Skip to main content

सद्भावना

इलाहींचा आशीर्वाद...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 23/07/2008 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा मंडळी, या ओळी आहेत सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या! मिपाचे एक सन्माननीय सभासद धोंडोपंत हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. पंतांमुळेच आमचाही जमादारसाहेबांशी परिचय झाला, बातचित झाली. आम्ही आमच्या बोलण्यातून त्यांना आपल्या मिसळपाव या संकेतस्थळाविषयी सर्व माहिती पुरवली. हे ऐकून त्यांना मनापासून आनंद वाटला व त्यांनी मिपाला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या! त्यांच्यासारखी असामान्य प्रतिभा लाभलेल्या कलाकारचा आशीर्वाद हा मिसळपावकरता मोलाचा वाटतो! असो, आपला, तात्या.

महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."

लेखक रमा पेशवे यांनी मंगळवार, 15/07/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्‍या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्‍या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली..... जय जय रघुवीर समर्थ!!!

पांडेकर आजी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/07/2008 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या. "वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.

श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी सोमवार, 14/07/2008 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे. ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५) रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते.

होय म्हाराज्या!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 12/07/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात देवाला गार्‍हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्‍याकडून (भटजीकडून) गार्‍हाणं घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्‍याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते. ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्‍हाणं घातलं,आणि ते मालवणीतून. आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना यश,समाधान,आणि चांगल

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षाचा असताना त्याच्या बापाने आमच्या आई जवळ ह्याला आणून सोडले. "मला एव्हड्या मुलांचा व्याप आता जमत नाही.ह्याला तू तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे उरेल सुरेल ते ह्याला घालून तुझ्याकडे कामासाठी ठेव आणि मला ह्या काळजीतून सोडव" असं सांगून गेल्यावर गेले सत्तर वर्ष रामा आमच्याकडे राहिला.
Taxonomy upgrade extras

शालूची शालीनता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची. शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम.

ओळख

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शनिवार, 21/06/2008 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,खादाड लोक हो " मिपा " च्या सर्व सभासदांना माझा नमस्कार. आणि मालकांना सुद्धा . बरं का! मी संतोष जोशी श्री स्थानक येथे रहातो.लोकांना पोटभर जेऊ घालणे हा व्यवसाय.गेले तीन पिढ्या हा व्यवसाय अव्याहतपणे चालु आहे.(मी तिसरा) मालक (तात्या) आमचे मित्र आहेत. तशी मैत्री कट्ट्यावरची म्हणजे विचारांची , पण खाणे आणि पिणे यातील आवडीही सारख्या आहेत हे समजल्यावर जास्त घट्ट झाली. व्यवसाय तर आहेच पण लोकांना रुचेल ते खाऊ घालणे हा छंद. त्यामुळे सामिष की निरामिष हा तुच्छ प्रश्न कधीच आडवा येत नाही. आपणा सर्वांशी मैत्री करायला आवडेल . पाहूया !! कधी भेटीचा योग येतो ते...

पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 10/06/2008 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्‍यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!" "हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!" महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो! पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.

मिपाकरांना नमस्कार.

लेखक आसावरी जोशी यांनी शनिवार, 07/06/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले.