सह्याद्रीच्या रांगेतील जो मानाचा तुरा तो शिवनेरी आपल्या सर्वाना माहित आहे , पण अजुन बर्याच जणांना माहित नसेल की या शिवनेरीला अजुन मित्र मंडळी आहेत .या जुन्नर ने अनुभवले आहे एक श्रीमंत साम्राज्य , ती श्रीमंती फ़क्त शिवजन्माचीच नव्हती ,तर ती होती येथील मातीच्या सुगंधाची ,खड्कांच्या कणखरतेची, युगायुगां पासून येथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शिंपलेल्या घामाची, त्यांच्या श्रमांची .सह्यकड्या प्रमाणे पोलादी छाताडांची अन श्रुष्टीचा पसारा रचनार्या त्या निसर्ग देवतेच्या मुक्त हस्ताची .