Skip to main content

जीवनमान

राजे – १

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 03/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र. बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!

मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 01/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख . हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.
कोऽहमचा पुकारा
3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे.

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 01/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो.

शुभेच्छा!!

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 31/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
:H सरत्या वर्षाला बाय बाय करुन नविन वर्षाचे स्वागत करुया!! :SS :-C मिसळपाव वरील सर्वा॑ना नविन वर्षाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!! :-C जयेश माधव

न झालेला दोस्ताना..

लेखक योगी९०० यांनी रविवार, 28/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तसा लेखाच्या नावावरून चतूर मि.पा. करांच्या ध्यानात आले असेल की मी कोणत्या विषयावर लिहीणार आहे. मला आणि माझ्या मित्रांना आलेले अश्या लोकांचे अनुभव. म्हणजे तुम्ही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी लिहीणार आहे की अशी माणसे कशी आमच्या मागे लागली आणि आम्ही कसे या प्रसंगातून वाचलो ते. आमच्या अनुभवातून तुम्ही काही शिकावे हाच खटाटोप. एक सांगू इत्छितो की या लेखाद्वारे कोणाला दु़खवायचा किंवा अश्या लोकांची चेष्टा करायचा मुळीच उद्देश नाही. जर कोणी मि.पा. कर नाराज झाले तर क्षमस्व. प्रसंग १ (अनुभव १ असे लिहीणार होतो.

डायरेक्ट ढगात जातील . . .

लेखक काहीतरीच यांनी मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण, तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . . खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस, अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . . आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो, कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . . फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार, पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . . तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले, आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . . लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील, पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . .
Taxonomy upgrade extras

!! चांडाळ चौकडी !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

सशस्त्र क्रांति / लढ्याच्या मर्यादा.

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल नियमित लेख प्रसिद्ध होत असतात. याचा एक अर्थ सरळ सरळ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकाचे भरीव योगदान आहे. दुसरा अर्थ असाही आहे की भारतीय जनमाणसाला क्रांतिकारकाचे अप्रुप वाटत असले तरी तत्कालिन राजकारणातील मुख्यलढ्याच्या समोर हा लढा तसा निष्प्रभ ठरत होता. पुढील विवेचन करण्याअगोदर काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकतर भारतातील एकंदरीतच सर्वच स्वातंत्र्य सेनानी आदर्शवादाने भारावलेले होते, त्यांचे मनोबल उच्चदर्जाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वर्तन, चरित्र हे निष्कंलक होते.