसून काय फरक पडणार आहे, जगातली दु:खं कमी होणारेत का? पण दोघांनाही एकमेकांच्या मार्गांविषयी हरकत नव्हती. ईश्वरचंद्र कधी रामकॄष्णांना वेडा म्हणाले नाहीत, आणि रामकृष्ण त्यांना कधी मूर्ख म्हणाले नाहीत, उलट म्हणाले, त्यांच्या हृदयात मानवप्रेमाचा ईश्वर वास करतोय, त्यांना कालीच्या दर्शनाची आवश्यकता नाही.
असो. आता “बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना” अनुयायी मिळण्याविषयी. ही तर आपल्या देशात चालत आलेली हजारो वर्षांची परंपरा आहे. यांना अनुयायी मिळतातच कसे, किंवा पहिला अनुयायी कसा काय मिळतो हा प्रश्न पडायचे खरे तर कारण नाही. प्रश्न पडला आहे, कारण मला वाटतं लेखिका आपल्या दृष्टीकोनाशी ठाम आहे. इतकी ठाम, की दुसरा दृष्टीकोन असूच शकत नाही, असलाच, तर तो बरोबर/ योग्य असू शकत नाही असं तिला वाटत असावं. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अरविंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदासादि संत यांच्याविषयी तिची काय मते आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. तात्पुरते असे गृहीत धरतो, की तिच्या मते हे लोक भोंदू नाहीत. यांच्याविषयी प्रचलित असलेल्या चमत्कारांच्या कथांविषयी मी काही बोलणार नाही. पण यांच्या साहित्यात लोकशिक्षणासोबतच अनेक गूढ आध्यात्मिक अनुभूतींचे वर्णन आहे. ते नाकारणार का? आणि अशा गूढ आध्यात्मिक अनूभूतींची वर्णने वर्षानुवर्षे चालत आलेली आहेत, आणि अशा व्यक्तींना आपला समाज वंदनीय ठरवीत आलेला आहे. त्यांना वेडं ठरवलेलं नाही.
वरील मान्य असेल, तर आता मुद्दा येतो, की खरा गुरू कोण आणि खोटा कोण. (वरील मान्य नसेल तर मुद्दा निकाली निघाला! सगळेच “गुरू” खोटे!) यावर वेळोवेळी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी भाष्य केलेले आहे. गौतम बुद्धापासून विवेकानंदांपर्यंत अनेक विभूतींनी अशा खोट्या बुवांची लक्षणे सांगीतलेली आहेत. रामकृष्णांनी नागाचा आणि साध्या सापाचा दृष्टांत दिलेला आहे. विवेकानंद म्हणतात जिथे अस्सल आहे, तिथे नक्कल असणारच. जास्त फायदा असेल तर नक्कल नक्कीच असणार. खरे गुरू, खरं अध्यात्म आहेच आहे, म्हणूनच खोटे भोंदू गुरू, खोटं अध्यात्म पण आहे. एक खरा गुरू असेल तर हजार/ लाख भोंदू बाबा निघणारच.
कोण भोंदू आणि कोण सद्गुरू हे ज्याचे त्याने आपल्या विवेकबुद्धीने, अनुभवाने ठरवावे. गजानन महाराज, अनिरुद्ध बापू, साईबाबा यांच्याविषयी मला विशेष माहिती नाही. त्यांचे काही साहित्य (असल्यास) वाचलेले नाही. त्यांनी काही ध्यान पद्धती शिकवली असल्यास माहीत नाही. त्यांनी कुणाला लुबाडले आहे की कसे, हे माहीत नाही. त्यांच्या शिष्यांपैकी कुणी (सार्वजनीक आयुष्यात) आउटस्टॅंडींग पर्सनॅलिटी आहे की नाही तेही माहीत नाही. त्यामुळे ते भोंदू की सद्गुरू याविषयी मला काहीच बोलता येणार नाही. कुणाच्या मते ते भोंदू असतील तर तसे त्यांनी दाखवून द्यावे. उगीच टवाळी कशाला करायची? अशा बाबांवर श्रद्धा ठेवणारे लोक असतात त्यांची उगाच खोड काढून कसला विकृत आनंद मिळतो हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. जर या भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेल्या बिचाऱ्यांची दया येत असेल, तर भोंदू बाबांचे अध्यात्म कसे चुकीचे आहे, आणि व्यक्तीसाठी आणि समाजासाठी कसे हानीकारक आहे याची चर्चा जरूर व्हावी. आम्ही बघा कसे शहाणे, हे बाबा लोकांकडे आपली बुद्धी गहाण ठेवणारे लोक कसे मूर्ख आहेत, असा फुकाचा अहंकार दाखवून निखळ करमणुकीचाही हेतू साध्य होत नाही, कारण काही लोक त्यात नक्कीच दुखावले जातात.
