महाराष्ट्र वैभव.
महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले.
महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर.
महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले.
महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे.
महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.
मिसळपाव
आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....!
आशाताई, जियो....!
तात्या.
डॉ.गंगाधर पानतावणे सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
अमेरिकेत होणार्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.