~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान!
२१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!.....
राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~*
STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU....... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
वर्गीकरण
प्रतिक्रिया
राजीव
राजीव
या लेखातील
राजीव
मेल्या म्हशीला मणभर दूध
काही प्रश्न
काही वाटेल
मेल्या
मेल्या
निदान राजीव गांधींमुळे आज आपल्या सरकार ला
तसेच लॉर्ड
"अस्थायी" नाही बे!
क्लिंटन
तीच विनंती
अगदी
वर
- वर आलेली एक गोष्ट म्हणजे टेलीकम्युनिकेशन्स आणि तत्सम विषयातील मोठा फरक. सॅम पित्रोदा यांचे नाव वर आले आहेच.
- जॉर्ज बूश (पहीले) यांनी सुपरकाँप्युटींग भारताला न देण्याचे ठरवले आणि त्या संदर्भात उद्दामपणा केला. त्यावेळी भारतीय शास्त्रज्ञांनी तो प्रकल्प जिद्दीने उचलला आणि राजीवजींनी त्याला सक्रीय पाठींबा दिला - तो म्हणजे परम प्रकल्प. ज्याने भारताचे अधुनिक तांत्रिक क्षेत्रातील नाव वर आले. विजय भटकर सगळ्यांना माहीत असतीलच. यावर बरेच काही लिहीता येईल. पण तुर्तास इतकेच.
- लोंगोवाल करार करून पंजाब प्रश्नावर तोडगा काढण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न. तसाच करार आसाम स्टूडंट्स युनियन (आसू) बरोबर केला आणि मला वाटते मिझोराममधे पण. यातील प्रत्येकाला काही अंशी यश आले. अपयश आले असले तरी टिका करण्यासारखे नाही.
- आईने केलेली ऑपरेशन ब्लूस्टारच्या वेळची संवाद न करण्याची चूक, ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेस भरून काढली आणि यशस्वी ऑपरेशन केले.
- अरूणाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला. हे खूप महत्वाचे होते आणि आजही आहे. (वरील करार तसेच अरूणाचल प्रदेशाच्या बाबतीत तत्कालीन गृहसचीव राम प्रधान यांचा महत्वाचा भाग होता).
- बाकी एक स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व मिळाले. त्यात वर एका प्रतिसादात आल्याप्रमाणे, दिसणे उपयोगी पडले. पण तो दोष होऊ शकत नाही.
मात्र जसे वर उल्लेखलेल्या गोष्टी नक्कीच स्पृहणीय आहेत, तशाच त्यांच्या तितक्याच मोठ्या चुका पण झाल्या आहेतः- सगळ्यात मोठ्ठी चूक ही शहाबानो प्रकरण. वर क्लिंटन यांच्या हिंदूकोड बिलाच्या मुद्यापेक्षा ही मोठी घोडचूक होती. कारण नेहरूंनी घटना दुरूस्ती केली नव्हती. त्यांच्या नातवाने सुप्रिमकोर्टाचा निर्णय उलटवायला घटनाच बदलली. आणि ती देखील आमच्या कडे ३/४ बहुमत आहे आम्ही काही करू शकतो या माजाने.
- श्रीलंकेत पाठवलेली शांतीसेना. कुठलाही प्लॅन न करता केलेले हे कृत्य होते. वर एका प्रतिसादात त्या सैनिकांनी तेथे जाऊन अत्याचार केले असे म्हणले आहे. वास्तवीक उलटेच झाले होते. हे भारताचे व्हिएटनाम होते. त्यात सैनिकांचे हाल झाले. तेथे मरून आणि त्याहीपेक्षा माघार घेतल्यावर येथे आल्यावर जी वाईट ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे. त्याचेच फळ एका अर्थी त्यांनी भोगले जसे इंदीरा गांधींनी पंजाबमुळे भोगले.
