Skip to main content

तंत्र

स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन

लेखक निनाद यांनी बुधवार, 07/09/2016 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत. हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे: सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे. त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची. हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा. आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून). आता वार्‍याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार.

सल्ला हवा आहे

लेखक _मनश्री_ यांनी सोमवार, 05/09/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती (MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

पत्ता

लेखक टीपीके यांनी शनिवार, 23/07/2016 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही तर आता मुख्य विषयाकडे , मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

बोट - शिक्षण

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 16/06/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही. तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग?