Skip to main content

लेख

लढवय्यांचे वंशज

लेखक रम्या यांनी मंगळवार, 21/12/2010 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मिसळपाव वरील एका लेखात बहादूर शहा जफर यांच्या गजलींविषयी वाचलं. आमच्या अंगभूत स्वभावानुसार बहादूर शहा जफर यांच्या बद्दल इतर काही माहीती गुगलली. माहीती वाचता वाचता बहादूर शहा यांच्या वंशजा पर्यंत, सुलताना बेगम, पर्यंत पोहोचलो. चहाची टपरी चालवून अत्यंत गरीब परिस्थितीत राहणार्‍या सुलतानाबद्दल वाचून वाईट वाटलं.

मसल्स दिखाऊ संस्कृती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 21/12/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान! आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच. व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या.

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 21/12/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५.

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

कासाराचा गोईंदा

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

लेखक यकु यांनी मंगळवार, 07/12/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत.

मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 07/12/2010 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूष साहेबांचा विसा नाकारणे. त्यावर त्यांनी कांगावा करणे साहजिकच आहे ...पण नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे . त्यांनी बलुचीस्तांमधील कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला.( हे सत्य असल्यास असे समजू कि भारतीय करदात्यांचा पैसा कुठेतरी सत्कर्मी लागतोय .नाही तर आपले मंत्री म्हणजे राजा आहेतच पैशाचा सद उपयोग करणारे . ) त्यामुळे आपल्या सरकारने त्यांचा विसा नाकारला.