Skip to main content

सल्ला

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे.

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 21/06/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.

साखर आणि फॅट चे खरे गुपित

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 11/06/2011 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
'आहो, मधुमेह झालाय न? सगळी साखर बंद करा!' ' मी सध्या काही गोड किंवा तळलेले पदार्थ खात नाही- वजन कमी करायला हो!' 'उत्कृष्ट आरोग्याची गुरुकिल्ली- कुठलाही स्वरूपात साखर टाळणे'. हे आणि असे अजून बरेच समज/गैरसमज- साखर, तूप, तेल, वनस्पती, फॅट - विषयी आपण वाचून किंवा ऐकून असतो. आपल्याला जमेल तेवढं आपण आरोग्य जपण्याचा आणि आहारात फेरफरक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीला बळी जातो. उ.दा. शुगर फ्री चॉक्लेट.

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?

जेवणाऐवजी मिल्क शेक?

लेखक खादाड अमिता यांनी मंगळवार, 26/04/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात माझे एक क्लायन्ट, श्री जोशी, एका नवीन कंपनीचे 'वेट लॉस प्रोटीन शेक' त्यांच्या मित्राकडून (विकत) घेऊन आले. मी विचारल्यावर, 'मॅडम, ते माझे अगदी बालपणा पासूनचे मित्र आहेत. ते आणि त्यांची बायको, गेल्या ५ वर्षांपासून हे प्रोटीन (प्रथिन) शेक घेत आहेत. त्यांचे १२ किलो वजन कमी झालंय! त्यांच्या आग्रहाला मी बळी पडलो. तुमचं डाएट तर करतोच आणि शिवाय हे प्रोटीन शेक पण घेऊन बघतो. काही पण करून वजन कमी झालं, तर माझा फायदाच आहे न!' जोशी साहेबांच्या मित्राने समजावल्या प्रमाणे- त्यांनी दिवस भरात तीनदा त्या प्रोटीन शेक चं एक पाकीट २५० मिली दुधात घालून प्यायचा होतं.

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/04/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips) संदर्भ: http://www.misalpav.com/node/17667 http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms १. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.) २.

मुंबईच्या मनकर्णिके

लेखक शरद यांनी सोमवार, 11/04/2011 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो असकारा पाहुन असा, जीवाचा ससा भेदरुन पळतो तूं तल्लख पुरती खरी !

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.