हे असं का? ते तसं का?
या द्विधा मनस्थितीत,
एक कोणीतरी जगत असतो
कधी नाक मुरडत,
कधी शिव्या घालत,
कधी तोडफोड करत,
माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो,
उंबर्याची बंधने झुगारुन,
समाजाची चौकट ओलांडुन,
नवे नवे पायंडे पाडत राहतो
कारण....
हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन
लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी
टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........