Skip to main content

लेख

विस्मरणात गेलेले किचन टुल..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
. चिमटा हे स्वयंपाक गृहातले महत्वाचे टुल आहे.. हल्ली अनेक प्रकारचे चिमटे बाजारात मिळतात.. आमच्या लहान पणी असा चिमटा स्वयंपाक गृहात असायचा.. एका बाजुनी गरम पातेली सतेले आदी साठी होता तर दुसरी अर्ध गोलाकार बाजुनी "अर्धी कडची" उकळत्या द्रवांची मोठी पातली उचलण्यासाठी वापरली जाते. एका बाजूने चांगली पकड मिळते आणि उकळीच्या वाफा-यापासून हात लांब रहात असे.. असो.. अहा ते सुंदर दिन हरपले ..

सहल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुजी २०-२५ मुलाना घेऊन वन सहलिला निघाले असतात.. . वाटेत अचानक विजा कडकडु लागतात..सोसाट्याचा वारा सुटतो.पाऊस सुरु होतो .व मुले घाबरतात.८-९ वर्षाची असतात गुरुजीना बाजुलाच एक गुहा दिसते व ते मुलाना म्हणतात "मुलानो चला त्या गुहेत आपण पाऊस संपेपर्यंत निवारा घेऊ. मुले व गुरुजी दाटिवाटीने गुहेत आंग चोरुन उभे असतात..पण एक घटना घडते.. एक विजेचा लोळ गुहेच्या तोंडाजवळ येऊन आदळत असतो..मुले घाबरतात.. हा प्रकार सारखा चालु असतो.. गुरुजी विचार करतात अन मुलाना म्हणतात..मुलानो..आपल्यामधे असा एकजण आहे ज्याला मारण्या साठी विज सारखी गुहेच्या मुखाजवळ आदळत आहे....आपण असे करु समोर झाड आहे...आपल्या पैकि एक एक जण घाव

संदीपची हुषारी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/12/2019 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतनत हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. "मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत", सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते. पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे.

Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

लेखक शा वि कु यांनी शुक्रवार, 29/11/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता ! मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली.

सायकलच्या आठवणी

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 26/11/2019 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका गल्लीतून पोरांचा घोळका सायकलींवरून बाहेर पडला, त्यांना बघून मी थांबलो. पुढच्या सिग्नलपर्यंत त्या पोरांनी रस्ता अडवला होता. मग ती परत एका गल्लीत घुसली. बहुतेक एका क्लासवरून दुसऱ्या क्लासला जात असावी. पण त्या पोरांमुळे माझ्या सायकलीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी आणि माझी सायकल 'एक दिल एक जान' होतो तेव्हा. शेजारच्या मित्राकडे, म्हणजे दोन इमारतीसोडून राहणाऱ्या मित्राकडे जायला मला बुडाखाली सायकल लागायची. आई बाबा वैतागायचे कधीतरी पण लक्ष नाही द्यायचे. इयत्ता पहिलीच्या शेवटी माझी सायकल आली. आठशे ब्याऐंशी रुपयांची.

अर्ज है की..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/11/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक अर्ज भरत होते. तो इतका किचकट होता की,तो भरता भरता माझी दमछाक होत होती. संपूर्ण नाव, पत्ता-घरचा, पत्ता-ऑफीसचा, तात्पुरता, कायमचा. मग फोन नंबर. घरचा, ऑफीसचा, लँडलाईन, मोबाईल. मग पतीचे संपूर्ण नाव,ऑबलिक/पित्याचे संपूर्ण नाव. आईचे माहेरचे, सासरचे संपूर्ण नाव. आधार नंबर, पॅन नंबर.. मसणं नि माती. सतराशे साठ चौकशा. हा अर्ज फाडून टाकून, पेन फेकून देऊन, बाणेदारपणे घरी निघून जावं आणि मस्तपैकी एसी लावून झोपून जावं असा विचार मनात आला. पण तसं करणं शक्य नव्हतं. अर्ज भरणं भाग होतं. त्यात माझाच फायदा होता. असं नेहमीच होतं.अर्जाचा फॉर्म भरायचा मला नेहमीच कंटाळा येतो. बँकेत जा, अर्ज.

pmpml प्रवासाचा सुखदायक अनुभव !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 18/11/2019 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता.

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/11/2019 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.

प्रेम 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 15/11/2019 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम 1 त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच.

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज ) आमच्या वार्ताहराकडून हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले ( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला