Skip to main content

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी सोमवार, 31/03/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड... तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व विसरून ती त्याचीच बनून जाते एकदा सागरात विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं!
लेखनविषय:

वाचने 6446
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया