Skip to main content

लेख

गर्दीतला चेहरा (लोकल गोष्टी-६)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 24/07/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीतला चेहरा ============================================ ट्रेन मधून प्रवास करताना, आतापर्यंत कित्येक चेहरे दिसले.. त्यातले लक्षात राहिलेले किती..? अगदी काही, बोटांवर मोजता येण्या इतकेच. आपल्याला दिसतो.. लक्षात राहतो तो एकच गर्दीचा चेहरा. मग त्यात काही शाळकरी मुला-मुलींचे घोळके असतात.. कॉलेजला जाणाऱ्या जोड्या दिसतात.. ट्रेनच्या इतक्याच सातत्याने कामावरून जाणारे - येणारे जीवनसारथी.. अखंडपणे कार्यरत असलेल्या मुंग्यांसारख्या तुरुतुरु चालणाऱ्या बायका.. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर चेहरा असा कोणालाच नाही. ( मलाही नाहीच ) आपल्या व्यतिरिक्त प्रत्येक जण म्हणजे गर्दी आणि आपण गर्दीतले एक.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 23/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच !

आईचा मुलगा हरवला.. (लोकल गोष्टी-५ )

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा मुलगा हरवला.. =========================================== ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता, हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले..

हातातला खजिना (लोकल गोष्टी-३)

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 21/07/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
हातातला खजिना ============================================ रोज सकाळी राजसला शाळेत सोडल्यावर मी ऑफिससाठी स्टेशन गाठायचे.. राजसची शाळा पावणेनऊला सुरू व्हायची त्यानंतर अगदी चालत निघाले तरी नऊ सव्वा नऊ पर्यंत मी पार्ले स्टेशनवर पोहचायचेच. माझ्या कडे तसा बराच वेळ असायचा.. दोन नंबर प्लॅटफॉर्म वर चेंगरा-चेंगरीत घुसून लोकल पकडावी लागायची नाही. सहा नंबर प्लॅटफॉर्म वर नऊ अठरा चर्चगेट लोकल लागलेली असायची. त्या लोकलने मी आरामात जाऊ शकायचे.. आणि जरी काही कारणांनी ही लोकल चुकली तरी पुढच्या लोकलनी मी वेळेत ऑफिसला पोहचायचे. त्यामुळे तसा बराच निवांतपणा होता. आणि मन निवांत असलं की त्याला आजूबाजूच दिसतं..

आषाढी एकादशी काही कथा

लेखक बज्जु यांनी बुधवार, 21/07/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

सच्चा माणूस!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही. त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ.

निगरगट्ट आठवांचा चिखल..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 17/07/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच... अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात. जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी...