चाराणे कमी !!
णमस्कार्स लोक्स ,
अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :-
खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे. बाकीच्यांनी लुफ्त लुटावा.
"चाराणे कमी" एवढ्या करतांच , की पात्रांनी जर 'चाराणे" वापरले असते , तर बरीच हिंसा/नुकसान टाळता आलं असतं , तसंच त्यांचं वागणं "सेंसिबल" होऊ शकलं असतं
आमचा मित्र परिवार एकं तर डॉक्टर नाही तर इंजिनियर ह्यातलांच , त्यामुळे सगळे कसे हाडाचे नास्तिक. पण आमचे पालक डबल हाडाचे आस्तिक. कोणाच्या तरी घरी , कधीतरी असाच देवदेव विषय चालु होता , त्या रात्री आम्ही "नाईटवॉक" ला गेलो .. तेंव्हा सुचलेले काही विचार , किंवा ग्रंथपुराणातले बग्ज म्हणा नां ? तर ह्या बज्ग वर जेंव्हा आम्ही विचार मंथन केलं , टेक्निकल अॅनॅलिसीस करण्याचा प्रयत्न केला , तेंव्हा आम्हाला गडबडाट लोळण्याशिवाय काहीही रिझल्ट्स हाती लागले नाहीत .
पौराणिक संदर्भ : लक्ष्मणाने "लक्ष्मणरेखा" आखुन स्वतःचं कर्तव्य चोख पार पाडलं होतं , पण सितेने लाईन क्रॉस केल्याने रावण तिला पळवुन घेऊन जाऊ शकला .
अॅनॅलिसिस : लक्ष्मणाला भुमितीच्या क्लास ला जाण्याची सक्त गरज होती. कारण भाऊ ने एक लाईन मारली होती, जिला "लक्ष्मणरेषा" असे म्हणतात. आता लक्ष्मणरेषेची लांबी जास्तित जास्त किती असेल ? तर उंबरठ्या एवढी , चला मोघम माप घेऊन त्याच्या डबल गृहीत धरू , तरीही रावण (ज्याला बुद्धीचं आणि शक्तीचं वरदाण होतं , असा पौराणिक दावा आहे) एवढा मुर्ख होता , की त्याला उगीचंच वेषांतर करुन स्वतःच्या पावरचं असं पाण्चट प्रदर्शण करण्याची गरज नव्हती. तो त्या लाईणच्या दुसर्या बाजुनं येऊ शकला असता, गेलाबाजार मागल्या दारानं किंवा खिडकीतुन आत येणं रावणासारख्याला सहज शक्य होतं , लक्ष्मणाने काही फुटांची लाईन मारली होती , पृथ्वीला "लक्ष्मणपरिघ" नव्हता मारला . तरीही रावणाने वेषांतर पॉवर वापरली . आता सितेच्या बुद्धीचं कौतुक मी काय करावं ? लक्ष्मणाने रिक्वायरमेंट अॅनॅलिसीस ठिक केलं नव्हतं , त्याने 'फक्त रावण किंवा राक्षस" ह्या इनपुट साठी एक्सेप्शन हँडल केलं असतं तर चालु शकलं असतं , त्याने कोडींग मधे टाईमपास केला , आणि फक्त सितेला रेषा क्रॉस करणे अलाव्ह केलं , गेला बाजार त्याने वर्तुळ जरी आखला असता , आणि पुर्ण पर्णकुटी त्यात कव्हर केली असती तर ठिक होतं.
समरी : अलिखीत नियमांचं त्या काळी पालन केल्या जात होतं (कोणालाही स्वतःचं एक्स्ट्रा डोकं चालवण्याची मुभा नव्हती) , जर लक्ष्मणाने सिता रक्षणासाठी रेषा मारली होती , तर सिता पळवायची तर त्या लाईनला क्रॉस करुनंच , एवढी प्रामाणिकता पाळणारा रावण , नैतिकते मधे का मार खाऊन गेला ?
पौराणिक संदर्भ : जेंव्हा रामाचे दुत सिता शोधार्थ चहुदिशेला गेले , त्यात हनुमानाला सितेचा शोध लागला , सिता बहुतेक हनुमानाला ओळखत नव्हती , म्हणुन श्रीरामांचं एखादं सिग्नेचर टोकण असणं जरुरी होतं त्यासाठी तो रामनिशानी घ्यायला परत आला. रामाने सितेला स्वतः मुक्त करण्याची इच्छा दाखवली आणि हनुमानाला तिला घेऊन येण्यास मज्जाव केला. मुक्त केल्यावरही सितेला अग्निपरिक्षा अर्थात प्यॉरिटी टेस्ट द्यावी लागली.
