Skip to main content

विडंबन-गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 14/03/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा- आपण दोघे ही रुपेश देशमुख यांची गझल. कधी न संयमी, सदा अनावर आपण दोघे; गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे. तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. तेच तेच ते बोलत बसता उजाडते ही; एकमेका म्हणतो आवर; आपण दोघे. बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

वाचने 3480
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे छान. - (सर्वव्यापी)प्राजु

बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जबरा... बाकी बरेच दिवस दिसला नाही तुम्ही.जोरदार कमबॅक झालं बॉ जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे काय आमाला जमायचं नाय... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

अविनाश ओगले - मद्य = शून्यभोपळा :) कविता अगदी हृदयापासून आली आहे... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. वा वा! या ओळी मस्त बरं का ओगलेशेठ... आपला, (ऑन द रॉक्स्वाला) तात्या.