युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३०
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात.
"महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला."
"दंश केल्यावर शुद्धीत आला?"
"हो, महाराज."
"याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते."
"नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला.
'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?"
"मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र."
"कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?"
"हो."
नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं."
"आजोळ?"
"हो. मी तुझा मातामह आहे.
मिसळपाव