अॅनॅलिसीस : इतर वेळी संयमाचं काम दाखवणारा , युद्ध टाळावं म्हणुन प्रयत्न करणारे श्रीराम , इथे हनुमानाकरवी (कडवी नव्हे) सितेला सोडवु शकला नसता काय ? हजारो लाखो (सर्व आकडे ऐकिव माहिती च्या आधारे) वानर्स आणि राक्षस , ज्यांचा ह्या युद्धाशी काही एक संबंध नव्हता ,त्या णिष्पाप जिवांना स्वतःच्या स्वार्थास वेठीस धरलं होतं. (युद्धात मेलेल्यांना मुक्ति मिळते, हा हस्यास्पद प्रतिवाद आहे ) येथुन श्रीरामांनी जो स्वार्थ महत्वाचा असण्याचं उदाहरण दाखवलं आहेत , त्याला आता पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणुन इन्क्लुड केलेलं नाही . रामानं सितेला शेवटी भल्या मोठ्या नुकसानानंतर सोडवलं सुद्धा , पण त्यातही त्याने स्वतः सितेवर विष्वास दाखवलेला नाही, ह्यावरुनंच बायको वर अविश्वास दाखवण्याची परंपरा रुढ झाली असावी.
समरी : रामाने सरळ घास खाण्या ऐवजी , करोडोंचं आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय घेतला , तरीही राम आज देव कसा ?
पौराणिक संदर्भ : आकाशवाणी १०१.० मेगाहर्ड्झ वर "मथुरा डेअरी सकाळच्या बातम्या" मधे सांगितलेल्या वृत्तानुसार देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार होता.
अॅनॅलिसीस : कंसा एवढा सर्व बुद्धिमाण प्राणी मी आज तागायत कोणत्याही सिरीयल मधे पाहिला नव्हता. पण त्याआधी, ( कंसाचं आपल्या बहिणी बरोबर अतिशय छाण होतं , पण आकाशवाणी मुळे तो त्या पोरांचा दुष्मण झाला होता. असो, विधाताच स्क्रिप्ट रायटर असल्यावर तो वाटेल ते लिहु शकतो.) आकाशवाणी झाली तेंव्हा देवकी-वसुदेवाचा नुकताच विवाह झाला होता. आता ह्या हुषार कंसाने काय करावं ? ह्याला ही सरळ घास खायची आवड नसावी. आकाशवाणीमधली कंडीशण ऐकुनही पठ्ठ्यानं देवकी-वसुदेवाला "एकत्र" राहु दिलं लोकंहो , किती हुशारपणा ? देवकी आणि वसुदेवाचंही कौतुक करावं तेवढं थोडंच ... जेल मधल्या वातावरणात सुद्धा त्यांच्या इच्छा जागृक होत्या , ह्याचं सुद्धा आम्हाला आश्चर्यं वाटुन गेलं . जेलंवर चोविस तास पहारा होता, आणि सैनिक त्यांना ऑल टाईम पाहु शकत होते , तरीही त्यांची हिंम्मत होऊ शकली. असो. ज्याची त्याची आवड,ज्याची त्याची सवड.
१.कंसाला दोघांना वेगवेगळ्या सेल्स मधे ठेवता येउ शकलं असतं का ?
२. आठ पोरांच्या खुणाचं पाप घेण्यापेक्षा एकट्या देवकीचा खुण सोयिस्कर ठरु शकला असता का ? आणि उगाच आठ वर्ष स्वतःच्या डोक्याची आणि झोपेची मंडई तो थोपवु शकला असता का ?
३. फॅमिली प्लानिंग तेंव्हा होतं की नाही ? हा संदिग्ध मुद्दा असल्याने कंसाला ह्या उपायाबद्दल बेनेफिट ऑफ डाऊट दिला आहे.
समरी : ह्यातुन निष्कर्ष काढणे आमच्या बुद्धीपलिकडे आहे. कंसंच जाणो तो एवढा हुशारपणे का वागला.
पौराणिक संदर्भ : कौरवांनी पांडवांवर अनेकदा कुरघोड्या केल्या , त्यांना पाण्यात पाहिलं , छल कपट वगैर केलं , आणि म्हणुन पांडवांकडुन ते धर्मयुद्धात हारले. आणि अनेक चमत्कार्स.