पंतप्रधान असताना शेवटच्या काळात ते वैयक्तिक कितीही चांगले असू शकतील असे वाटले तरी त्यांचे "सत्तेच्या दलालांवर" (हे त्यांचे शब्द आहेत) काहीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले. मग उगाच "हम उनको उनकी नानी याद दिलायेंगे" वगैरे सारखे पोकळ टाळ्याखाऊ बोलणे करणे चालू झाले. थोडक्यात नेतृत्व म्हणून कच्चेच ठरले. फक्त जिथे जिथे त्यांना चांगले सल्लागार मिळाले तेथे तेथे त्यांचे निर्णय यशस्वी ठरले. स्वतःच्या दिशा देणे हा वेगळाच मुद्दा झाला. हे वास्तव आहे असे वाटते. आता क्लिंटन यांच्या दोनच प्रश्नांना उत्तरे: सर्वप्रथम, यात भाजपाची बाजू घेणे हा उद्देश नाही... मी भारतात सध्या रहातही नाही आणि त्या अर्थाने राजकारणाशी संबंधही नाही.. राजीवजींना विरोध कोण करते बघा-- भाजीपचे (भारतीय जीना पक्षाचे) नेते. भारतीय राजकारणातील विरोधाभास कसा स्पष्टपणे दिसतो बघा. राजीवजींच्या विरुद्ध भाजपा आणि संघ परीवार हा केवळ शहाबानोप्रकरणामुळे गेला होता. हिंदू द्वेष्टे व्हिपी सिंग यांनी राजीव द्वेष हा बोफोर्स च्या निमित्ताने चालू केला आणि "तुमच्याहून अधिक स्वच्छ" हे राजीवजींना दाखवण्याच्या निमित्ताने वाढवत ठेवला. भाजपाने त्याचा राजकीय फायदा नक्कीच उचलला. विशेष करून बोफोर्स संदर्भात. आजही त्यात भ्रष्टाचार झाला नाही हे कोणी अमान्य करत नाही, फक्त किती झाला आणि त्यात राजीव किती सहभागी होते हा मुद्दा कुणालाच कळू शकणार नाही. तसेच थोडेफार, काँग्रेसने जॉर्ज फर्नांडीस यांच्या विरुद्ध आवाज उठवला, सत्तेत आल्यावर चौकशा समित्या बसवल्या आणि आता स्वतःच त्यांच्या विरुद्धच्या चौकशा विशेष प्रसिद्धी न देता थांबवल्या आहेत. बाकी पॉलीटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज हे प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवावे. गांधीचे पुतळे काढून नथुरामचे ठेवा असे म्हणणारे भुजबळ हे नंतरच्या लगेचच्या निवडणूकीत काँग्रेसला चालले होते हे वास्तव आहे. तेच वास्तव समाजवादी विचारसरणीत देखील असेल. कदाचीत एकमेव अपवाद असेल तर तो कम्युनिस्टांचा, पण मग त्यांना भारतापेक्षा चीन चालतो हे अजून एक भयानक प्रकरण... मात्र वरील प्रतिसादात असे दिसते की असे केवळ भाजपनेच केले अथवा असे भाजपने करू नये. अनेक लोक म्हणतात की राजीव गांधींना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून पंतप्रधान केले. मला ते पटत नाही. फार तर त्यांना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले हे मान्य करता येईल. पण पंतप्रधान म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले होते. हे विधान अर्धसत्य आहे. पूर्ण नसण्याचे थोडे कारण इतकेच, की काही झाले तरी ते केवळ गांधी-नेहरू घराण्यातील म्हणून इंदिरा गांधींच्या निधनानंतर पंतप्रधान होऊ शकले. वास्तवीक कायद्याप्रमाणे विचार केल्यास मंत्रीमंडळात "नेक्स्ट इन लाईन" असलेले (मला वाटते) प्रणवकुमार मुखर्जी अथवा नरसिंहराव हे हंगामी पंतप्रधान होयला हवे होते. मात्र राजीव स्वतः मंत्रीमंडळात देखील नव्हते. ते कलकत्यात होते. त्यांना बोलावून त्यांचा शपथविधी करवून मग इंदीरागांधींच्या निधनाची बातमी जाहीर केली गेली. नंतर अर्थातच ते ८५च्या निवडणूकात स्वबळ आणि इंदिराहत्येच्या सहानभूती लाटेवर निवडून आले. त्या घटनेला खूपच प्रसिद्धी मिळाल्याने, अगदी पाश्चात्य देशातील एका (ब्रिटीश की अमेरिकन) बाईची पण मुलाखतीत "बिचार्याची आई गेली" असली प्रतिक्रीया वाचल्याचे आठवते. तेथे भारतातील जनतेचे काय विचारता? मुखर्जी आणि राव यांना त्याकाळात हंगामी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल (राजकीय पॉवर वनवासाची) शिक्षा झाली होती असे आठवते. असो. यावरील इतर मुद्यांवर वेगळी डोळस चर्चा झाली तर उत्तम असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)प्रतिसाद
१२५ आणि घटना
बोफोर्स
नोकरशहा
राजीव गांधी
विकास आणि
सर्व
पुढील चर्चा
आज २१ मे. २०११.
राजीवजींच्या स्मृतीला विनम्र
अगदि टाईम्स नाऊ वर चाललेल्या
कालची आमटी आज उकळून(नवीन
आम्बोळी'जी!... शिळ्या आमटातलं
मसाले कमी पडत असतिल तर मागनी
*~*~*~ राजीव'जींना सर्व
नाठाळाला श्रद्धांजली नाही.
भारतीय राजकारणात फक्त आणि
राजीव.....जीं
(No subject)
पगडीधारी कोण?
अविनाश'जी... वरच्या फोटोतल्या
<<<पण आपल्या पुढच्या पिढीच्या
किती हजार कोटी म्हणजे उचीत
महारथी??
क्लिन्टन'जी.. तो फोटोतला
आवरा!
भावपूर्ण श्रद्धान्जली
?
असेच म्हणायचे असेल
२१ बोफोर्स तोफान्ची सलामी
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~.
ठ्ठो =)) =)) =))
शिसार्या
*~*~*~* राजीव'जी... आपल्या