Skip to main content

लेख

द्दावं,द्दावं आणि द्दावं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 19/08/2008 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
"हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे" माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार. मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक ऐकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती कायसांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमवि

नफिसा यादव

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
नफिसा यादव राजसच्या शाळेला दिवाळीची सुट्टि.. आणि त्यात शनीवार असल्यामुळे नवरोबाही घरात्..तसा दर शनीवारी मला त्याचा फार हेवा वाटतो पण आज जरा जास्तच वाटत होता. त्यात त्याची शेषशाही मुद्रा.. आणि चिरंजीवांची मस्ती.. त्यांच्या भोवती घुटमळणार्‍या मला टुकटुक करुन वाकुल्या दाखवत होती. ऑफिसल दांडि मारावी अस मनात शंभरदा येताना आवरा-आवर करणारी मी.. घरात सगळेच सैलावलेले.. माझी ही जरा अळम-टळमच चाललेली.. तस फारस काम नव्हत थांबाव का घरी.. म्हणता म्हणता माझी तयारी झालिही..चला आता थांबून चालणार नाही माझ मलाच सांगत समजावत बेटूचा पापा घेऊन निघाले.. तोवर बहाद्दुर दारात हजर झाला..

चायनीज खाद्यंती

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 18/08/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर 'मँडारिन' की 'नानकिंग' अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत.

सैनिक हो! तुमच्या साठी....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/08/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.

माजा बा

लेखक ब्रिटिश यांनी शनिवार, 16/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी चवतीत होतो. स़काली उटलो. अंगोल धवली. च्या न बटर खाल्ला. पलत शालन गेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायव दिसना. कसातरी बाकड्याव बसलो. हजेरी चाल्लीवती. "मिथुन भोइर~~~ " मास्तर वरडलं माज्या बा ला मिथुन लै आवराचा. माजी आय सांगाची क जवा जवा मिथुनचा पिच्चर थेटरान लागाचा तवा बा कामाव जयचाच नई. आक्का दिस थेटरान परून असाचा. "आत्ताच आयलो न" मी "हं दिसतय मना." "पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं "भोईराच्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. " माजे पोटान गोला उटला. चवतीत होतू तरी वाचाय जमत न्हवतं.

अवघे पाऊणशे वयमान.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 14/08/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिसळपावकरानो,वाचक/लेखक मायबापानो,आज अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली. १४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते फक्त काढदिवस. जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत, कुकलं बाळ होतो. त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत अल्लड मुलगा होतो. त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत शाळकरी होतो. त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत कॉलेज वीर होतो. त्यानंतर थोडी वर्ष चाकरमानी होतो. त्यानंतर लग्न झाल्यावर हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो. त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर गृहस्थ झालो. त्यानंतर पन्नासी उलटल्यावर वयस्कर झालो त्यानंतर साठी उलटल्यावर म्

मांडकुली एक खेडेगांव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 13/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बऱ्याच लोकानी पाहीले नसावं.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवं लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असतं.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरं पाण्याचे डबकं दसतं. उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झ

राम राम मंडळी...

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं? दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां... तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.." आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :) चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...