अॅनॅलिसिस : महाभारत हा पुर्ण ड्रामा होता, आणि त्यातली प्रत्येक पात्रे व्यासमुनींनी लिहीलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे वागत-बोलत होती. इतर वेळी संयमाचा सल्ला देणारा श्रीकृष्ण , युद्धात मात्र एकदम पलटुन गेला , पांडवांना प्रत्येक वेळेस प्रत्येक मोहोरा टिपतांना छल - आणि कपटाचाच सहारा घ्यावा लागला . आता कृष्णाचेच नियम वेळेनुसार बदलल्याचं सत्य समोर येतं तेंव्हा अशा वेळेनुसार (कारण नसतांना) बदलणार्या श्रीकृष्णाला देवाचा दर्जा का ? जर आधीपासुन चालणार्या कपटांना मुकाट्याने सहन केलं नसतं आणि तेंव्हा उगाच *डु धोरण स्विकारलं नसतं तर महाभारत वाचवता येऊ शकलं असतं का ? पर्यायानं पुण्हा अनेक निरपराध माणसं , घोडे , हत्ती वाचवता आली असती का ? जुगार (पक्षी: द्युत) खेळल्याने माणुस कसा देशोधडीला लागतो , हा एवढा साधा सिद्धांत मांडण्यासाठी एवढा मोठा ड्रामा घडवुन आणनं पटत नाही. बाणांचं इंटेग्रेशन (म्हणजे एकाचे शेकडो बाण होणे) फिजीक्स च्या कोणत्याही नियमात नं बसणारे आहे (तशा एन गोष्टी आहेत हा भाग अलहिदा).
समरी : महाभारत ही एका सिरीयल ची स्क्रिप्ट आहे , सगळं कसं पुर्व नियोजीत आहे , आणि त्यात मुर्खपणाचा कळस गाठलेला आहे.
अजुन काही मजेशिर आणि रोचक गोष्टी मी ग्रंथ , मालिका , इत्यादी माध्यमांतुन आपण पाहातो.
पुराणातली (विशिष्ठ) लोकं कधीही कुठेही (ढिष्ष करुन) प्रकट/गायब होत होती. मालिकांमधे दाखवल्यानुसार हे लोक , दरवाज्यात प्रकट होत , आणि मग आत येत. उदा. कोणत्यातरी राजाचा दरबार भरलाय , नारदमुणी बरोबर दरवाजात (ढिष्ष करुन) प्रकट होतात. आहो चालायचा त्रास घ्यायचं काय बरं कारण ? व्हा की कुठेही प्रकत (लोकांची अंतःपुरं सोडुन),
इंद्र हा त्या काळचा सर्वांत पिडीत देव/व्यक्ति होता , त्यानं कधीच स्वर्गावर एकाधिकार शाही दाखवली नाही , सदा न कदा बिचारा ह्याच विवंचनेत , उद्या मी स्वर्गात असेन की नसेन ? आणि काही झालं की , उठले सगळे देव न निघाले (ज्याचा कार्यक्रम असेल त्या) मोठ्या देवांकडे , म्हण्जे जर ओम नम:शिवाय सुरु असेल तर नेहमी शंकराचा सहारा घेतला जातो , विष्णुचा असेल तर विष्णुचाच धावा लेका जातो , गेलाबाजार "जै गंगा मैय्या" चालु होतं तेंव्हा इंद्राने त्या बिचार्या गरिब गंगेकडेही ३% ने मदत मागणे सोडले नाही. तर असा हा ना-लायक इंद्र , स्वर्गावर राज्य करण्याच्या लायकीचाच नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे. :)
असो .. सांगण्यासारखे अनगिणत किस्से आहेत , पण लिहीण्याला मर्यादा आहेत. वर सांगुणही ज्या आस्तिक लोकांनी लेख वाचला आणि त्यांच्या भावणा दुखावल्या गेल्या तर त्या लोकांची माफी मागतो :)
सर्व मते वैयक्तिक , त्यात मतांतरे असु शकतील ;)
कमिंग सुण : कधी तरी ह्या "राशीभविष्यावर" लिहीण्याचा माणस आहे.
प्रतिक्रिया
विनोद आधी
>> सपष्ट
+१
चाराणे कमी
टारुमल बाबा कि जय हो
अॅनालिसिस
>> त्यामुळे
:-)
ए बाबा
ग्रंथांचा
अंहं
अपेक्षाभं
यावरून आठवले...
फक्त
ह्या वरून
>> स्वताला
आहो टारू
देव आहे हे
नही जम्या.
आपला लेख
>> त्या
:) अहो