(मरणानंतर माणसाचे काय होत असेल, ह्या पुढचे दुसरे जीवन ईथेच पृथ्वीवर असेल की दुसऱ्या एखाद्या ग्रहावर? असा विचार कधीना कधी सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. मी असेही भाष्य ऐकले होते, की मरणानंतरचा काही काळ मृतात्म्याला खूप कठीण जातो. पुढचा प्रवास सुरू झाला नसतो. एक लोंबकळणारी विचित्र अवस्था असते. शरीर सोडले, तरी ईच्छारूप शरीराचे बंध सुटलेले नसतात. आपल्या संस्कतीत मरणानंतर आप्तस्वकीयांनी करण्याचे अनेक विधी सांगीतले आहेत. तेराव्या दिवशीचे श्राद्ध तर मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि पुढचा प्रवास ठीक होवो यासाठी फ़ार महत्वाचे मानले जाते. चिनी संस्कृतीत देखील बरेच साम्य असणारे अशा प्रकारचे विधी आहेत.