(सहिष्णु)
मान्य आहे. अज्ञेयवाद्याला अश्रद्ध म्हणता येईल का? कारण अश्रद्ध नेहेमीच "आय डोन्ट बिलिव, पिरिअड." म्हणणार नाही. "दिसल्यावर" तो नक्कीच म्हणेल, ओके, नाउ आय बिलिव्ह.
अवश्य वाचीन, आणि विचार करीन. थँक्स!
वेल! तुम्हाला काय म्हणायचंय ते आलं लक्षात. पण इथे विषयांतर होतंय. माझा प्रतिसादातला तो शब्द बदलल्याने मला काय म्हणायचंय ते बदलत नाही. असो.
राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद नीट, वेळ काढून वाचते आणि धागा मागे गेला असेल तर आपण खरडी-व्यनीतूनही बोलू शकतो.
माझे व्यक्तीगत आयुष्यातही असे मित्र आहेत ज्यांचे कोणी ना कोणी गुरू आहेत, पण ते गुरू 'बाबा' नाहीत; मार्ग दाखवणारे आहेत, प्रयत्न करायला सांगणारे आहेत; हवेतून अंगठी काढून दाखवणारे आणि नळातून पाणी आणून देणारे नाहीत. त्या अर्थानेतर पुस्तकं, काही मित्रं, काही आप्त हे ही आपले गुरू असतातच ना!!
माझा संपूर्ण रोख भोंदू बाबांवर आहे. संडासात पाणी आणून देणार्या 'बाबां'ना पहिले अनुयायी मिळतातच कसे, लोकं डोकं बाजूला ठेवायला एवढे का उतावळे असतात असा मला प्रश्न पडला आहे.
ओह! हे वाचायचं राहिलंच.
एनी वे, श्री घासकडवींनी क्लास उत्तर दिलेले आहेच. आणि तुमचा प्रश्न थोडासा बाजूला ठेऊन मी माझंच एक तुणतुणं पुढील काही प्रतिसादांमध्ये वाजवत बसलो होतो!
अज्ञेयवादी याचा अर्थ ईश्वराच्या अस्त्त्वाचे ज्ञान आपणास नाही असे मानणारा असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. म्हणजे थोडक्यात ज्यांना कुठलाच स्टान्स घ्यायचा नाही(आस्तिक अथवा नास्तिक) यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. चूक किंवा बरोबर कसाही असो पण एक स्टान्स असला पाहिजे.
प्रतिक्रिया
बाजूला सरका. मलापण जागा हवीय
पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं
मी तर
विकासदादा,आलाच आहात तर बसा
हा भला थोरला पॉपकॉर्नचा फोटो
एलेमेंटरी माय डियर वॉटसन - शे. हो. उवाच
लोकांचे प्रॉब्लेम?
सहजकाका आमचे लै प्राब्लेम्स
?
तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा
लो कर लो बात!
वा तुम्ही आमचे सगळे प्राब्लेम
घ्या!
नो, इन दॅट केस यु वान्ट टु
कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच
साफ असहमत
मुळात कुठलाही माणुस जन्मजात
अश्रद्ध
उदाहरण चुकीचे आहे असे वाटते.
खंप्लिट रांग
आज पर्यंत मी ज्या ज्या
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
मला तर लोटन बाबा फार
बाकी काहीही म्हणा, एवढं लोळून
परिस्थितीने गांजलेले लोक
बाय.. एवढे विवीध उपाय मिळतायत
आप कतार मे खडे है. कृपया
लगेच श्री.* अदिती अम्मा देवी
अनामिक देवा, माझा अभ्यास नको
एकच श्री लिहिल्या बद्दल जाहीर
धाग्यात दिलेली तीन लक्षणेच
एका बाबाची एकलेली कहाणी.......
माझ्याकडे कुणीही कसल्याही
उद्या तुमच्याकडे येउन
कोणाही भोवती किमान पाच दहा
द्विशतकी धागा
मिरासदार
बाबागिरी/ बुवाबाजी
हे उत्तर आवडले..योग्य वाटते
किंचित बदल
मान्य आहे. अज्ञेयवाद्याला
नाही हो!
अवश्य
राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद
ओह! हे वाचायचं राहिलंच. एनी
अज्ञेयवादी याचा अर्थ
सहमत आहे. अभ्यास करण्याची
खुपच संतुलित आणि मुद्देसुद
हे संतुलनाचे स्तोम फारच झाले
तुम्ही स्वतःच्या हाताने