वीकांतला जमेल तेव्हा शांतपणे बसून सगळे भाग पुन्हा एकदा सलग वाचून काढीन. मस्त जमलीय कथा !
तुमच्याकडून असेच उत्तम लेखन होवो ह्या शुभेच्छा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
श्री मोडक, हा भागही नेहमीप्रमाणेच आवडला पण पटापटा उरकला गेला असे जाणवले. बरीच पात्रं आणि स्थळं असल्याने एक कादंबरीच होऊ शकेल असे वाटते. विस्ताराने लिहिण्याचे मनावर घ्यावे. अनीशसारखे लोक कुठून येतात? का हा सगळा व्याप करतात? हिंसेमागची त्यांची भुमिका काय? या गोष्टींचा उहापोह वाचायला आवडेल.
वाचुन वाटलं कि खरंखुरं जग... जे एक जंगलच आहे... त्या सत्यापासुन मी किती लांब आहे, सुरक्षित आहे !! त्याकरता देवाला धन्यवाद द्यायचे आणि आनंद मानयचा कि सत्य परिस्थिती बघुन दु:खि व्हायचं :(
भावना अजुनहि अर्धवटच आहे :(
(गोंधळलेला)अर्धवटराव
-रेडि टु थिंक
कथा छान झालेली आहे. शेवटपर्यंत पकड ठेवते. उघड काळं पांढरं करण्याऐवजी संतुलित चित्रणाकडे भर ठेवते. प्रश्नांचा निकाल लावण्याऐवजी भिजत घोंगड्यातनं दोनचार थेंब गळाल्याचं दाखवते.
जाता जाता - झुंडशाहीवरच्या नितीन थत्तेंच्या प्रश्नाचं उत्तर नाही, पण सविस्तर मांडणी वाटली. खऱ्या व्यक्ती व यंत्रणा अडकलेल्या दिसल्यामुळे प्रश्न भिडतो. कथेचा जीव अजून मोठा आहे असं वाटलं.
राजेश
सुरेख पण अजूनही वाढवता आली असती, असे वाटते. गावकर्यांच्या जमिनी न देण्यामागच्या भूमिकेचा अजून थोडा उहापोह केला गेला असता, ते नक्षलवादाकडे का आणि कसे झुकले याचे थोडे अधिक विवेचन असते, तर अधिक उत्तम झाले असते.
कथा आवडली (हे वेगळे सांगायची काहीही आवश्यकता नाही!) ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मोडकांनी नेहमीप्रमाणे त्यांचे बारकावे, वास्तव, निगडीत प्रश्न सुंदर मांडलेले आहेत. कथा म्हणुन उत्तमच! खरं तर वाचताना असं वाटलं की यावर एक छान मालिका किंवा डॉक्युमेंटरी बनेल!
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकेतस्थळावर येणार्या सुखवस्तु मध्यमवर्गापुढे हे प्रश्न मांडणं. एकीकडे पत्रकारीता विकली गेली आहे चा आक्रोश सुरु असताना अश्या लेखांचं महत्त्व फार आहे. खरं तर प्रामाणीक पत्रकार अश्या माध्यमांचा वापर लवकरच करु लागतील हा विचार सुखावुन गेला.
काय बरोबर आणी काय चुक हे ठरवणं परिस्थितीच्या बळी गेलेल्यांसाठीच, तिर्हाईताचे त्यावरचे विचार म्हणजे फुकाचे बोल!
नक्षलवाद किती भयानक आहे आणि त्यांचे काय नेटवर्क आहे ते थोडंफार कळलं. कालच केंद्रिय गृहसचिव पिल्लई ह्यांचे स्टेटमेंट वाचले टाईम्स मध्ये. नक्षलवाद्यांना २०५० मध्ये भारत ताब्यात घ्यायचाय म्हणे. आपले राज्यकर्ते २०४० पर्यंत जागे होणार नाहीत बहुदा. नक्षलवादाची समस्या काश्मीरप्रश्ना सारखी नाही झाली म्हणजे मिळवलं. मुंबईसारख्या शहरात माणुस किती सेफ आहे ते पुन्हा एकदा कळलं. अप्रतिम लेखमाला होती.
बाकी "रामदासांचा" संचार सर्वत्र असतोच म्हणा. स्टॉक मार्केट पासुन गोडबोलेंपर्यंत. :)
श्रामोंच्या कथा घेतल्या तर त्यातुन सिंहासनासारख्या उत्तम चित्रपटाची निर्मिती होउ शकते. हे फक्त चित्रपट निर्मात्यां पर्यंत पोचायला हव. त्यांना यात व्यवसाय दिसला तर दिसु द्यात.लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हे खरखुरं जग, जे एक जंगलच आहे... त्यापासुन मी किती लांब आहे... सुरक्षित आहे. त्याकरता आनंद मानायचा कि लोकांच्या इतक्या हाल बघुन दु:खि व्हायचे हेच कळत नाहिये...
(गोंधळलेला) अर्धवटराव
- रेडि टु थिंक
काही कारणांमुळे श्रामो आणि यकू, ह्यांना भेटता आले नाही, ही खंत आहेच.म्हणूनच जसा वेळ मिळेल तसा, त्यांचे लेख वाचतो.
देवावर तसाही आमचा विश्र्वास न्हवताच.ह्या अशा घटना घडल्यामुळे, दैवावरचा पण विश्र्वास उडून गेला.
(सालं पुणे, इंदूर आणि संभाजीनगर इतके दूर कधीच वाटले नाही.)
प्रतिक्रिया
अप्रतीम
निरोप
नक्षलवाद
अरे काय लिहिता तुम्ही श्रामो !
उत्तम
पुर्णपात्
हे सगळं भयानक आहे !!
संतुलित
कथा
छान
सुंदर!
मस्त लेखमाला.
भाकीत
जगात काय काय होत असतं ¡¡
आज काही तरी अस्सल वाचावासे वाटले.....
धन्यवाद!
श्रामो आणि निरोप हे दोन्ही शब्द काही खपल्या काढून गेले....
छान
.